शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

‘छावणी’वर रोखलेल्या सेन्सॉरच्या संगिनी म्यान!

By admin | Updated: August 26, 2016 01:00 IST

प्रेमानंद गज्वी यांच्या ‘छावणी’ या नाटकावर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) तब्बल १५ महिने रोखून ठेवलेल्या संगिनी अखेर म्यान केल्या.

पुणे : नाटकाचा विषय वादग्रस्त आणि देशाच्या घटनेविरुद्ध आहे, अशी भूमिका घेऊन ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या ‘छावणी’ या नाटकावर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) तब्बल १५ महिने रोखून ठेवलेल्या संगिनी अखेर म्यान केल्या. मात्र, कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा अडचणी उद्भवल्यास नाटक थांबविण्याचा अधिकार असल्याचे सांगून काही प्रमाणात ‘सेंन्सॉरशिप’ कायम ठेवली. भारतातील कडव्या विचारसरणीच्या साम्यवादी संघटनांनी चालविलेल्या ‘नक्षलवादी’ चळवळीवर आधारित ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे ‘छावणी’ हे नाटक रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्ड) अडवले, या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केले होते. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी बोर्डाकडे संहिता सादर केलेले गज्वी यांना बोर्डाने या संदर्भात साधे पत्र पाठविणे किंवा चर्चेसाठी बोलावण्याचेही सौजन्य न दाखविल्याने ते या अडवणुकीबद्दल अद्यापही अनभिज्ञच आहेत. मात्र, हे नाटक देशाच्या घटनेविरोधी असल्याने ते बाजूला ठेवले असल्याचे बोर्डाकडूनच वर्षभरानंतर समोर आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. गज्वी यांनी ५ मे २०१५ रोजी प्रायोगिक नाटक म्हणून सेन्सॉर बोर्डाकडे त्यांच्या ‘छावणी’ या नाटकाची संहिता पाठविली. साधारपणे नियमानुसार ही संहिता बोर्डाच्या दोन किंवा तीन सदस्यांकडे वाचण्यासाठी दिली जाते आणि त्यानंतर लेखकाला पत्र पाठवून ‘आमच्या अटी मान्य आहेत का? नसतील तर का?’ अशा स्वरूपाची विचारणा करण्यात येते आणि अटी मान्य झाल्यास चर्चेसाठी बोलावले जाते. मात्र, गज्वी यांच्यासंदर्भात असे काहीच घडले नाही. बोर्डाकडे या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता ‘लवकरच तुम्हाला मुंबईला बोलावू,’ अशी टोलवाटोलवीची उत्तरे त्यांना देण्यात आली.तब्बल १५ महिन्यांनंतर गज्वी यांना पत्र पाठविण्याचे सौजन्य सेन्सॉर मंडळाने दाखविले. याविषयी प्रेमानंद गज्वी म्हणाले, ‘‘बोर्डाकडून दहा-बारा दिवसांपूर्वी पत्र मिळाले. त्यात ‘बैठकीला उपस्थित राहून तुमचे मत मांडा’ असे नमूद केले होते. मात्र, पत्रात कशाबद्दल मत मांडायचे आहे, असा स्पष्ट उल्लेख नव्हता. मग नलावडे यांना पत्र लिहून ‘काय मत मांडू?’ असे लिहिले त्यावर ‘जे काही नाटकात आहे ते सांगा.’ हे नाटक १९६०च्या चीन व पाकिस्तान कराराला केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहे. भारताला नक्षलवादाचा किती धोका आहे, याची मांडणी करणारे हे नाटक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाडच्या सत्याग्रहादरम्यान डाव्या चळवळीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ‘भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे दलितांचे शत्रू आहेत,’ असे विधान केले होते, तेच या नाटकाचे सूत्र आहे. मार्क्स माओ ऊर्फ एमएम या भूमिकेभोवती कथानक गुंफण्यात आल्याचे बैठकीत सांगितले. त्यावर सदस्यांनी देशाविषयी चिंता करणारे हे नाटक आहे; मग बोर्डाने प्रमाणपत्र देऊ नये, असा मुद्दा उपस्थित केला होता.’’ >‘नाटकाची संहिता सभासदांकडून वेळेत वाचून आली नाही; त्यामुळे विलंब झाला. अशी चूक व्हायला नको होती, अशी दिलगिरी व्यक्त करून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी माघार घेतली. नाटकातला कुठलाही भाग न वगळ्ता एका प्रयोगासाठी नव्हे, तर कायमस्वरूपी परवानगी देण्यात आली आहे. येत्या मंगळवारी हातात प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे हा वाद आता मिटला आहे. या नाटकाच्या प्रयोगासाठी एक निर्माताही मिळाला असून, कलाकार व दिग्दर्शकाचा शोध सुरू आहे. आॅक्टोबर महिन्यात नाटकाचा प्रयोग करण्याचा मानस आहे. - प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ नाटककार >देशाविषयी चिंता व्यक्त करणारे हे नाटक असले, तरी नाटकाला कायमस्वरूपी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नाटकाबद्दल काही अडचणी उद्भवल्या तर ते थांबविण्याचा अधिकार आम्हाला आहे. - अरुण नलावडे, अध्यक्ष, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ (सेन्सॉर बोर्ड)