शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकप्रतिनिधींसाठी प्रशिक्षण केंद्रे उभारावी

By admin | Updated: July 6, 2017 03:41 IST

राजकारणातून उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवले पाहिजेत. त्यासाठी देशभरात विविध

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राजकारणातून उच्चशिक्षित आणि चारित्र्यसंपन्न लोकप्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवले पाहिजेत. त्यासाठी देशभरात विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारली जावीत, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी व्यक्त केली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे हजारे यांनी या वेळी सांगितले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटतर्फे केंद्रीय यूपीएससी परीक्षेत देशातून पहिली आलेली नंदिनी के. आर. आणि तिसरा आलेला गोपालकृष्ण रोनांकी यांच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी माईर्स एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, तेलंगणातील पोलीस अधिकारी महेश भागवत, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालास्वामी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी चेअरमन डी. पी. अगरवाल उपस्थित होते.अण्णा हजारे म्हणाले, ‘‘नव्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कथनी आणि करनी एक असेल तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. देशात चारित्र्यसंपन्न अधिकारी निर्माण झाले तर गेल्या ७० वर्षांत देशात जे कार्य झाले नाही ते कार्य अवघ्या १० वर्षांत देश बदलू शकेल.’’सत्काराला उत्तर देताना नंदिनी के. आर. म्हणाली, की प्रेरणा, प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर यश प्राप्त होते. यशप्राप्तीनंतर आपली पाळेमुळे विसरता कामा नयेत. मुलांचा कल जिकडे असेल त्या क्षेत्रात यशप्राप्तीसाठी आपल्या मुलांना सर्व पालकांनी प्रोत्साहन द्यावे.या वेळी विश्वनाथ कराड, मेजर जनरल दिलावर सिंग, गोपाळकृष्ण रोनांकी यांनी मनोगत व्यक्त केले. राहुल विश्वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले. शैलश्री हरिदास यांनी प्रास्ताविक केले. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. सुजीत धर्मपात्र यांनी आभार मानले. फक्त भाषणाने समाज बदलत नाहीनिवडणुका आल्या की आपल्याकडे दोन-दोन तास फक्त भाषणांचा भडिमार जनतेवर होतो. मात्र भाषणाने समाज बदलत नाही, त्याला शब्द आणि कृतीची जोड लागते, असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राजकीय नेत्यांना लगावला.समाजाकडून तुमच्याबद्दल भरपूर अपेक्षा आहेत. यंत्रणेमध्ये काम करताना अविरत कष्ट आणि प्रामाणिकपणे कार्य करावे. आपली निर्णयक्षमता व इच्छाशक्तीच्या जोरावर चांगले प्रशासन येऊ शकते. आपले निर्णय समाजाभिमुख कसे असतील, यावर अधिक लक्ष केंद्रित करावे.- डी. पी. अगरवालयूपीएसी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करून चांगले प्रशासन निर्माण करावे. सतत नवीन गोष्टी शिकून आपल्या कामाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे आपला अधिक कल असायला हवा.- एन. गोपालास्वामी