शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

साखरेची किमान विक्री किंमत ठरवा

By admin | Updated: September 10, 2015 04:20 IST

केंद्र सरकारने ठरविलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर देण्यास साखर कारखान्यांचा विरोध नाही; परंतु साखरेचे दर पडल्यानंतर साखरेची किमान विक्री किंमतही सरकारने ठरवावी,

पुणे : केंद्र सरकारने ठरविलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर देण्यास साखर कारखान्यांचा विरोध नाही; परंतु साखरेचे दर पडल्यानंतर साखरेची किमान विक्री किंमतही सरकारने ठरवावी, अशी भूमिका साखर संघ व साखर कारखान्यांनी आज ऊस दर नियंत्रक मंडळाच्या बैठकीत सरकारसमोर मांडली आहे. त्यामुळे आता साखरेच्या किमान विक्री दराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रक मंडळाची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा, खासदार राजू शेट्टी, साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह सहकारी व खासगी कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्राने उसाच्या ‘एफआरपी’चा जो दर ठरविला आहे त्यापेक्षा अधिक भाव कारखाने देऊ शकत असतील तर तो दर ठरविण्याचा अधिकार या मंडळाला आहे; परंतु एफआरपीचा दर देणेच शक्य होत नसल्याने हा अधिकचा भाव ठरविण्याचा प्रश्नच राज्यात उद्भवत नाही, असा मद्दा बैठकीत उपस्थित झाला. एफआरपी देण्याबाबत साखर कारखान्यांनी बैठकीत सहमती दर्शविली. मात्र, एफआरपी द्यायचा कसा? हेही या मंडळाने कारखान्यांना सांगावे, असा मुद्या दांडेगावकर यांनी साखर संघाच्या वतीने उपस्थित केला. साखर कारखान्यांकडील जेवढी साखर विक्री होईल त्यापैकी ७० टक्के किंमत उसाला द्यावी, तर ३० टक्के रक्कम कारखान्यांचा खर्च भागविण्यासाठी वापरावी, असे रंगराजन समिती सांगते. उपपदार्थांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसाठी हे प्रमाण ७५-२५ टक्के आहे. मात्र, साखरेचे भाव इतके पडले आहे की याच गणिताची अंमलबजावणी केली तरी एफआरपी इतका भाव देणे शक्य नाही. अशावेळी कारखान्यांनी काय करायचे? त्यामुळे उसाचा दर जसा ठरतो तशीच साखरेची किमान विक्री किंमतही राज्य व केंद्राच्या या समित्यांनी ठरवावी, अशी मागणी साखर संघाने नोंदविली आहे. संघाच्या या भूमिकेस कारखान्यांनी समर्थन दिले आहे.