शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

यवतमाळातील सात ठार

By admin | Updated: May 26, 2014 01:12 IST

वास्तुशांती व लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी वाशिम तालुक्यातील टनका या गावी आलेले मुंबई येथील जोगेश्‍वरी भागातील एका कुटुंबीतील सदस्य मुंबईस परतण्यासाठी वाशिमकडे येत असताना

दोन अपघात : मुंबईकडे जाताना वाशिम येथे मायलेकांसह तिघांचा मृत्यू

वाशिम : वास्तुशांती व लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी वाशिम तालुक्यातील टनका या गावी आलेले मुंबई येथील जोगेश्‍वरी भागातील एका कुटुंबीतील सदस्य मुंबईस परतण्यासाठी वाशिमकडे येत असताना त्यांची टोयाटो क्वॉलीस जीप रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये मायलेकीसह तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये तीन बालकांसह १0 जणांचा समावेश आहे. ही घटना वाशिम ते हिंगोली महामार्गावरील तोंडगाव फाट्यानजीक २४ मेच्या उत्तररात्री ३ वाजताच्या सुमारास घडली.

या अपघातामध्ये सिंधू डिगांबर भालेराव, वैष्णवी डिगांबर भालेराव (माय-लेकी) व वसंत योगीराज कांबळे या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये सुवर्णा वसंत कांबळे, प्रणिता विजय इंगोले, गुंजन विनोद राऊत, सचिन वसंत कांबळे, स्नेहा वरुण कांबळे, तन्वी विनोद राऊत, वेदांत विनोद इंगोले, विनोद धोंडबा राऊत व वाहन चालक विजय देवीदास इंगोले यांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे वास्तव्य असलेले डिगांबर रामा भालेराव यांचे कुटुंब गेल्या १५ ते २0 वर्षांंंंपासून जोगेश्‍वरी वेस्ट मुंबई येथे वास्तव्य करीत आहेत. वाशिम तालुक्यातील सोंडा व टनका येथे वास्तुशांती व लग्नसमारंभाच्या निमित्ताने भालेराव, इंगोले, राऊत व कांबळे कुटुंब आले होते. यामध्ये डिगांबर रामा भालेराव, त्यांच्या पत्नी सिंधू डिगांबर भालेराव, मुलगी वैष्णवी डिगांबर भालेराव (१४), वसंत योगीराज कांबळे (३६), सुवर्णा वसंत कांबळे (२८), प्रणिता विजय इंगोले (२५), गुंजन विनोद राऊत (३0), सचिन वसंत कांबळे (१५), स्नेहा वरुण कांबळे (९), तन्वी विनोद राऊत (४), वेदांत विनोद इंगोले (३), विनोद धोंडबा राऊत व वाहन चालक विजय देवीदास इंगोले (२८) यांचा समावेश आहे.

हे कुटुंब मुंबईहून वाशिमला १७ मे रोजी आले होते. या कुटुंबाने नातेवाईकाकडील वास्तुशांती व लग्नसमारंभाचे कार्यक्रम आटोपले. आपल्या नातेवाईकाकडील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर वाशिम तालुक्यातील टनका येथून २४ मे रोजी रात्री २ वाजता मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

परतीच्या प्रवासाला वाशिमकडे येत होते. दरम्यान, तोंडगाव फाट्याजवळ रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत सीजी 0७ सीए 0८६७ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकला रिफ्लेक्टर व इंडिकेटर नसल्याने वाहनचालक विजय इंगोले याला ट्रक दिसला नाही. भरधाव वेगात असलेली क्वॉलीस जीप उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की क्वॉलीस जीपचा अक्षरश: चुराडा झाला. (प्रतिनिधी)