शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकांचे संकेत

By admin | Updated: November 18, 2014 16:08 IST

राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

अलिबाग, दि. १८  - राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले आहे. भाजपा सरकार स्थिर राहावे यासाठी राष्ट्रवादीने मक्ता घेतला नसल्याचे त्यांनी नमूद केले असून राजकारणाची उत्तम जाण असलेल्या पवारांच्या या भाकिताने महाराष्ट्रातील राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटून आले आहे. 
 
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अलिबाग येथे चिंतन शिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये शरद पवार यांनी उपस्थित पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारात गुंतल्याचे चित्र निर्माण केले आणि विरोधकांनी त्याचा फायदा घेतला असे सांगत पवारांनी पराभवासाठी काँग्रेसच्या दिशेने बोट दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्कात वाढवण्या अपयशी ठरली असून आपण आणखी कुठे कमी पडलो हेदेखील तपासून बघायला हवे असे त्यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिल्याचा दावाही पवारांनी केला. राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या घटकांचा पुन्हा विश्वास संपादन करण्याची गरज असल्याचे पवारांनी म्हटले आहे. 
विधानसभा निवडणुकीद्वारे महाराष्ट्रात पाय रोवणा-या एमआयएमला भाजपामधील एका गटाने पाठिंबा दिल्याचा आरोपही पवार यांनी केला. या पक्षाच्या नेत्यांची प्रक्षोभक भाषणे पाहता राज्यातील एकोप्याला धोका निर्माण होवू शकतो असे पवारांनी सांगितले. 
 
भाजपा सरकारमध्ये धाडस नाही
भाजपा आणि शिवसेना युती झाली असती तर पुढील पाच वर्ष एकत्र आले तर सरकार स्थिर झाले असते. पण तसे झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊनही सरकार स्थापन झाले नसते. म्हणून भाजपाला पाठिंबा दिला. पण ही स्थिती दिर्घकालीन स्थिरता देणारी नाही. आम्ही दिलेला पाठिंबा स्वीकारण्याचे धाडसही या सरकारमध्ये नाही असा टोलाही त्यांनी लगावला.