शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॉली कालव्यात पडून सात ऊसतोड मजूर बेपत्ता

By admin | Updated: February 19, 2015 01:54 IST

सोलापूर-पुणे महामार्गावरील उजनी मुख्य कालव्याच्या पुलावरून ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने सात ऊसतोड मजूर बेपत्ता झाले आहेत़ ही घटना बुधवारी पहाटे २़३०च्या सुमारास घडली़

डी. एस. गायकवाड ल्ल टेंभुर्णीसोलापूर-पुणे महामार्गावरील उजनी मुख्य कालव्याच्या पुलावरून ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने सात ऊसतोड मजूर बेपत्ता झाले आहेत़ ही घटना बुधवारी पहाटे २़३०च्या सुमारास घडली़ शेतकऱ्याच्या नकळत ऊसतोडीचे पैसे घेऊन नगर जिल्ह्यातील हे मजूर रातोरात गाव सोडून जात होते.ऊसतोड करणारे मजूर पळून गेल्याची माहिती शेतकरी बाळासाहेब सोपान चंदनकर यांना मिळताच त्यांनी आपला भाऊ सहदेव यांच्यासह जीपमधून या मजुरांचा पाठलाग केला. भीमानगर येथे त्यांना हा ट्रॅक्टर दिसला़ तेव्हा त्यांनी चालकास ट्रॅक्टर थांबवण्यास सांगितले. परंतु ट्रॅक्टर न थांबता ऊसतोड मजूर घेऊन तसाच पुढे निघाला़ यावेळी चंदनकर बंधूंनी त्यांच्यावर दगडफेक केली़ शेतकऱ्याला चुकविण्याच्या नादात, घाबरलेल्या चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पुणे-सोलापूर महामार्गावरील उजनीच्या कालव्यात पडला़ उजनी कालव्यात सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने तो पूर्णक्षमतेने भरून वाहत आहे़ रात्रीची वेळ असल्याने ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही़या दुर्घटनेमध्ये ट्रॅक्टरमधील चालक बाळासाहेब जगन्नाथ गुंजाळ (३०), रेखा अंबादास गुंजाळ (३०), कविता बाळासाहेब गुंजाळ (२५), हिरा राजू मोरे (२५), अर्जुन राजू मोरे (६), कार्तिक राजू मोरे (४), शुभम बाळासाहेब गुंजाळ (५) हे सर्व वाहून गेल्याचे पोलिसांनी सांगितले़ अंबादास सीताराम गुंजाळ (३९) व राजू सर्जेराव मोरे (३०) हे दोघे पोहून बाहेर निघाले़ बुधवारी सकाळी १०़१५ वाजता ते टेंभुर्णी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला़कालव्यातील प्रवाह थांबविण्याची विनंती पोलीस प्रशासनाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केली़ मात्र संबंधितांनी त्यांची दखल न घेता तांत्रिक अडचण सांगत पाणीप्रवाह सुरूच ठेवल्याने तपासाला अडसर निर्माण होत आहे़ (वार्ताहर)पोलिसांची धावपळ : घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांचे पथक क्रेन, रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले़ तपास यंत्रणा वेगाने कामाला लागली़ क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर काढण्यात आली, परंतु त्यामध्ये एकही व्यक्ती आढळली नाही़चंदनकर बंधूंवर गुन्हा दाखलगावाकडे निघालेल्या ऊसतोड मजुरांचा पाठलाग करून त्यांच्यावर दगडफेक करून त्यांच्या अपघातास जबाबदार धरून बाळासाहेब चंदनकर व बळीराम चंदनकर यांच्यावर ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करणार असल्याचे अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी सांगितले़