शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

'अलबत्या गलबत्या'चे लेखक रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 06:25 IST

साहित्यविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे.

मुंबई : साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाचे समजले जाणाऱ्या साहित्य अकादमीचे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. मराठी विभागात ज्येष्ठ लेखक व नाटककार रत्नाकर मतकरी यांना बालसाहित्यातील सर्वांगीण योगदानासाठी, तर नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ या कादंबरीस ‘युवा साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला आहे.देशातील ४२ साहित्यिकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यामध्ये बालसाहित्य पुरस्कारांसाठी २१, तर युवा पुरस्कारांसाठी २१ साहित्यिकांची निवड झाली आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा धनादेश व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रत्नाकर मतकरी यांनी बालसाहित्यासाठी जे योगदान दिले, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.बालसाहित्य पुरस्कारासाठी ज्युरी म्हणून मराठी विभागाकरिता बाबा भांड, डॉ. अनिल अवचट, डॉ. वसंत पाटणकर यांनी, तर साहित्य अकादमी युवा पुरस्कारासाठी वसंत आबाजी डहाके, रा. रं. बोराडे, सतीश आळेकर ज्युरी म्हणून काम पाहिले. बालसाहित्याचे पुरस्कार १४ नोव्हेंबरला बालदिनी प्रदान केले जाणार आहेत. युवा पुरस्कारांच्या वितरणाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. इंग्रजी साहित्यकृतीसाठी यंदा कोणत्याही पुस्तकाला युवा साहित्य पुरस्कार देण्यात आला नाही.

>बालनाट्याचे लिखाण करून जवळपास ४० वर्षांचा कालावधी लोटला. या लिखाणाबद्दल, या क्षेत्रातील योगदानाविषयी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. मात्र, ही दखल काहीशी उशिरा घेतली, याची खंत कायम मनात राहील.- रत्नाकर मतकरी>साहित्य अकादमीने ‘फेसाटी’ कादंबरीची दखल घेतल्याने आनंद झाला. या निमित्ताने खेड्यापाड्याचे, दुष्काळी भागाचे व शेतकरी वर्गाचे जीवन साहित्यातून मांडता आले. त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याने आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.- नवनाथ गोरे