शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

शाहीस्नानासाठी नदी, तलावाचा वापर नको

By admin | Updated: September 22, 2015 01:29 IST

कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला होणाऱ्या शाही स्नानासाठी नदी व तलावातील पाणी वापरण्यात येणार नसल्याची हमी राज्य सरकारने द्यावी

मुंबई : कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला होणाऱ्या शाही स्नानासाठी नदी व तलावातील पाणी वापरण्यात येणार नसल्याची हमी राज्य सरकारने द्यावी,असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. याबाबत मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे. न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एल़ अचलिया यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ यावेळी राज्य सरकारने १८ सप्टेंबरला झालेल्या शाही स्नानासाठी एक टीएमसी पाणी वापरण्यात आल्याची माहिती न्यायालयात दिली. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी राज्य सरकार पाणी सोडत आहे, त्याला निर्बंध घालावा, अशी याचिका पुण्यातील प्रा. एच.एम. देसर्डा यांनी दाखल केली होती. त्यावर १४ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारला पाण्याच्या योग्य वापराबाबत निर्देश देतानाच याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळत १८ सप्टेंबरच्या शाही स्नानाबाबत अतिरिक्त पाणी सोडण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारने पाण्याच्या वापराबाबतच्या धोरण, त्याचा प्राधान्यक्रम काय आहे, अशी विचारणा केली. प्रथम पिण्यासाठी पाणीपुरवठा करायला हवा, शाही स्नानासाठीचा वापर अखेरचा असला पाहिजे, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने १२ वर्षांतून एकदाच ही पर्वणी येते़ हा धार्मिक व राष्ट्रीय सोहळा असल्याने भक्तांच्या भावनांचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. याबाबत सरकारी अभियोक्ता अभिनंदन वंग्यानी यांनी १८ सप्टेंबर रोजी एक टीएमसी पाणी वापरण्यात आले होते, आणि २५ सप्टेंबरच्या सोहळ्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे यावेळी सांगितले.