शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गदारोळानंतर निघाला तोडगा, अविश्वासावर आज पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:43 IST

विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यावरील अविश्वास ठराव मांडू दिला जात नसल्याच्या विरोधात विरोधी पक्ष सदस्यांनी

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यावरील अविश्वास ठराव मांडू दिला जात नसल्याच्या विरोधात विरोधी पक्ष सदस्यांनी सोमवारी सभागृहात केलेल्या गदारोळामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले. शेवटी अध्यक्षांच्या दालनात बैठक होऊन तोडगा निघाला आणि कामकाज सुरळीत झाले.कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अविश्वास प्रस्ताव मांडू देण्याची मागणी केली. विरोधकांचा अविश्वासाचा ठराव दिलेला असताना तो चर्चेला न आणता मुख्यमंत्र्यांनी गेल्या शुक्रवारी अध्यक्षांवरील विश्वास प्रस्ताव मांडला व आवाजी मतदानाने तो मंजूरही करण्यात आला होता. त्यावर संतप्त विरोधी सदस्यांनी सभागृह संपूनही तेथेच ठाण मांडले आणि सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली होती.विखे पाटील आज सभागृहात म्हणाले की, अविश्वास ठराव आणण्याचा विरोधकांचा घटनात्मक अधिकार हिरावून घेणे हा अन्याय आहे. माजी विधानसभाध्यक्ष राष्ट्रवादीचे जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अविश्वास प्रस्ताव मांडू देण्याची जोरदार मागणी केली. अध्यक्षांनी त्यास अनुमती देऊन सभागृहाची आणि अध्यक्षपदाचीही गरिमा राखावी, असे सांगून वळसे पाटील म्हणाले की, विलासराव देशमुख यांच्या सरकारवर तेव्हाच्या विरोधी पक्षाने अविश्वास आणला तेव्हा त्याच्या आधीच विलासरावांनी विश्वास ठराव मंजूर करवून घेतला होता. तो त्यांच्या सरकारविरुद्धचा प्रस्ताव होता पण इथे अध्यक्षांविरुद्ध प्रस्ताव आलेला असताना त्यांच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव आणणे योग्य नव्हते. ‘विरोधकांना अविश्वास ठराव मांडू द्यावा, चर्चेने तो मागेही घेता येईल, असे संकेत विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी दिले.मुख्यमंत्री यावर म्हणाले की, विलासरावांनी जो ठराव मांडण्यापूर्वी अध्यक्षांना नोटीस दिलेली नव्हती. आम्ही तर नोटीस देऊन नियमाप्रमाणे ठराव मांडला. विलासरावांनी मांडलेल्या ठरावाचे तत्व अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाबाबतही लागू होते.अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून विरोधकांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. गदारोळात कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. दरम्यान, अध्यक्षांच्या दालनात सर्व गटनेत्यांची बैठक होऊन तोडगा निघाला आणि कामकाज सुरळीत झाले. उद्या विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव कामकाजात घेतला जाईल. त्यावर काही सदस्यांना बोलू दिले जाईल आणि नंतर तो मागे घेतला जाईल, अशी शक्यता आहे.