शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

विद्यापीठाच्या क्रमिक पुस्तकात गंभीर चुका

By admin | Updated: June 14, 2017 02:00 IST

विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) क्रमिक पुस्तकांत अनेक गंभीर चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. समाजशास्त्र भाग-२

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) क्रमिक पुस्तकांत अनेक गंभीर चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. समाजशास्त्र भाग-२ या पुस्तकात तर प्रमुख ठिकाणांच्या नावांसह इतिहासच बदलण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘छात्रभारती’ने कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना निवेदनाद्वारे दिला. समाजशास्त्र भाग-२ या पुस्तकातील एका पाठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे कालिमाता मंदिरात सत्याग्रह केला,’ असा उल्लेख आहे. कालिमाता व काळाराम मंदिर यातील फरक प्राध्यापकांना समजलेला नाही. अशा अनेक चुका पुस्तकात असल्याचे छात्रभारतीचे उपाध्यक्ष सागर भालेराव यांनी सांगितले. या पुस्तकाचे मूळ लेखक डॉ. शशी मिश्रा यांची तत्काळ हकालपट्टी करून आयडॉलच्या संचालक डॉ. अंबुजा साळगावकर यांनाही निलंबित करावे. तसेच सुधारित पुस्तके नव्याने छापावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.या आहेत चुका...समाजशास्त्र भाग-२, पान क्र. ४२‘लिंग आणि समाज’‘अर्जुनाचा उलुपी या नागकन्येशी विवाह व भीमसेनांचा हिडिंबा या राक्षस महिलेशी विवाह झाला. त्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाला हळूहळू उतरती कळा लागली.’समाजशास्त्र भाग-२, पान क्र.१२०‘सामाजिक चळवळीचे समाजशास्त्र’भारतातील आदिवासी जमातींनी संस्कृत भाषेची चळवळ निर्माण केली.समाजशास्त्र भाग-२, पान क्र.३८‘लिंग आणि समाज’डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे कालीमाता मंदिरात सत्याग्रह केला.समाजशास्त्र भाग-२, पान क्र. ३०‘उद्योगधंदे, कामगार वर्ग आणि समाज’भारतात जातीयव्यवस्था ही आजची नसून ती ब्रिटिश राज्यापासून चालू झाली व निरनिराळ्या जातीचे लोक हे मोठ्या गटांनी नवीन व्यावसायिक शोधाच्या निमित्ताने शहराकडे स्थलांतरित झाले.