शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

सेनेचा ‘मखलाशी’ फॉर्म्युला

By admin | Updated: September 11, 2014 09:20 IST

महायुतीमध्ये भाजपाला १६ अतिरिक्त जागा जागा सोडायला शिवसेना तयार झाली असून, मित्रपक्षांना द्यायच्या १८ जागा भाजपाने त्यातून सोडाव्यात,

मुंबई : महायुतीमध्ये भाजपाला १६ अतिरिक्त जागा जागा सोडायला शिवसेना तयार झाली असून, मित्रपक्षांना द्यायच्या १८ जागा भाजपाने त्यातून सोडाव्यात, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे समजते. यामुळे शिवसेनेच्या वाट्याला १५३, भाजपाच्या वाट्याला १३५ जागा येतील. सध्या महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अडखळण्याचे कारण शिवसेनेच्या या फॉर्म्युल्यात असल्याचे बोलले जात आहे.शिवसेना-भाजपा युतीमधील जागावाटप हे विधानसभेकरिता आतापर्यंत शिवसेना १७१ तर भाजपा ११७ हेच राहिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत घाटकोपर आणि त्यापूर्वी चिमूर या दोन जागा शिवसेनेने भाजपाला सोडल्याने जागावाटप शिवसेना १६९ तर भाजपा ११९ झाले होते.गेले काही दिवस भाजपा मित्रपक्षांसोबत जागावाटपासंबंधी चर्चा करीत आहे. आपल्याकडील कोणत्या जागा मित्रपक्षांना हव्या आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर आता शिवसेनेने भाजपाला १३५ जागा द्यायची तयारी केली आहे. त्यामध्ये मित्रपक्षांना हव्या असलेल्या व शिवसेनेला सोडणे शक्य असलेल्या जागांचा समावेश आहे.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या ११९ जागा होत्या. त्यामुळे भाजपाला १६ जागा वाढवून मिळतात. मात्र रिपाइं, स्वाभिमानी, शिवसंग्राम व राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायच्या जागा भाजपाने त्यांच्या वाढलेल्या कोट्यातून द्याव्या, असा शिवसेनेचा आग्रह आहे असे समजते. तसे झाल्यास १६ जागा वाढवून मिळाल्या तरी मित्रपक्षांना १८ जागा सोडल्यावर भाजपाला प्र्रत्यक्ष लढायला ११७ जागा मिळतात. तात्पर्य हेच की, शिवसेनेकडून जागा वाढवून घेतल्याचे भाजपाला समाधान तर भाजपाला ११७ जागांपुरते सीमित ठेवल्याचा शिवसेनेला आनंद! रिपाइं व स्वाभिमानला प्रत्येकी सहा-सहा जागा व शिवसंग्राम तसेच राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी तीन-तीन जागा भाजपाने सोडायच्या आहेत, असे कळते.मागील निवडणुकीत शिवसेना १६९ जागा लढली. त्यापैकी ११ जागा शिवसेनेने शेकाप व अन्य काही मित्रपक्षांना सोडल्या होत्या. म्हणजेच शिवसेना प्रत्यक्षात १५८ जागा लढली होती. सेनेच्या या फॉर्म्युलात शिवसेना १५६ जागा लढते. याचा अर्थ मित्रपक्षांना जागा सोडूनही शिवसेनेच्या मागील निवडणुकीत लढलेल्या जागांच्या तुलनेत दोन जागा कमी होतात. २००९ च्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाने लढवलेल्या जागांमधील अंतर ५० होते. यावेळी हे अंतर ३९ असेल. शिवसेनेचे हे सूत्र हाच सध्या महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेतील गतीरोध असल्याचे मित्रपक्षाच्या नेत्यांचे मत आहे. (विशेष प्रतिनिधी)