शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकांचे संकेत

By admin | Updated: November 18, 2014 16:08 IST

राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

अलिबाग, दि. १८  - राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले आहे. भाजपा सरकार स्थिर राहावे यासाठी राष्ट्रवादीने मक्ता घेतला नसल्याचे त्यांनी नमूद केले असून राजकारणाची उत्तम जाण असलेल्या पवारांच्या या भाकिताने महाराष्ट्रातील राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटून आले आहे. 
 
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अलिबाग येथे चिंतन शिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये शरद पवार यांनी उपस्थित पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारात गुंतल्याचे चित्र निर्माण केले आणि विरोधकांनी त्याचा फायदा घेतला असे सांगत पवारांनी पराभवासाठी काँग्रेसच्या दिशेने बोट दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्कात वाढवण्या अपयशी ठरली असून आपण आणखी कुठे कमी पडलो हेदेखील तपासून बघायला हवे असे त्यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिल्याचा दावाही पवारांनी केला. राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या घटकांचा पुन्हा विश्वास संपादन करण्याची गरज असल्याचे पवारांनी म्हटले आहे. 
विधानसभा निवडणुकीद्वारे महाराष्ट्रात पाय रोवणा-या एमआयएमला भाजपामधील एका गटाने पाठिंबा दिल्याचा आरोपही पवार यांनी केला. या पक्षाच्या नेत्यांची प्रक्षोभक भाषणे पाहता राज्यातील एकोप्याला धोका निर्माण होवू शकतो असे पवारांनी सांगितले. 
 
भाजपा सरकारमध्ये धाडस नाही
भाजपा आणि शिवसेना युती झाली असती तर पुढील पाच वर्ष एकत्र आले तर सरकार स्थिर झाले असते. पण तसे झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊनही सरकार स्थापन झाले नसते. म्हणून भाजपाला पाठिंबा दिला. पण ही स्थिती दिर्घकालीन स्थिरता देणारी नाही. आम्ही दिलेला पाठिंबा स्वीकारण्याचे धाडसही या सरकारमध्ये नाही असा टोलाही त्यांनी लगावला.