शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुंबईसाठी सीईओ नेमणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 10, 2014 08:40 IST

मुंबईसाठी सीईओ नेमणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच शक्यता जास्त असे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला विरोध केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० -  मुंबईसाठी सीईओ नेमणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच शक्यता जास्त असे सांगत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. मुंबई महानगरपालिकेला कमजोर करायचे व दुसर्‍या बाजूला ही ‘सीईओ’सारखी भुते उभी करून नवे पेच टाकायचे. यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढीस लागणार आहेत, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजधानीविषयी निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसारख्या पक्षाचे मत विचारात घेतले तर बरे होईल, असा इशाराही लेखातून देण्यात आला आहे. यापूर्वीही शिवसेनेने मुंबईसाठी सीईओ नेमण्यास विरोध केला होता. सीईओ नेमणे म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव आहे असा आरोप शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी केला होता. आजच्या अग्रलेखातून सेनेची विरोधाची भूमिकाच कायम राहिल्याचे दिसत आहे. 
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व मुंबईसारख्या मोठ्या शहरांचे काही प्रश्‍न आहेत. हेच प्रश्‍न कोलकाता, बंगळुरू, दिल्ली, गुरगाव, हैदराबादसारख्या शहरांचे असू शकतात. लोकसंख्येचे लोंढे मोठ्या शहरांवर आदळत आहेत व त्याचा भार नागरी सुविधांवर पडत आहे. पण त्यासाठी ‘सीईओ’ नेमून काय होणार? याआधी विकास वगैरे करण्याच्या नावाखाली ‘एमएमआरडीए’नामक प्रकरण मुंबईच्या बोडक्यावर मारले गेले. त्या ‘एमएमआरडीए’ने काय दिवे लावले? याचाही अभ्यास राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी केला तर बरे होईल. 
 
- मुंबई महानगरपालिकेला कमजोर करायचे व दुसर्‍या बाजूला ही ‘सीईओ’सारखी भुते उभी करून नवे पेच टाकायचे. यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढीस लागणार आहेत. तेव्हा मुंबईसाठी स्वतंत्र ‘सीईओ’ नेमणे म्हणजे आजारापेक्षा इलाज भयंकर अशीच शक्यता जास्त. 
 
- त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकार केवळ राजकीय हेतूने यापूर्वीच्या कॉंग्रेस राजवटींनी कमी केले ते अधिकार विद्यमान मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला परत बहाल करावेत अथवा विशेषाधिकार द्यावेत. तसे केले तर मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याची गरजच उरणार नाही. मुळात मुंबई महानगरपालिकेची तिजोरी प्रशासकीय भार वाहून रिकामी होत आहे. त्यात वर्षानुवर्षे आदळणार्‍या लोंढ्यांचा भार दिवसागणिक वाढतच असून त्याचा असह्य ताण महापालिका पुरवीत असलेल्या किमान नागरी सेवासुविधांवर पडत आहे. त्यामुळेही महापालिकेच्या तिजोरीवरील बोजा वाढला आहे. 
 
- वास्तविक मुंबईतून केंद्राला वर्षाकाठी पावणेदोन लाख कोटी रुपये जातात. पण त्यातला किती भाग मुंबईच्या विकासाला परत मिळतो? म्हणजे त्यातील दमडीही द्यायची नाही आणि वर हे
‘सीईओ’सारखे प्रकार मुंबईच्या छाताडावर लादायचे. मुंबईतील उद्योजक, व्यापारी, बिल्डर वगैरेंना येथे फक्त पैसा आणि पैसाच दिसतो व राज्यकर्ते त्यांच्या कलाने वागत असतात; पण या मुंबईत मध्यमवर्गीय, गोरगरीब जनतादेखील राहते व त्यांच्या घरादारांचे, पाणी, आरोग्याचे प्रश्‍न आहेत व त्यासाठी नव्या राज्य सरकारने कोणत्या ठोस योजना आखल्या आहेत?
 
- विद्यमान मुख्यमंत्र्यांना राज्यात चांगले काम करायचे आहे, पण महाराष्ट्राच्या राजधानीविषयी निर्णय घेताना शिवसेनेसारख्या पक्षाचे मत विचारात घेतले तर बरे होईल. मुंबई देशाचे पोट भरते, पण मुंबईचे पोट कोण भरणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या कायम शुभेच्छा आहेत. मात्र मुंबईचे शाप घेऊ नका, ही कळकळीची विनंती आहे.