शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सू.गवई यांचे निधन

By admin | Updated: July 25, 2015 17:27 IST

ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचे दीर्घ आजाराने आज नागपूरमध्ये निधन झाले.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. २५ -  ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी नागपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

महाराष्ट्रातील दलित चळवळीचे एक अग्रणी नेते असलेल्या गवई यांनी बिहार व केरळचे माजी राज्यपालपद भूषवले. त्यांचा जन्म १९२९ साली अमरावतीत झाला. गवई यांनी दलितांच्या प्रश्नासाठी सतत आवाज उठवला. दलित चळवळीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांचे महत्वाचे स्थान होते. 

गवई यांचा जीवनपट : 

रामकृष्ण सूर्यभान गवई - जन्म ३० ऑक्टोबर १९२९

जन्मस्थळ : दारापुर जिल्हा अमरावती
 
शैक्षणक पात्रता: नागपुर विद्यापीठ (महाराष्ट् )चे पदवीधर
 
भूषवलेली पदे
सभासद महाराष्ट्र विधान परिषद्
 
उपाध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद - १९६८-७८
 
अध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद १९७८-८२
 
कॉमनवेल्थ पर्लमेंटरी असोसिएशन महाराष्ट् शाखेचे सयुक्त उपाध्यक्ष
 
१२ डिसेबर १९८६ ते डिसेंबर १९८८ विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद्
 
१९९८-९९ सदस बारावी लोकसभा
 
एप्रिल २००० राज्यसभेवर निवडून आले
 
मिळालेले सन्मान
 
कुष्ठरोगिकरिता बहुमूल्य मदत व सहाय्य याबद्दल मिळालेले कुष्ठमित्र अवार्ड आणि कुष्ठरोगियांचा मित्र अवार्ड
 
प्रियदर्शनी ग्रुप ,मुंबई यांचे माध्यमातून समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य तसेच अस्पृश्यता निर्मूलन आणि कुष्ठरोग या क्षेत्रात केलेल्या प्रशसनीय कार्यबद्दल पुरस्कार
 
डॉ बाबासाहेब अम्बेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ईश्वरी देवी अॅवार्ड
 
इतर माहिती
विद्यार्थी दशेपासून सामजिक व राजकिय चळवळीत सक्रीय सहभाग ,महाराष्ट्र विधान परिषदचे अखंड तिस वर्ष सभासदत्व (२६जुले १९९४) रोजी निवृत्त )महाराष्ट्र राज्यात एम्प्लॉयमेंट गारंटी स्कीम सुरु व्हावी यeकरिता महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाइक आणि महाराष्ट्र विधान परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष श्री व्ही एस पागे याच्या सहकार्यातून पायाभूत काम केले 
 
अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,उपाध्यक्ष जागतिक बौद्ध फेलोशिप(सेन्ट्रल जनरल कौंसिल ऑफ़  जागतिक बौद्ध फेलोशिप यांच्या बैंकॉक येथील सभेत एकमताने निवड) त्यांच्या संस्थेत 1998 मध्ये पुन्हा निवड 
 
दादासाहेबानी आपल्या दलित बांधवांच्या उद्घारासाठी भरीव कामगिरी तर केलिच त्याचबरोबर जातिभेद ,धर्मभेद वा पंथभेद पाळुन स्वजातियाना सवलती देऊन इतराणा दूर ढकलन्याचा आपपभाव कधीच दाखवला नाही .
भूतपूर्व चेयमन ,धार्मिक आणि भाषिक उपसमिति अल्पसंख्यांकविषय महाराष्ट्र राज्य
 
अमरावती येथे1989 साली भरलेल्या ६२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
 
अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दीक्षाभूमि नागपुर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती
 
नियुक्ति डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि व्याख्याने महाराष्ट्र विषयक महाराष्ट्र राज्य समितीचे उपाध्यक्ष
 
मुंबई व अन्यत्र झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शांतता आणि सादभाव निर्माण करण्याकरिता स्थापन झालेल्या राज्य शांतता समितीचे सभासद
 
२२ जून २००६ पासून १० जुलै २००८ पर्यन्त बिहारचे राज्यपाल
 
१० जुले २००८ ते ७ सप्टेंबर २०११ केरळ चे राज्यपाल
 
मृत्यू --.  २५ जुलै २०१५