शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

शरद पवारांनी दिले मध्यावधी निवडणुकांचे संकेत

By admin | Updated: November 18, 2014 16:08 IST

राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

अलिबाग, दि. १८  - राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे असे विधान शरद पवार यांनी केले आहे. भाजपा सरकार स्थिर राहावे यासाठी राष्ट्रवादीने मक्ता घेतला नसल्याचे त्यांनी नमूद केले असून राजकारणाची उत्तम जाण असलेल्या पवारांच्या या भाकिताने महाराष्ट्रातील राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटून आले आहे. 
 
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अलिबाग येथे चिंतन शिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये शरद पवार यांनी उपस्थित पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचारात गुंतल्याचे चित्र निर्माण केले आणि विरोधकांनी त्याचा फायदा घेतला असे सांगत पवारांनी पराभवासाठी काँग्रेसच्या दिशेने बोट दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्कात वाढवण्या अपयशी ठरली असून आपण आणखी कुठे कमी पडलो हेदेखील तपासून बघायला हवे असे त्यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितले. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहिल्याचा दावाही पवारांनी केला. राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या घटकांचा पुन्हा विश्वास संपादन करण्याची गरज असल्याचे पवारांनी म्हटले आहे. 
विधानसभा निवडणुकीद्वारे महाराष्ट्रात पाय रोवणा-या एमआयएमला भाजपामधील एका गटाने पाठिंबा दिल्याचा आरोपही पवार यांनी केला. या पक्षाच्या नेत्यांची प्रक्षोभक भाषणे पाहता राज्यातील एकोप्याला धोका निर्माण होवू शकतो असे पवारांनी सांगितले. 
 
भाजपा सरकारमध्ये धाडस नाही
भाजपा आणि शिवसेना युती झाली असती तर पुढील पाच वर्ष एकत्र आले तर सरकार स्थिर झाले असते. पण तसे झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊनही सरकार स्थापन झाले नसते. म्हणून भाजपाला पाठिंबा दिला. पण ही स्थिती दिर्घकालीन स्थिरता देणारी नाही. आम्ही दिलेला पाठिंबा स्वीकारण्याचे धाडसही या सरकारमध्ये नाही असा टोलाही त्यांनी लगावला.