शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

..हा तर बाद झालेला शहा

By admin | Updated: October 10, 2014 08:57 IST

वाघाला हे कसले उंदीर करणार, हा तर बाद झालेला शहा आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

पुणे : आग्य्राच्या बादशहापुढे छत्रपती शिवाजीमहाराजांनी झुकण्यास नकार दिला. ते म्हणाले होते, मी फक्त आई- वडील, दैवतासमोर झुकेन. वाघाला हे कसले उंदीर करणार, हा तर बाद झालेला शहा आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. 
पुण्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ठाकरे यांनी अमित शहा यांना लक्ष्य केले. शहा यांनी काल वाघाचे पुन्हा उंदीर करायचे, अशी टीका केली होती. त्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ''विजापूरच्या बादशहापुढे विडा उचलताना अफझलखान म्हणाला होता- हा पहाड का चुहा है, मैं उसे ऐसा दबाके मारूंगा. महाराजांना त्यांनी मिठी मारली., तेव्हा महाराजांनी आपली वाघनखे काढली. माझी वाघनखे समोर बसली आहेत. हे कोणाला राजकीय वर्णन आहे असे वाटेल. ज्याने त्याने ते पाहावे.'' 
महायुती का तुटली हे सांगताना ठाकरे म्हणाले, ''दिल्लीत सत्ताबदल झाला. जनतेने राज्यातही सोन्याचे ताट वाढून ठेवले होते. पण, काही लोकांना अनुकूल काळात विपरित बुद्धी सुचते. युद्धात आता केवळ अर्जुन (डांगळे) आपल्याबरोबर आहे.'' काल दिलेल्या त्या मताची अगोदर किंमत द्या, असे सांगत त्यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, ''भाजपाकडे कोणता चेहरा आहे. दिल्लीच्या नावावर शेपटू हलविणारा मुख्यमंत्री हवा का?. आम्हाला या मातीत जन्मलेला, या मातीचा स्वाभिमान असलेला मुख्यमंत्री हवा आहे.''
लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस व राष्ट्रवादीचे कपडे उतरविले. पुण्यातील योजनांचा दाबलेला पैसा आता बाहेर पडतोय., तुमच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील अश्रू मला दिसतात, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ''
सभेला संपर्कनेते गजानन कीर्तीकर, प्रवक्त्या नीलम गोर्‍हे, रिपब्लिकन पक्षाचे अर्जुन डांगळे, माजी मंत्री शशिकांत सुतार, शहर अध्यक्ष अजय भोसले, पुणे शहरातील शिवसेनेचे उमेदवार आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, श्याम देशपांडे, मिलिंद एकबोटे, सचिन तावरे, प्रशांत बधे, सुनिल टिंगरे, परशुराम वाडेकर आदि उपस्थित होते. 
(प्रतिनिधी)
 
■ राजकारणाचा एक शब्दही न बोलता, तुमच्या काय योजना आहे ते मांडा, माझ्या काय योजना आहेत त्या मांडतो. मग, जनतेला निर्णय घेऊन द्या, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना आव्हान दिले.