शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

रिक्षाचालकांना शिस्त लावण्यासाठी सेनेची गांधीगिरी

By admin | Updated: July 11, 2017 04:06 IST

आॅटोरिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा करून शिवसेनेने सोमवारी रेल्वे स्थानकावर गांधीगिरी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आॅटोरिक्षाचालकांना वठणीवर आणण्यासाठी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा करून शिवसेनेने सोमवारी रेल्वे स्थानकावर गांधीगिरी केली. ठाण्यात आॅटोरिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे. विनयभंग आणि तरुणींना मारहाण करण्यापर्यंत रिक्षाचालकांनी मजल गाठली. अलीकडच्या काळात घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांमुळे रिक्षाचालकांबद्दल ठाणेकरांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी रेल्वे स्थानकावरील आॅटो स्टॅण्डवर आंदोलन केले. महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह पक्षाचे इतर नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले. प्रवाशांना रिक्षा करून देण्यास नगरसेवकांनी या वेळी मदत केली. रिक्षाचालकांना गुलाबाची फुले देऊन, नियमांचे पालन करण्याचे आवाहन या वेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांना केले. हे आंदोलन गत आठ दिवसांपासून सुरू असल्याचे महापौरांनी या वेळी सांगितले. परिवहन समिती सदस्य प्रकाश पायरे यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन सुरू आहे. आणखी महिनाभर सेनेचा हा कार्यक्रम सुरू राहील, असे महापौरांनी या वेळी सांगितले. आॅटोरिक्षामध्ये चालकाचा संपूर्ण तपशील लावण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. >वेळ चुकली अन जागाही...शिवसेनेने गांधीगिरी आंदोलन करण्यासाठी ठरवलेली वेळ तर चुकलीच, शिवाय जागाही चुकली. सेनेच्या या आंदोलनामुळे प्रवाशांची सोय कमी आणि गैरसोयच जास्त झाली. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गुलाबाची फुले घेऊन उभे राहिल्याने अगोदरच अरुंद जागेत उभारलेल्या आॅटोस्टॅण्डवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. एरव्ही, रिक्षा स्टॅण्डवर रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना साधारणत: ७ ते ८ मिनिटांत रिक्षा मिळते. सेनेच्या आंदोलनामुळे मात्र १५ ते २० मिनिटे थांबावे लागल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. ऐन सायंकाळी कामावरून आलेल्या ठाणेकरांना घरी पोहोचण्याची गडबड असताना सेनेने आंदोलन केले. वेळ दुसरी निवडली असती, तर आणखी बरे झाले असते, असे मतही काही प्रवाशांनी या वेळी व्यक्त केले....तर सेना स्टाइल आंदोलन : सेनेने केलेली गांधीगिरी हा पक्षाच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. या गांधीगिरीतून आॅटोरिक्षाचालकांमध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे. मात्र, चालकांमध्ये सुधारणा झाली नाही, तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी सेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा महापौरांनी या वेळी दिला.