शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सातही दिवस दुकाने खुली!

By admin | Updated: March 22, 2015 02:39 IST

महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील ३६५ दिवसही आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक होती.

नोकरांना साप्ताहिक सुटी बंधनकारक : महिला कर्मचाऱ्यांना रात्री ९.३० पर्यंत काम !मुंबई : महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील ३६५ दिवसही आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक होती. मात्र आता राज्य शासनाने हे बंधन उठविले आहे. महिला कर्मचाऱ्यांना रात्री ८ नंतर कामावर ठेऊ नये, असे आदेश होते. आता त्यात दीड तासाची सवलत देत ही वेळ रात्री ९.३० अशी करण्यात आली आहे.व्यापारी, व्यावसायिक कर्मचाऱ्यांना सुटी देत नाहीत, म्हणून आठवड्यातून एक दिवस दुकान बंद ठेवण्याची सक्ती शासनाने केली होती. परिणामत: ठोक व चिल्लर विक्रेते आठवड्यातून एक दिवस आपले दुकान बंद ठेवत होते. त्या त्या शहरातील व बाजार ओळीतील परंपरेनुसार कुठे रविवार, कुठे मंगळवार तर कुठे बुधवारी दुकाने बंद राहत होती. या व्यापाऱ्यांना होळी-दिवाळीसारख्या सणांना दुकान उघडे ठेवायचे असेल तर कामगार विभागाकडून विशेष परवानगी घ्यावी लागत होती. विनापरवानगी दुकान उघडे दिसल्यास कारवाईला सामोरे जावे लागत होते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही समस्या अधिक होती. नव्या अधिसूचनेमुळे या जाचातून आता व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. आता दुकान वर्षाचे संपूर्ण ३६५ दिवस खुले ठेवता येणार असले तरी कर्मचाऱ्यांना मात्र आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक आहे. त्यात केवळ त्यांना रोटेशनने सुटी देण्याची सवलत देण्यात आली आहे.च्एका दिवशी ९ तासांपेक्षा अधिक व आठवड्यात ४८ तासांपेक्षा अधिक काम कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जाणार नाही याची खबरदारी व्यापारी-व्यावसायिकांना घ्यावी लागेल.च्मध्य प्रदेश, दिल्लीत सर्व दिवस व्यापार सुरू ठेवण्याची सवलत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील रिटेल व्यापारी महासंघाने हा पॅटर्न लागू करण्याची मागणी केली. शासनाने ती मान्य केली.च्वर्षभरासाठी ही सवलत लागू असून, त्यानंतर फेरआढावा घेऊन ही सवलत कायम ठेवायची की बंद करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.३५ लाख दुकानदारांना याचा फ ायदा होईल. आठवडाभर मॉल, बडी दुकाने सुरू राहायची. मात्र एक दिवसाच्या सुटीची अट होती. ती काढल्याने व्यवसाय नक्कीच वाढेल. नोकरांना एक दिवस सुटी देण्याची अट नक्कीच पाळू.- वीरेन शहा, अध्यक्ष, फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनआतापर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठान आठवड्यातून एक दिवस बंद राहत असल्याने कामगारांना हक्काची सुटी मिळायची. आता ती प्रतिष्ठानच्या मालकांच्या मर्जीवर अवलंबून राहील, असा धोका नवीन आदेशात आहे. सुटीची अंमलबजावणी होते की नाही, यावर कामगार विभागाने लक्ष ठेवले पाहिजे. - एम. ए.पाटीलअध्यक्ष, सर्व श्रमिक संघ.