शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

तटकरेंच्या परिषदेला आव्हाडांची दांडी

By admin | Updated: January 17, 2017 04:16 IST

तटकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ठाण्याचे प्रभारी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यापासून ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांच्यापर्यंत सर्व नेते हजर असताना आव्हाड कुठे, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत छेडले असता आव्हाड हे वेगळे नसल्याची सारवासारव तटकरे यांनी केली.साधारण वर्षभरापूर्वी बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचे नाव आल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून त्यांंनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, प्रदेशपातळीवरून संजय भोईर यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. मात्र, भोईरांना हे पद देण्यावरून आव्हाड समर्थकांमध्ये नाराजी होती. ही नाराजी आ. आव्हाड यांनी बोलूनही दाखवली होती. तरीही, त्यांचा विरोध डावलून भोईर यांना हे पद दिले होते. भोईरांनी विरोधी पक्ष नेतेपदासह अनेक पदे भूषवल्यानंतरही सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आव्हाड व तटकरे एकत्र पत्रकार परिषदेला हजर राहिले, तर उभयतांना भोईर यांच्याबाबत एकच भूमिका घेणे अशक्य होईल आणि पक्षात मतभेद असल्याचे चित्र जाईल, त्यामुळे आव्हाड अनुपस्थित असल्याची जोरदार चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तटकरे यांना छेडले असता, महापालिका निवडणूक काळात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवली जाते. ते आपल्या कामात व्यस्त असतील, असे सांगत पक्षात स्थानिक पातळीवर कोणतेही मतभेद नसल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)>भोईर सत्तापिपासूविरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्यासह त्यांचे वडील देवराम भोईर, उषा भोईर या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल तटकरे म्हणाले की, काही लोक सत्तेसाठीच जन्माला आलेले असतात. सत्तापिपासू माणसे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करीत असतात. दोनचार माणसे इकडेतिकडे गेल्याने पक्षाचे अस्तित्व कमी होत नाही. संजय भोईरांना पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. मात्र, आता काहीतरी घबाड मिळवण्यासाठी ते तिकडे गेले असले तरी त्यांचा तिथे भ्रमनिरास होईल. कारण, येथे राष्ट्रवादीच सत्ता स्थापन करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. >निवडणूक आयोगाने दखल घ्यावीठाण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी बॅनर आणि झेंडे लावण्यात आले होते. प्रशासनाने कायदा, नैतिकतेने कारवाई करणे गरजेचे असून निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. >नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडचा दिला दाखलाठाण्यानंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महापालिकेने स्वत:चे मोरबे धरण विकत घेतले. पिंपरी-चिंचवड शहरही विकसित झाले आहे. मात्र, ठाण्याच्या सत्ताधाऱ्यांना ठाणेकरांची तहानदेखील भागवता आलेली नाही. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आपण पाटबंधारेमंत्री असताना प्रयत्न केले होते. मात्र, ठामपातील सत्ताधाऱ्यांनी केवळ टेंडरभोवती फिरत राहण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे पाण्याची समस्या अशीच रेंगाळत राहिली, असाही आरोप त्यांनी केला. >त्यांचा संसार सुखाचा होवो : पारदर्शक कारभाराच्या अटीवरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत युती करणार असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ ठाणे आणि मुंबई महापालिकेतील कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे. योग्य वेळी या कामांची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युतीची चर्चा अजूनही सुरूच आहे. त्यांचा संसार सुखाचा होवो, असा टोमणाही तटकरे यांनी लगावला.