शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बदली, बढतीची अधिकाऱ्यांची कामे मंत्रीच करताना दिसतात - नितीन गडकरींची खंत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:46 IST

अधिका-यांनी करावयाची बदली, बढतीची कामे मंत्री करतात आणि धोरणे तयार करण्याची मंत्र्यांची कामे अधिकारी करतात. सर्व रितच सध्या बदलली आहे, अशी खंत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.

मुंबई - अधिका-यांनी करावयाची बदली, बढतीची कामे मंत्री करतात आणि धोरणे तयार करण्याची मंत्र्यांची कामे अधिकारी करतात. सर्व रितच सध्या बदलली आहे, अशी खंत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.जागतिक मराठी चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचा २४ वा वर्धापन दिन व उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाले. गडकरी म्हणाले, उद्योग करण्यासाठी हिंमत ठेऊन जोखीम पत्करावी लागते. मराठी माणसात प्रचंड क्षमता आहे. इनोव्हेशन, तंत्रज्ञान व संसाधने ही आगामी काळाची गरज आहे. ती ध्यानात घेत मराठी माणसाने स्वत:ला उद्योग क्षेत्रात झोकून द्यावे.मराठी माणसाने टाटा-बिर्लाला मागे टाकावे, असे आवाहन लोकसभेचे माजी सभापती व चेम्बरचे अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांनी केले.महाराष्टÑ उद्योगात देशात अव्वल आहे. पण त्यामध्ये मराठी उद्योजक नाहीत. मराठी माणूस खूप शिकतो. पण शेवटी तो फक्त नोकरीच करतो. प्रत्येक मराठी घरात एक व्यवसायिक तयार व्हायला हवा, असे आवाहन जोशी यांनी केले.उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महिला उद्योजिका जयंती कठाळे, म्हैसूर येथील उद्योजक मोहन राव व प्रकाश बेहरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेम्बरचे कार्याध्यक्ष खा. शिवाजीराव आढळराव पाटील, प्रकाश चिखलीकर, रविंद्र आवटे, सुरेश महाजन यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गडकरींनीपुढाकार घ्यावा - डॉ. डी. वाय. पाटीलदेशात १८५७ चे बंड झाले नसते तर आज पाणीप्रश्न निर्माणच झाला नसता. देशाची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी १८५४ मध्ये ब्रिटीशांनी आरखडा तयार केला होता. बंड होताच तो आराखडा रद्द करण्यात आला. गडकरींनी प्रयत्न केल्यास आताही तो आराखडा अंमलात आणून पाणीप्रश्नावर तोडगा काढता येईल, असे मत उद्योगरत्न पुरस्कार विजेतेडॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.‘गडकरींनी पंतप्रधान व्हावे’नेटाने प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही, हे सांगताना मनोहर जोशी यांनी नितीन गडकरींनी पुढील वेळी पंतप्रधान बनून या कार्यक्रमात यावे, असे मत मांडले. त्यावर आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण गडकरींनी दिले.मराठी माणसात उद्यमशीलतेचा अभावमराठी माणसाच्या घरातच उद्यमशीलतेचा अभाव आहे. मराठी तरुण कायम नोकरीच्याच मानसिकतेमध्ये असतो. माझे जावईदेखील अमेरिकेत नोकरी करतात. पण त्यांना उद्योग करायचा नाही, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीGovernmentसरकार