शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

तटकरेंच्या परिषदेला आव्हाडांची दांडी

By admin | Updated: January 17, 2017 04:16 IST

तटकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ठाण्याचे प्रभारी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यापासून ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांच्यापर्यंत सर्व नेते हजर असताना आव्हाड कुठे, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत छेडले असता आव्हाड हे वेगळे नसल्याची सारवासारव तटकरे यांनी केली.साधारण वर्षभरापूर्वी बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचे नाव आल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून त्यांंनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, प्रदेशपातळीवरून संजय भोईर यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. मात्र, भोईरांना हे पद देण्यावरून आव्हाड समर्थकांमध्ये नाराजी होती. ही नाराजी आ. आव्हाड यांनी बोलूनही दाखवली होती. तरीही, त्यांचा विरोध डावलून भोईर यांना हे पद दिले होते. भोईरांनी विरोधी पक्ष नेतेपदासह अनेक पदे भूषवल्यानंतरही सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आव्हाड व तटकरे एकत्र पत्रकार परिषदेला हजर राहिले, तर उभयतांना भोईर यांच्याबाबत एकच भूमिका घेणे अशक्य होईल आणि पक्षात मतभेद असल्याचे चित्र जाईल, त्यामुळे आव्हाड अनुपस्थित असल्याची जोरदार चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तटकरे यांना छेडले असता, महापालिका निवडणूक काळात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवली जाते. ते आपल्या कामात व्यस्त असतील, असे सांगत पक्षात स्थानिक पातळीवर कोणतेही मतभेद नसल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)>भोईर सत्तापिपासूविरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्यासह त्यांचे वडील देवराम भोईर, उषा भोईर या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल तटकरे म्हणाले की, काही लोक सत्तेसाठीच जन्माला आलेले असतात. सत्तापिपासू माणसे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करीत असतात. दोनचार माणसे इकडेतिकडे गेल्याने पक्षाचे अस्तित्व कमी होत नाही. संजय भोईरांना पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. मात्र, आता काहीतरी घबाड मिळवण्यासाठी ते तिकडे गेले असले तरी त्यांचा तिथे भ्रमनिरास होईल. कारण, येथे राष्ट्रवादीच सत्ता स्थापन करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. >निवडणूक आयोगाने दखल घ्यावीठाण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी बॅनर आणि झेंडे लावण्यात आले होते. प्रशासनाने कायदा, नैतिकतेने कारवाई करणे गरजेचे असून निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. >नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडचा दिला दाखलाठाण्यानंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महापालिकेने स्वत:चे मोरबे धरण विकत घेतले. पिंपरी-चिंचवड शहरही विकसित झाले आहे. मात्र, ठाण्याच्या सत्ताधाऱ्यांना ठाणेकरांची तहानदेखील भागवता आलेली नाही. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आपण पाटबंधारेमंत्री असताना प्रयत्न केले होते. मात्र, ठामपातील सत्ताधाऱ्यांनी केवळ टेंडरभोवती फिरत राहण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे पाण्याची समस्या अशीच रेंगाळत राहिली, असाही आरोप त्यांनी केला. >त्यांचा संसार सुखाचा होवो : पारदर्शक कारभाराच्या अटीवरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत युती करणार असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ ठाणे आणि मुंबई महापालिकेतील कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे. योग्य वेळी या कामांची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युतीची चर्चा अजूनही सुरूच आहे. त्यांचा संसार सुखाचा होवो, असा टोमणाही तटकरे यांनी लगावला.