शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील ज्येष्ठ नागरिक धावणार लोकमतच्या औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 21:16 IST

बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही.

ठळक मुद्दे बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही, शिवाय २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ते धावतील हे अशक्यच आहे, असंही तुम्ही म्हणाल. हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिक ‘लोकमत’तर्फे रविवारी औरंगाबादमध्ये होत असलेल्या महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

औरंगाबाद- बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही, शिवाय २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ते धावतील हे अशक्यच आहे, असंही तुम्ही म्हणाल. हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिक ‘लोकमत’तर्फे उद्या रविवारी औरंगाबादमध्ये होत असलेल्या महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. यामध्ये अगदी पंचाहत्तरी गाठलेलेही तरुणतुर्क आहेत.

बायपास झालेल्या तरीही शरीरात प्रचंड ऊर्जा असलेल्या बारा ते तेरा जणांचा हा ग्रुप रविवारी अगदी पहाटेच औरंगाबादच्या गारखेडा भागातील विभागीय क्रीडा संकुलावर धावण्यासाठी सज्ज राहणार आहे. बायपास सर्जरी झाल्यानंतर आपण समाजावर आणि परिवारावर ओझं होऊ का, अशी मनात भीती न बाळगता ही मंडळी धावायला लागली. त्यांना व्यंकटरमण पिचुमणी यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आता हा बारा-तेरा जणांचा ग्रुप देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो.

या ग्रुपमधील सदस्यांनी लोकमत भवन येथे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये धावण्याच्या भूमिकेबाबत या ज्येष्ठ नागरिकांनी संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांशी चर्चाही केली.

बायपास सर्जरी झाली म्हणजे आपल्या हालचालींवर मर्यादा आल्या, असंच अनेक जण समजतात. मात्र, या समाजाला छेद देण्याचं काम या ज्येष्ठ नागरिकांनी केलं आहे. बायपास झाली म्हणजे स्वत:ला आजारी समजणारे, तसंच व्हीलचेअरचा वापर करणारेही अनेक जण दिसतात. या सर्वांना ऊर्जा देण्याचे आणि मनात ऊर्मी भरण्याचे काम या ग्रुपतर्फे होताना दिसत आहे.

अर्थात महामॅरेथॉनमध्ये धावणारी ही सर्व मंडळी अतिशय ताजीतवानी असल्याचं दिसलं. गेल्या काही दिवसांत किंवा वर्षांत धावण्याच्या सरावामुळे ही मंडळी शारीरिकदृष्ट्या अगदी ‘फिट’ आहेत आणि मनानेही तरुण आहेत. नियमित ‘एक्सरसाईज’ आणि ‘चिअरफुल लाईफ’ असं त्यांचं जगणं आहे.

यापैकी अनेक जण स्वत:चा व्यवसायही उत्तमपणे सांभाळत आहेत. या ग्रुपमधील व्यंकटरमण पिचुमणी वगळता सर्वच सदस्य हे बायपास सर्जरी झाल्यानंतर धावायला लागले. सर्जरी होण्याआधी यांच्यापैकी कुणीही धावत नव्हते आणि आता तर अगदी प्रोफे शनल मॅरेथॉनमध्ये ते धावत आहेत. मनात जिद्द असली की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याची प्रचीती या ग्रुपने आणून दिली आहे. याचे श्रेय मार्गदर्शक व्यंकटरमण पिचुमणी यांना आणि या ज्येष्ठांच्या जिद्दीला जाते. तरुणांना लाजवेल आणि ज्येष्ठांना मार्गदर्शक ठरेल, अशीच या ग्रुपची कामगिरी आहे.

ग्रुपच्या याच जिद्दीने त्यांना मुंबईहून औरंगाबादेत खेचून आणलं आहे. या ग्रुपला औरंगाबादचेही काहीजण जॉईन झाले आहेत. रविवारी पहाटे या ग्रुपचे बारा ते तेरा सदस्य महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन रस्त्यावरून धावतील तेव्हा औरंगाबादकर निश्चितच त्यांच्या जिद्दीला सलाम करतील.