शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
4
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
5
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
6
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
7
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
8
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
9
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
10
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
11
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
12
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
13
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
14
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
15
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
16
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
17
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
18
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
19
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
20
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार

‘शासनाची संवेदनशीलता संपली आहे!’ - रामनाथ मोते

By admin | Updated: October 18, 2016 02:06 IST

‘विनाअनुदानित शाळांना अनुदान घोषित केल्यानंतरही त्याचे वाटप होत नाही आहे.

मुंबई : ‘विनाअनुदानित शाळांना अनुदान घोषित केल्यानंतरही त्याचे वाटप होत नाही आहे. अनुदानासाठी शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर लाठीहल्ला होतो, त्यात शिक्षकांवर ३०७सारखे भयानक कलम लादले जाते. यावरून शासनाची संवेदनशीलता संपली असल्याचे ध्वनित होते,’ असे परखड मत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी व्यक्त केले आहे. ‘लोकमत व्यासपीठ’मध्ये ते बोलत होते.मोते म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षकांचा लढा सुरू आहे. न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतरही संस्थाचालक आणि शासनातील या लढ्यात बिचारा शिक्षक भरडला जात आहे. मुळात सत्तेवर येण्यासाठी शिक्षकांना अनुदानाचे गाजर दाखवणारे हेच सरकार होते. मात्र सत्तेची तीन वर्षे शिल्लक असल्याने तत्काळ अनुदान द्यायचे नाही? असा संदेश शिक्षकांमध्ये जात आहे. त्यामुळे दिवाळीआधी शिक्षकांसाठी मंजूर केलेले १४३ कोटी रुपयांचे वाटप सरकारने करायला हवे.मुळात शासनाने २४ नोव्हेंबर, २००१ साली राज्यातील एकाही शाळेला अनुदान मिळणार नाही, असा निर्णय घेतला. मात्र विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिल्यानंतर संबंधित संस्थाचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देतात का? याची पाहणी मात्र केली नाही. त्यामुळे गेल्या १० ते १५ वर्षांपासून हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन काम करत आहेत. त्यात शहरी भागातील शाळा तग धरून असल्या, तरी ग्रामीण भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत. उभी हयात शिक्षणक्षेत्रासाठी घालवलेल्या शिक्षकांना निवृत्तीनंतर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दशकात झालेल्या १४८ आंदोलनांची दखल घेत शासनाने अनुदान देण्याची घोषणा केली. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई होत आहे. २००९ साली कायम शब्द काढल्यानंतर अनुदानाचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी खोडसाळपणा करत अनुदान मिळवण्यासाठी जाचक अटी टाकल्या. त्यांचे पालन करत ५८ शाळांना अनुदान मिळाले. मात्र त्यानंतर पात्र ठरलेल्या १ हजार ६२८ शाळा आणि २ हजार ५४२ तुकड्यांतील १९ हजार २४२ शिक्षक अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.च्शब्दांकन - चेतन ननावरे>शिक्षकांना न्यायालयाची गरजच काय?प्रत्येक मागणीसाठी शिक्षकांना न्यायालयात धाव घ्यावी लागते. त्यामुळे शासनाने शिक्षकांच्या मागण्यांवर गंभीर विचार करावा. शिवाय दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून त्याची अंमलबजावणी होतेय की नाही, याचीही तपासणी करावी. जेणेकरून शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाविरोधात न्यायालयात धाव घेण्याची गरज भासणार नाही.सर्वच शाळांचा १०० टक्के निकाल लागणे शक्य नाही, त्यामुळे ही जाचक अट्ट शिथिल करावी. बायोमेट्रीक टप्प्याटप्प्याने लागू करण्यास वेळ द्या.गेल्या पाच वर्षांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक पदांचे प्रस्ताव मंजुरीसाठी धूळ खात पडले आहेत. ते शासनाने तत्काळ मार्गी लावावेत.आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करून राज्य आणि जिल्हा पुरस्कारांत शिक्षकांना प्रत्येकी एक लाख आणि ५० हजार रुपयांचे रोख पारितोषिक द्यावे.संच मान्यतेतील जाचक अटी रद्द करून अतिरिक्त शिक्षकांना कायम सेवेत घ्यावे.