शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

“धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष, दंगली घडविणाऱ्या प्रवृत्तींमागे सत्ताधारी”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:16 IST

Sharad Pawar: आता देशाचा कारभार कोणी चालवावा, याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दंगली होताना पाहायला मिळत आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशात धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण केला जात आहेत. अशावेळी राजकीय व्यक्तींनी संघटित राहायला हवे. कारण या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. 

गेल्या काही दिवसांत किती जातीय दंगली होताहेत? हा देश, हा समाज सर्वांना घेऊन जाणारा आहे. मात्र, सध्या दहशतीचे वातावरण निर्माण करणे ही त्यांच्या कामाची पद्धत सध्या दिसून येत असल्याची टीका शरद पवार यांनी केली. आता देशातील चित्र बदलत आहे. कर्नाटकमध्ये तुम्ही पाहिलेले आहे. कोणी काहीही सांगत असले तरी आता या बदलामागे मोठी शक्ती आहे. मात्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा ७० टक्के ठिकाणी भाजप सत्तेबाहेर आहे. गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये वेगळे चित्र आहे. इथे कसलीतरी खोकी देऊन फोडाफोडी केली. मात्र, आता देशाचा कारभार कोणी चालवावा, याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, असे शरद पवार यांनी सांगितले.

आमच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाहीत, आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत की नाही?

मणिपूरच्या सहकाऱ्याने फोन केला, ते म्हणाले, आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही? यावर मी म्हटले की, असे टोकाचे का बोलताय? ते म्हणाले – इथे लोकांवर, अधिकारी, शैक्षणिक संस्थांवर हल्ले होताहेत. हे राज्य पेटले आहे; पण इथे कोणी लक्ष देत नाहीत. रोज घरेदारे उद्ध्वस्त होताहेत. पंतप्रधान असो की केंद्रीय मंत्री असोत, आमच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे आम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत की नाही, अशी भीती ते व्यक्त करताहेत, असे शरद पवार म्हणाले. 

दरम्यान, नॉर्थ ईस्ट आणि कश्मिरी यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. त्याकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करतात, ही बाब खेदजनक आहे. एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांशी संवाद साधून तिथे शांतता राखायची असते. केंद्रीय संरक्षणमंत्री असताना हे करायचो, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. २४ जूनला आम्ही सगळे भेटणार आहोत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही तेव्हा असतील. त्यावेळी चर्चा करू, याच विषयाला प्राधान्य राहील, असे शरद पवारांनी सांगितले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार