शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

साखरेची किमान विक्री किंमत ठरवा

By admin | Updated: September 10, 2015 04:20 IST

केंद्र सरकारने ठरविलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर देण्यास साखर कारखान्यांचा विरोध नाही; परंतु साखरेचे दर पडल्यानंतर साखरेची किमान विक्री किंमतही सरकारने ठरवावी,

पुणे : केंद्र सरकारने ठरविलेल्या ‘एफआरपी’प्रमाणे उसाला दर देण्यास साखर कारखान्यांचा विरोध नाही; परंतु साखरेचे दर पडल्यानंतर साखरेची किमान विक्री किंमतही सरकारने ठरवावी, अशी भूमिका साखर संघ व साखर कारखान्यांनी आज ऊस दर नियंत्रक मंडळाच्या बैठकीत सरकारसमोर मांडली आहे. त्यामुळे आता साखरेच्या किमान विक्री दराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रक मंडळाची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीला साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा, खासदार राजू शेट्टी, साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह सहकारी व खासगी कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्राने उसाच्या ‘एफआरपी’चा जो दर ठरविला आहे त्यापेक्षा अधिक भाव कारखाने देऊ शकत असतील तर तो दर ठरविण्याचा अधिकार या मंडळाला आहे; परंतु एफआरपीचा दर देणेच शक्य होत नसल्याने हा अधिकचा भाव ठरविण्याचा प्रश्नच राज्यात उद्भवत नाही, असा मद्दा बैठकीत उपस्थित झाला. एफआरपी देण्याबाबत साखर कारखान्यांनी बैठकीत सहमती दर्शविली. मात्र, एफआरपी द्यायचा कसा? हेही या मंडळाने कारखान्यांना सांगावे, असा मुद्या दांडेगावकर यांनी साखर संघाच्या वतीने उपस्थित केला. साखर कारखान्यांकडील जेवढी साखर विक्री होईल त्यापैकी ७० टक्के किंमत उसाला द्यावी, तर ३० टक्के रक्कम कारखान्यांचा खर्च भागविण्यासाठी वापरावी, असे रंगराजन समिती सांगते. उपपदार्थांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसाठी हे प्रमाण ७५-२५ टक्के आहे. मात्र, साखरेचे भाव इतके पडले आहे की याच गणिताची अंमलबजावणी केली तरी एफआरपी इतका भाव देणे शक्य नाही. अशावेळी कारखान्यांनी काय करायचे? त्यामुळे उसाचा दर जसा ठरतो तशीच साखरेची किमान विक्री किंमतही राज्य व केंद्राच्या या समित्यांनी ठरवावी, अशी मागणी साखर संघाने नोंदविली आहे. संघाच्या या भूमिकेस कारखान्यांनी समर्थन दिले आहे.