शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

"आमच्यासारख्या लोकांनी जीव ओतून..."; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:31 IST

Sharad Pawar : राज्यात सुरु असलेल्या आरक्षणाच्या गोंधळावरुन शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Sharad Pawar on Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्याकाही दिवसांपासून राज्यात तापला आहे. मराठा आरक्षणाची मागणी सुरु असताना राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मनोज जरांगेची मागणी आहे. तर मराठा सामजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये असे ओबीसी समाजातील नेत्यांचे म्हणणं आहे.  या सगळ्याबाबत आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. दोघांमध्ये सामंजस्य कसं करता येईल यावर अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे हे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी जरांगे यांना तुम्ही आरक्षणाचा प्रश्न शरद पवार, उद्धव ठाकरे यांना का नाही विचारत असा सवाल करत आहेत. दुसरीकडे आरक्षणाच्या प्रश्नावर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जात आहे. मात्र आता शरद पवार यांनी आरक्षणावरुन सुरु असलेल्या गदारोळावरुन महत्त्वाचे विधान केलं आहे. एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

"महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे. तिथे कटुता, अवविश्वासाचं चित्र दिसतंय आणि हे भयावह आहे. मी महाराष्ट्रात कधीही असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे. यासाठी मुळात संवाद ठेवायला पाहिजे. पण आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक जीवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचा आहे. या प्रक्रियेत आमच्यासारख्या लोकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं," असं शरद पवार म्हणाले.

"दुर्दैवाने आता दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं नाही," असेही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaratha Reservationमराठा आरक्षणBeedबीड