शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

फुललेला संसार सोडून तिने धरला रिझवानचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 23:00 IST

बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. एका ख्रिश्चन धर्मगुरुने वयाच्या दहाव्या वर्षापासून सांभाळ केला

जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 26 - बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. एका ख्रिश्चन धर्मगुरुने वयाच्या दहाव्या वर्षांपासून सांभाळ केला. कालांतराने हिंदू उच्च शिक्षिताबरोबर तिचा विवाह झाला. पण आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे जन्नत मिळणार नाही. अल्लाहला काय तोंड दाखविणार, अशी काहींनी तिला विचारणा केली. नंतर आयआरएफ (इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन)मध्ये रिझवान खानच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्याशी तिचा विवाह झाला. इसिसच्या कारवायांमुळे त्यालाही पोलिसांनी अटक केल्यामुळे रुकय्या खान (४५) मात्र पुन्हा अनाथ झाली.मुंबई दहशतवादविरोधी पथक आणि केरळ पोलिसांनी संयुक्तरीत्या कल्याणमधून अटक केलेला डॉ. झाकीर नाईकचा हस्तक रिझवान खान लोकांची लग्न जमवून देण्यात विशेष आघाडीवर असायचा. त्यातही एखादा मुलगा किंवा मुलगी मुस्लीम असल्यास आणि त्यांचा प्रियकर जर हिंदू, ख्रिश्चन, जैन किंवा बौद्ध असल्यास त्यांना धर्मांतर करण्यास तो आधी भाग पाडत असे. अशा शेकडो प्रेमीयुगुलांचे त्याने धर्मांतर केले. मुंबईच्या आयआरएफमध्ये आपल्या तीन मुलांसह आलेल्या रुकय्याची कहाणी थोडी वेगळी आहे.मूळ केरळची असलेल्या रुकय्याच्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाला. त्यामुळे आईनेच तिचा सांभाळ केला. पुढे वयाच्या दहाव्या वर्षांपासून खिश्चन मिशनऱ्यांनी तिचे संगोपन आणि शिक्षणही केले. या मिशनऱ्यांकडे असतानाच एका उच्च शिक्षित मोठ्या पगाराच्या हिंदू अधिकाऱ्याने तिला लग्नाची मागणी घातली. (एका अनाथ मुलीशी लग्न करण्याची इच्छा असल्यामुळे त्याने या अनाथलायातून तिची निवड केली.) त्यात त्यांना दोन मुली झाल्या. तिला काही समाजबांधवांनी याबाबत जाब विचारले. दुसऱ्या धर्माच्या मुलाबरोबर तू निकाह केला आहेस. मग अल्लाहला काय जबाब देणार? याचा गंभीरतेने विचार करुन तिने पतीपुढे घटस्फोट किंवा मुस्लीम धर्मात धर्मांतर करावे, असे दोनच पर्याय ठेवले. आपल्या पत्नीच्या हट्टापुढे हतबल झाल्यामुळे त्याने धर्मांतर करण्याचा पर्याय निवडला. त्यानंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बद्रीनाथ ठेवायचे, असा त्याचा आग्रह. तर बद्रीनाथ ऐवजी बिलाल ठेवण्यासाठी तिने पुन्हा हट्ट केला. हा वाद टोकाला गेल्यामुळे तिने त्याचे घर सोडून तिन्ही मुलांसह मुंबईच्या ‘आयआरएफ’ या संस्थेत २०१४ मध्ये आश्रय घेतला. ‘आयआरएफ’ मध्ये अनाथलयात येणाऱ्यांची जबाबदारी रिझवानकडे होती. रिझवानने तिची गोरेगावच्या मर्सी मिशन येथे वास्तव्याची व्यवस्था केली. नंतर तिला कल्याणच्या ‘आसरा फाऊंडेशन’ वसतीगृहात ठेवले. तिथे तीन ते चार महिने राल्यिानंतर रिझवान आणि तिच्यात चांगलीच जवळीक वाढली. रिझवान एक चांगला समाज कार्यकर्ता तसेच मुस्लीम असल्यामुळे त्याच्याशी निकाह करण्याचा तिने विचार केला आणि सप्टेंबर २०१४ मध्ये ते रेशीमबंधात अडकले. आता आपल्याकडे कोणाला बोट दाखवायलाही जागा नाही, अशी तिची भावना झाली. पण त्याच काळात लोकांचे विवाह जमविणारा रिझवान इसिसमधील अर्शिद कुरेशीच्याही संपर्कात होता. त्याने अनेकांचे धर्मांतर करण्याबरोबरच त्यांना इसिसमध्ये ढकलण्याचेही काम केले. यातच तो महाराष्ट्र एटीएस आणि केरळ पोलिसांच्या कारवाईत पकडला गेला. त्यामुळे १२ आणि १० वर्षांच्या दोन मुली तसेच सहा वर्षांच्या एका मुलासह रुकय्या मात्र पुन्हा अनाथ झाली. तपासात समोर आलेल्या या विचित्र कथनकामुळे केरळ आणि मुंबई पोलीसही अवाक् झाले.