शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत पाण्याबाबत स्वयंपूर्ण होणार, मुंबईत उभारणार सांडपाणी प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:53 IST

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने (आरसीएफ), औद्योगिक वापरासाठी लागणाºया पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आहे.

मुंबई : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने (आरसीएफ), औद्योगिक वापरासाठी लागणाºया पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आहे. मुंबईतील कारखान्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी, आरसीएफने सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम सुरू केले असून, २०१९ नंतर आम्हाला मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे, आरसीएफचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश धात्रक यांनी स्पष्ट केले.आरसीएफच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर, आयोजित पत्रकार परिषदेत धात्रक म्हणाले की, ‘आरसीएफच्या मुंबईतील कारखान्याला महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे, पालिकेकडून औद्योगिक आस्थापनांच्या पाणीपुरवठ्याला कात्री लावली जाते. आरसीएफने २१० कोटींच्या सांडपाणी प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली आहे. २०१९ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून, त्यानंतर आरसीएफला पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरज नसेल,’ असे धात्रक यांनी स्पष्ट केले.आरसीएफच्या प्रस्तावित प्रकल्पात दररोज २२.७५ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. यातून १५ टक्के शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. यातून आरसीएफच्या औद्योगिक पाण्याची गरज भागणार आहे. शिवाय, बीपीसीएलच्या औद्योगिक केंद्रालाही यातून पाणी मिळेल, अशी माहिती धात्रक यांनी दिली.अव्यवहार्य प्रकल्प बंद केल्यामुळे, २०१६-१७ या आर्थिक वर्षात आरसीएफची कमाई ७ टक्क्यांनी घटली आहे. मात्र, कंपनीचा निव्वळ नफा १७२.६२ कोटींवरून १७९.२६ कोटींवर पोहोचल्याचे धात्रक यांनी सांगितले. खराब वातावरणामुळे शेतीला बसलेला फटका आणि त्यामुळे खते, रसायनांच्या मागणीत झालेली घट, या पार्श्वभूमीवर २०१६-१७ या वर्षात आरसीएफची कामगिरी समाधानी असल्याचेही धात्रक यांनी स्पष्ट केले.नैसर्गिक वायूंचा तुटवडा लक्षात घेत, थलचर (ओडीसा) येथे कोळशावरील कारखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल इंडिया, गेल लिमिटेड आणि फर्टिलायझर्स कार्पोरेशन आॅफ इंडियाच्या सहकार्याने, थलचर येथे फर्टिलाझर कॉप्लेक्स उभारले जाईल. थलचर येथील प्रकल्पासाठी थलचर फर्टिलायझर्स या उपकंपनीची स्थापना करण्यात आली असून, एकूण १० हजार कोटींचा हा प्रकल्प असल्याचे धात्रक यांनी सांगितले.