शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

बीए मराठीच्या अभ्यासक्रमात तरुणींबाबत लज्जास्पद कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 4:39 PM

परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी समाज दु:खीकविता वगळण्याची मुंबई विद्यापीठावर नामुष्कीसोशल मिडियावर नेटकऱ्यांमध्येही कवितेवर सुंदोपसुंद

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परीक्षांचे निकाल वेळेत लावू न शकणाऱ्या मुंबई विद्यापीठाने आता नवाच वाद ओढवून घेतला आहे. एकीकडे मुलींवर अत्याचार वाढत असल्याचे चित्र असताना विद्यापीठाने थेट पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणींबाबत अश्लील उल्लेख असलेली कविता अभ्यासक्रमात समाविष्ट केली. राज्यभरात याबाबत संताप निर्माण झालेला असताना यवतमाळात आदिवासी कार्यकर्त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या पेपर सहामध्ये ‘महानगरीय जाणीवेचे साहित्य’ हा घटक अंतर्भूत आहे. या घटकात कवी दिनकर मनवर यांचा ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ हा कवितासंग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु, या संग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेत आदिवासी समाजाच्या तरुणींबाबत अश्लील उल्लेख असल्याने आदिवासी संघटना संतप्त झाल्या आहेत. ‘काळं असावं पाणी कदाचित, पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं, किंवा आदिवासी पोरीच्या ...सारखं जांभळं’ या ओळींमध्ये आदिवासी महिला, मुलींविषयी लज्जास्पद उल्लेख आला. सकल आदिवासी समाजाचा अपमान करणारी ही ओळ असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी संताप नोंदविला. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ७०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील तसेच दूरशिक्षण विभागातील पदवीच्या विद्यार्थ्यांना ही कविता अभ्यासण्यासाठी देण्यात आली आहे. त्यातून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आदिवासी तरुणींना भयंकर मानसिक त्रास भोगावा लागू शकतो.त्यामुळे ही कविता अभ्यासक्रमातून वगळावी, अभ्यासक्रम निवड मंडळाने ही कविता कोणत्या निकषावर अभ्यासक्रमात घेतली याचा तपास केला जावा, अशी मागणी बिरसा क्रांती दल आणि गोंडवाणा गणतंत्र पार्टीने केली आहे. कवी दिनकर मनवर, अभ्यासक्रम निवड समिती व कवितासंग्रह छापणाऱ्या पॉप्युलर प्रकाशन यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.कविता वगळली, गुन्हे नोंदवाराज्यभरातून आदिवासी संघटनांनी आवाज उठविताच मुंबई विद्यापीठ सावध झाले. मराठी अभ्यास मंडळाचा तातडीने ठराव घेऊन संबंधित आक्षेपार्ह कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली. या कवितेवर परीक्षेत प्रश्न विचारला जाणार नाही, ही कविता कोणत्याही महाविद्यालयात शिकवू नये, असा आदेश विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव सुनिल भिरुड यांनी काढले. मात्र, संबंधित कवी, निवड समिती आणि प्रकाशकावर गुन्हे दाखल न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बिरसा क्रांतीदलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम यांनी दिला आहे.सोशल मिडियावरही सुंदोपसुंदया कवितेवरून सोशल मिडियावर बरेच वादप्रतिवाद दररोज झडत आहेत. जुन्या प्रतिष्ठित कवींच्या कवितांचे दाखले दिले जात आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र् याची परिमाणे तपासली जात आहेत. या सर्व चर्चेला कुठे विराम मिळतो तेच आता पाहणे बाकी आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षणliteratureसाहित्य