शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

दोन वर्षांत पाण्याबाबत स्वयंपूर्ण होणार, मुंबईत उभारणार सांडपाणी प्रक्रिया केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:53 IST

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने (आरसीएफ), औद्योगिक वापरासाठी लागणाºया पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आहे.

मुंबई : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने (आरसीएफ), औद्योगिक वापरासाठी लागणाºया पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आहे. मुंबईतील कारखान्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी, आरसीएफने सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम सुरू केले असून, २०१९ नंतर आम्हाला मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे, आरसीएफचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उमेश धात्रक यांनी स्पष्ट केले.आरसीएफच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर, आयोजित पत्रकार परिषदेत धात्रक म्हणाले की, ‘आरसीएफच्या मुंबईतील कारखान्याला महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे, पालिकेकडून औद्योगिक आस्थापनांच्या पाणीपुरवठ्याला कात्री लावली जाते. आरसीएफने २१० कोटींच्या सांडपाणी प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात केली आहे. २०१९ पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून, त्यानंतर आरसीएफला पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची गरज नसेल,’ असे धात्रक यांनी स्पष्ट केले.आरसीएफच्या प्रस्तावित प्रकल्पात दररोज २२.७५ दशलक्ष लीटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. यातून १५ टक्के शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. यातून आरसीएफच्या औद्योगिक पाण्याची गरज भागणार आहे. शिवाय, बीपीसीएलच्या औद्योगिक केंद्रालाही यातून पाणी मिळेल, अशी माहिती धात्रक यांनी दिली.अव्यवहार्य प्रकल्प बंद केल्यामुळे, २०१६-१७ या आर्थिक वर्षात आरसीएफची कमाई ७ टक्क्यांनी घटली आहे. मात्र, कंपनीचा निव्वळ नफा १७२.६२ कोटींवरून १७९.२६ कोटींवर पोहोचल्याचे धात्रक यांनी सांगितले. खराब वातावरणामुळे शेतीला बसलेला फटका आणि त्यामुळे खते, रसायनांच्या मागणीत झालेली घट, या पार्श्वभूमीवर २०१६-१७ या वर्षात आरसीएफची कामगिरी समाधानी असल्याचेही धात्रक यांनी स्पष्ट केले.नैसर्गिक वायूंचा तुटवडा लक्षात घेत, थलचर (ओडीसा) येथे कोळशावरील कारखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल इंडिया, गेल लिमिटेड आणि फर्टिलायझर्स कार्पोरेशन आॅफ इंडियाच्या सहकार्याने, थलचर येथे फर्टिलाझर कॉप्लेक्स उभारले जाईल. थलचर येथील प्रकल्पासाठी थलचर फर्टिलायझर्स या उपकंपनीची स्थापना करण्यात आली असून, एकूण १० हजार कोटींचा हा प्रकल्प असल्याचे धात्रक यांनी सांगितले.