शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील ज्येष्ठ नागरिक धावणार लोकमतच्या औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 21:16 IST

बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही.

ठळक मुद्दे बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही, शिवाय २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ते धावतील हे अशक्यच आहे, असंही तुम्ही म्हणाल. हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिक ‘लोकमत’तर्फे रविवारी औरंगाबादमध्ये होत असलेल्या महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

औरंगाबाद- बायपास सर्जरी झाल्यानंतर कुणी धावत असेल यावर आपला विश्वास बसणार नाही, शिवाय २१ किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये ते धावतील हे अशक्यच आहे, असंही तुम्ही म्हणाल. हृदयाची बायपास सर्जरी झालेले मुंबईतील काही ज्येष्ठ नागरिक ‘लोकमत’तर्फे उद्या रविवारी औरंगाबादमध्ये होत असलेल्या महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. यामध्ये अगदी पंचाहत्तरी गाठलेलेही तरुणतुर्क आहेत.

बायपास झालेल्या तरीही शरीरात प्रचंड ऊर्जा असलेल्या बारा ते तेरा जणांचा हा ग्रुप रविवारी अगदी पहाटेच औरंगाबादच्या गारखेडा भागातील विभागीय क्रीडा संकुलावर धावण्यासाठी सज्ज राहणार आहे. बायपास सर्जरी झाल्यानंतर आपण समाजावर आणि परिवारावर ओझं होऊ का, अशी मनात भीती न बाळगता ही मंडळी धावायला लागली. त्यांना व्यंकटरमण पिचुमणी यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आता हा बारा-तेरा जणांचा ग्रुप देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो.

या ग्रुपमधील सदस्यांनी लोकमत भवन येथे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये धावण्याच्या भूमिकेबाबत या ज्येष्ठ नागरिकांनी संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांशी चर्चाही केली.

बायपास सर्जरी झाली म्हणजे आपल्या हालचालींवर मर्यादा आल्या, असंच अनेक जण समजतात. मात्र, या समाजाला छेद देण्याचं काम या ज्येष्ठ नागरिकांनी केलं आहे. बायपास झाली म्हणजे स्वत:ला आजारी समजणारे, तसंच व्हीलचेअरचा वापर करणारेही अनेक जण दिसतात. या सर्वांना ऊर्जा देण्याचे आणि मनात ऊर्मी भरण्याचे काम या ग्रुपतर्फे होताना दिसत आहे.

अर्थात महामॅरेथॉनमध्ये धावणारी ही सर्व मंडळी अतिशय ताजीतवानी असल्याचं दिसलं. गेल्या काही दिवसांत किंवा वर्षांत धावण्याच्या सरावामुळे ही मंडळी शारीरिकदृष्ट्या अगदी ‘फिट’ आहेत आणि मनानेही तरुण आहेत. नियमित ‘एक्सरसाईज’ आणि ‘चिअरफुल लाईफ’ असं त्यांचं जगणं आहे.

यापैकी अनेक जण स्वत:चा व्यवसायही उत्तमपणे सांभाळत आहेत. या ग्रुपमधील व्यंकटरमण पिचुमणी वगळता सर्वच सदस्य हे बायपास सर्जरी झाल्यानंतर धावायला लागले. सर्जरी होण्याआधी यांच्यापैकी कुणीही धावत नव्हते आणि आता तर अगदी प्रोफे शनल मॅरेथॉनमध्ये ते धावत आहेत. मनात जिद्द असली की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही, याची प्रचीती या ग्रुपने आणून दिली आहे. याचे श्रेय मार्गदर्शक व्यंकटरमण पिचुमणी यांना आणि या ज्येष्ठांच्या जिद्दीला जाते. तरुणांना लाजवेल आणि ज्येष्ठांना मार्गदर्शक ठरेल, अशीच या ग्रुपची कामगिरी आहे.

ग्रुपच्या याच जिद्दीने त्यांना मुंबईहून औरंगाबादेत खेचून आणलं आहे. या ग्रुपला औरंगाबादचेही काहीजण जॉईन झाले आहेत. रविवारी पहाटे या ग्रुपचे बारा ते तेरा सदस्य महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन रस्त्यावरून धावतील तेव्हा औरंगाबादकर निश्चितच त्यांच्या जिद्दीला सलाम करतील.