शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

शंकरराव गेडाम अनंतात विलीन

By admin | Updated: November 7, 2014 00:41 IST

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव गेडाम यांच्यावर गुरुवारी अंबाझरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव गेडाम यांच्यावर गुरुवारी अंबाझरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शंकरराव गेडाम यांचे बुधवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता गिरीपेठ येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. अंबाझरी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना शासकीय सलामी दिली. यानंतर माजी कुलगुरू हरिभाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत विदर्भवादी भाऊ जांबुवंतराव धोटे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, माजी मंत्री रणजित देशमुख, विनोद गुडधे पाटील, अनिल देशमुख, आ. सुधाकरराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. माजी आमदार यादवराव देवगडे यांनी संचालन केले. या शोकसभेत आ. प्रकाश गजभिये, डॉ. गोविंद वर्मा, सलील देशमुख, विशाल मुत्तेमवार, माजी आमदार अशोक धवड, मधुकर वासनिक, केशवराव शेंडे, पुंडलिक जवंजाळ, जयप्रकाश गुप्ता, राजकुमार तिरपुडे, वामनराव कोंबाडे, एस.क्यू. जमा, हुकूमचंद आमधरे, दिलीप देशमुख, विठ्ठलराव टालाटुले, डॉ. भाऊ लोखंडे, रमेश गिरडे, अशोक धोटे, राम घोडे, रामभाऊ महाजन, बंडू उमरकर, नरेश मेश्राम, शिवकुमार अग्रवाल, रतिलाल मिश्रा, अ‍ॅड. मा.म. गडकरी, अरुण वनकर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकरराव गेडाम यांचे चिरंजीव संजय गेडाम यांना आज सकाळी फोन करून आपली शोकसंवेदना व्यक्त केली. तसेच महापौर प्रवीण दटके यांनी गिरीपेठ येथील निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. शासनातर्फे तहसीलदार अनिल गावित यांनी पुष्पचक्र अर्पण केले. स्वतंत्र विदर्भ हीच खरी श्रद्धांजलीज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरराव गेडाम हे राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. विदर्भाचे ते कट्टर समर्थक होते. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यासाठी विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा रेटून धरण्यात यावा, या शब्दात आपली शोकसंवेदना सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.