शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

शाहीस्नानासाठी नदी, तलावाचा वापर नको

By admin | Updated: September 22, 2015 01:29 IST

कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला होणाऱ्या शाही स्नानासाठी नदी व तलावातील पाणी वापरण्यात येणार नसल्याची हमी राज्य सरकारने द्यावी

मुंबई : कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला होणाऱ्या शाही स्नानासाठी नदी व तलावातील पाणी वापरण्यात येणार नसल्याची हमी राज्य सरकारने द्यावी,असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. याबाबत मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे. न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एल़ अचलिया यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ यावेळी राज्य सरकारने १८ सप्टेंबरला झालेल्या शाही स्नानासाठी एक टीएमसी पाणी वापरण्यात आल्याची माहिती न्यायालयात दिली. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी राज्य सरकार पाणी सोडत आहे, त्याला निर्बंध घालावा, अशी याचिका पुण्यातील प्रा. एच.एम. देसर्डा यांनी दाखल केली होती. त्यावर १४ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारला पाण्याच्या योग्य वापराबाबत निर्देश देतानाच याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळत १८ सप्टेंबरच्या शाही स्नानाबाबत अतिरिक्त पाणी सोडण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारने पाण्याच्या वापराबाबतच्या धोरण, त्याचा प्राधान्यक्रम काय आहे, अशी विचारणा केली. प्रथम पिण्यासाठी पाणीपुरवठा करायला हवा, शाही स्नानासाठीचा वापर अखेरचा असला पाहिजे, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने १२ वर्षांतून एकदाच ही पर्वणी येते़ हा धार्मिक व राष्ट्रीय सोहळा असल्याने भक्तांच्या भावनांचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. याबाबत सरकारी अभियोक्ता अभिनंदन वंग्यानी यांनी १८ सप्टेंबर रोजी एक टीएमसी पाणी वापरण्यात आले होते, आणि २५ सप्टेंबरच्या सोहळ्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे यावेळी सांगितले.