शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

“धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष, दंगली घडविणाऱ्या प्रवृत्तींमागे सत्ताधारी”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:16 IST

Sharad Pawar: आता देशाचा कारभार कोणी चालवावा, याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दंगली होताना पाहायला मिळत आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशात धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण केला जात आहेत. अशावेळी राजकीय व्यक्तींनी संघटित राहायला हवे. कारण या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. 

गेल्या काही दिवसांत किती जातीय दंगली होताहेत? हा देश, हा समाज सर्वांना घेऊन जाणारा आहे. मात्र, सध्या दहशतीचे वातावरण निर्माण करणे ही त्यांच्या कामाची पद्धत सध्या दिसून येत असल्याची टीका शरद पवार यांनी केली. आता देशातील चित्र बदलत आहे. कर्नाटकमध्ये तुम्ही पाहिलेले आहे. कोणी काहीही सांगत असले तरी आता या बदलामागे मोठी शक्ती आहे. मात्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा ७० टक्के ठिकाणी भाजप सत्तेबाहेर आहे. गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये वेगळे चित्र आहे. इथे कसलीतरी खोकी देऊन फोडाफोडी केली. मात्र, आता देशाचा कारभार कोणी चालवावा, याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, असे शरद पवार यांनी सांगितले.

आमच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाहीत, आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत की नाही?

मणिपूरच्या सहकाऱ्याने फोन केला, ते म्हणाले, आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही? यावर मी म्हटले की, असे टोकाचे का बोलताय? ते म्हणाले – इथे लोकांवर, अधिकारी, शैक्षणिक संस्थांवर हल्ले होताहेत. हे राज्य पेटले आहे; पण इथे कोणी लक्ष देत नाहीत. रोज घरेदारे उद्ध्वस्त होताहेत. पंतप्रधान असो की केंद्रीय मंत्री असोत, आमच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत की नाही, अशी भीती ते व्यक्त करताहेत, असे शरद पवार म्हणाले. 

दरम्यान, नॉर्थ ईस्ट आणि कश्मिरी यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. त्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करतात, ही बाब खेदजनक आहे. एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांशी संवाद साधून तिथे शांतता राखायची असते. केंद्रीय संरक्षणमंत्री असताना हे करायचो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. २४ जूनला आम्ही सगळे भेटणार आहोत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही तेव्हा असतील. त्यावेळी चर्चा करू, याच विषयाला प्राधान्य राहील, असे शरद पवारांनी सांगितले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार