भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराला निश्चित स्वरूपात चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कररचनेबाबतचा सरकारचा तर्कसंगत दृष्टिकोन त्यामधून स्पष्ट होत आहे. पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक क्षेत्रला शेअर बाजारात लाभ होणार आहे. संरक्षण आणि विमा क्षेत्रमध्ये थेट परकीय गुंतवणुकीची परवानगी, हे विशेष उल्लेखनीय आहे.
न्सेक्सने सलग तिस:या व्यावसायिक सत्रत घसरण नोंदविली आहे. आज बाजाराला नफेखोरीचाही फटका बसला. सत्रच्या मध्यात कमावलेले अंक बाजाराला शेवटच्या टप्प्यात गमवावे लागले.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पहिल्या अर्थसंकल्पात आज गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. अर्थसंकल्पाचा उचित परिणाम होऊन बाजार 25,920 अंकांर्पयत वर चढला होता; मात्र नंतर बाजारात नफावसुलीचे सत्र सुरू झाले. त्याचा परिणाम होऊन बाजार 25,117 अंकांर्पयत खाली आला. दिवसअखेरीस 72.06 अंकांची घसरण नोंदवून बाजार 25,372.75 अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.28 टक्के आहे. 27 जूननंतरचा हा सर्वात नीचांकी बंद ठरला आहे. 27 जून रोजी सेन्सेक्स 25,099.92 अंकांवर बंद झाला होता.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केल्यानंतर शेअर बाजार कोसळायला सुरुवात झाली. सेन्सेक्स दुपार्पयत 300 अंकांनी कोसळला. नंतर मात्र बाजार सुधारायला लागला. जेटलींचे भाषण पूर्ण होईर्पयत सेन्सेक्स 475 अंकांनी उसळला होता. 25,92क्.46 अंकांना त्याने स्पर्श केला होता. दुपारनंतर बाजाराने पुन्हा उलटा प्रवास सुरू केला. प्राप्त केलेला सर्व लाभ त्याने गमावला. चढ आणि उताराच्या टापूत तब्बल 8क्क् अंकांच्या मर्यादेत सेन्सेक्स खाली-वर होताना दिसून आला. गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या पर्यायांत खरेदी आणि विक्री केल्यामुळे तो सतत खाली-वर होत होता.
बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल म्हणाले, की संपुआ सरकारने सादर केलेल्या हंगामी अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणो फार मोठे फेरबदल केले नाहीत. वित्तीय आघाडीवर अर्थसंकल्पाने थोडे निराश केली आहे. सबसिडी व्यवहार्य करण्याच्या मुद्दय़ावर अर्थसंकल्पात कोणतेही भाष्य नाही.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 17.25 अंकांनी कोसळून 7,567.75 अंकांवर बंद झाला. ही घसरण 0.23 टक्के आहे. एका क्षणी निफ्टी 7,500 अंकांच्या खाली घसरून 7,479.05 अंकांर्पयत गेला होता. दिवसभर तो खाली-वर होत होता. एका क्षणी तो 7,731.05 अंकांर्पयत वरही चढला होता.
भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजाराला निश्चित स्वरूपात चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे. कररचनेबाबतचा सरकारचा तर्कसंगत दृष्टिकोन त्यामधून स्पष्ट होत आहे. पायाभूत सुविधा, स्थावर मालमत्ता आणि आर्थिक क्षेत्रला शेअर बाजारात लाभ होणार आहे. संरक्षण आणि विमा क्षेत्रमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला दिलेली परवानगी, हे विशेष उल्लेखनीय आहे.