शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पवारांची 'पावर' दिल्लीतही; विरोधीपक्षांसह मित्रपक्ष सुद्धा बुचकळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 16:19 IST

महाराष्ट्रप्रमाणे दिल्लीत सुद्धा या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार हेच केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे.

- मोसीन शेख 

मुंबई : विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तीन आठवड्यांचा कालावधी उलटला तरी राज्यात सत्ता स्थापनेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक झाली होती. त्यांनतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवारांची भेट झाली. त्यामुळे राज्यातला तिढा दिल्लीत सुटणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे. मात्र महाराष्ट्रप्रमाणे दिल्लीत सुद्धा या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार हेच केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना पक्षाचे युती सरकार राज्यात पुन्हा स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चितच समजले जात होते. मात्र मुख्यमंत्रीपदावर दावा केला जात असल्याने या दोन्ही पक्षामध्ये वादाची ठिणगी पडली. पुढे या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दबावतंत्राचा वापर करताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या पर्यायाची भीती दाखवली जात होती. त्यामुळे सत्तास्थापनेतही पवार फॅक्टरचं महत्वाचा ठरत असल्याची चर्चा पाहायला मिळत होती.

त्यांनतर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात एकत्र येण्यासाठी हालचाली सुरु असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठींचा ग्रीन सिग्नल खूप महत्वाचा होता. त्यामुळे पुन्हा दिल्लीतील  ही जवाबदारी पवारांवरचं आली. कारण काँग्रेसच्या हायकमांड यांची मनधरणी करणे एवढे सोपे नव्हते आणि ते राज्यातील काँग्रेस नेत्यांना शक्य ही नव्हते.

याच पार्श्वभूमीवर पवारांनी मंगळवारी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली.परंतु राज्यातील सत्तास्थापनेबाबत सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पवार भाजप सोबत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच पवारांनी आज मोदींची भेट घेतली. तर पवारांच्या या भूमिकेवरून विरोधीपक्षांसह मित्रपक्ष सुद्धा बुचकळ्यात पडले आहे. त्यामुळे सत्तेस्थापनेच्या राजकीय घडामोडी पाहता महाराष्ट्रातच नव्हे दिल्लीत सुद्धा पवारांची 'पावर' पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.