शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

‘छावणी’वर रोखलेल्या सेन्सॉरच्या संगिनी म्यान!

By admin | Updated: August 26, 2016 01:00 IST

प्रेमानंद गज्वी यांच्या ‘छावणी’ या नाटकावर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) तब्बल १५ महिने रोखून ठेवलेल्या संगिनी अखेर म्यान केल्या.

पुणे : नाटकाचा विषय वादग्रस्त आणि देशाच्या घटनेविरुद्ध आहे, अशी भूमिका घेऊन ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या ‘छावणी’ या नाटकावर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) तब्बल १५ महिने रोखून ठेवलेल्या संगिनी अखेर म्यान केल्या. मात्र, कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा अडचणी उद्भवल्यास नाटक थांबविण्याचा अधिकार असल्याचे सांगून काही प्रमाणात ‘सेंन्सॉरशिप’ कायम ठेवली. भारतातील कडव्या विचारसरणीच्या साम्यवादी संघटनांनी चालविलेल्या ‘नक्षलवादी’ चळवळीवर आधारित ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे ‘छावणी’ हे नाटक रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) अडवले, या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केले होते. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी बोर्डाकडे संहिता सादर केलेले गज्वी यांना बोर्डाने या संदर्भात साधे पत्र पाठविणे किंवा चर्चेसाठी बोलावण्याचेही सौजन्य न दाखविल्याने ते या अडवणुकीबद्दल अद्यापही अनभिज्ञच आहेत. मात्र, हे नाटक देशाच्या घटनेविरोधी असल्याने ते बाजूला ठेवले असल्याचे बोर्डाकडूनच वर्षभरानंतर समोर आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. गज्वी यांनी ५ मे २०१५ रोजी प्रायोगिक नाटक म्हणून सेन्सॉर बोर्डाकडे त्यांच्या ‘छावणी’ या नाटकाची संहिता पाठविली. साधारपणे नियमानुसार ही संहिता बोर्डाच्या दोन किंवा तीन सदस्यांकडे वाचण्यासाठी दिली जाते आणि त्यानंतर लेखकाला पत्र पाठवून ‘आमच्या अटी मान्य आहेत का? नसतील तर का?’ अशा स्वरूपाची विचारणा करण्यात येते आणि अटी मान्य झाल्यास चर्चेसाठी बोलावले जाते. मात्र, गज्वी यांच्यासंदर्भात असे काहीच घडले नाही. बोर्डाकडे या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता ‘लवकरच तुम्हाला मुंबईला बोलावू,’ अशी टोलवाटोलवीची उत्तरे त्यांना देण्यात आली.तब्बल १५ महिन्यांनंतर गज्वी यांना पत्र पाठविण्याचे सौजन्य सेन्सॉर मंडळाने दाखविले. याविषयी प्रेमानंद गज्वी म्हणाले, ‘‘बोर्डाकडून दहा-बारा दिवसांपूर्वी पत्र मिळाले. त्यात ‘बैठकीला उपस्थित राहून तुमचे मत मांडा’ असे नमूद केले होते. मात्र, पत्रात कशाबद्दल मत मांडायचे आहे, असा स्पष्ट उल्लेख नव्हता. मग नलावडे यांना पत्र लिहून ‘काय मत मांडू?’ असे लिहिले त्यावर ‘जे काही नाटकात आहे ते सांगा.’ हे नाटक १९६०च्या चीन व पाकिस्तान कराराला केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहे. भारताला नक्षलवादाचा किती धोका आहे, याची मांडणी करणारे हे नाटक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाडच्या सत्याग्रहादरम्यान डाव्या चळवळीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ‘भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे दलितांचे शत्रू आहेत,’ असे विधान केले होते, तेच या नाटकाचे सूत्र आहे. मार्क्स माओ ऊर्फ एमएम या भूमिकेभोवती कथानक गुंफण्यात आल्याचे बैठकीत सांगितले. त्यावर सदस्यांनी देशाविषयी चिंता करणारे हे नाटक आहे; मग बोर्डाने प्रमाणपत्र देऊ नये, असा मुद्दा उपस्थित केला होता.’’ >‘नाटकाची संहिता सभासदांकडून वेळेत वाचून आली नाही; त्यामुळे विलंब झाला. अशी चूक व्हायला नको होती, अशी दिलगिरी व्यक्त करून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी माघार घेतली. नाटकातला कुठलाही भाग न वगळ्ता एका प्रयोगासाठी नव्हे, तर कायमस्वरूपी परवानगी देण्यात आली आहे. येत्या मंगळवारी हातात प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे हा वाद आता मिटला आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी एक निर्माताही मिळाला असून, कलाकार व दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात नाटकाचा प्रयोग करण्याचा मानस आहे. - प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ नाटककार >देशाविषयी चिंता व्यक्त करणारे हे नाटक असले, तरी नाटकाला कायमस्वरूपी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नाटकाबद्दल काही अडचणी उद्भवल्या तर ते थांबविण्याचा अधिकार आम्हाला आहे. - अरुण नलावडे, अध्यक्ष, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड)