शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण केंद्रे उभारावी

By admin | Updated: July 6, 2017 03:41 IST

राजकारणातून उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवले पाहिजेत. त्यासाठी देशभरात विविध

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राजकारणातून उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवले पाहिजेत. त्यासाठी देशभरात विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारली जावीत, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी व्यक्त केली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे हजारे यांनी या वेळी सांगितले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटतर्फे केंद्रीय यूपीएससी परीक्षेत देशातून पहिली आलेली नंदिनी के. आर. आणि तिसरा आलेला गोपालकृष्ण रोनांकी यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, तेलंगणातील पोलीस अधिकारी महेश भागवत, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालास्वामी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी चेअरमन डी. पी. अगरवाल उपस्थित होते.अण्णा हजारे म्हणाले, ‘‘नव्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कथनी आणि करनी एक असेल तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. देशात चारित्र्यसंपन्न अधिकारी निर्माण झाले तर गेल्या ७० वर्षांत देशात जे कार्य झाले नाही ते कार्य अवघ्या १० वर्षांत देश बदलू शकेल.’’सत्काराला उत्तर देताना नंदिनी के. आर. म्हणाली, की प्रेरणा, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त होते. यशप्राप्तीनंतर आपली पाळेमुळे विसरता कामा नयेत. मुलांचा कल जिकडे असेल त्या क्षेत्रात यशप्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे.या वेळी विश्वनाथ कराड, मेजर जनरल दिलावर सिंग, गोपाळकृष्ण रोनांकी यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. सुजीत धर्मपात्र यांनी आभार मानले. फक्त भाषणाने समाज बदलत नाहीनिवडणुका आल्या की आपल्याकडे दोन-दोन तास फक्त भाषणांचा भडिमार जनतेवर होतो. मात्र भाषणाने समाज बदलत नाही, त्याला शब्द आणि कृतीची जोड लागते, असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय नेत्यांना लगावला.समाजाकडून तुमच्याबद्दल भरपूर अपेक्षा आहेत. यंत्रणेमध्ये काम करताना अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करावे. आपली निर्णयक्षमता व इच्छाशक्तीच्या जोरावर चांगले प्रशासन येऊ शकते. आपले निर्णय समाजाभिमुख कसे असतील, यावर अधिक लक्ष केंद्रित करावे.- डी. पी. अगरवालयूपीएसी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करून चांगले प्रशासन निर्माण करावे. सतत नवीन गोष्टी शिकून आपल्या कामाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे आपला अधिक कल असायला हवा.- एन. गोपालास्वामी