शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

बुलेट ट्रेनवरून सेनेच्या मंत्र्यांचा ‘वॉकआउट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 05:50 IST

शिवसेनेच्या मंत्र्यांनी अनेक शंका उपस्थित करूनही त्याची फारशी दखल न घेता, राज्य मंत्रिमंडळाने आज मुंबईसह राज्यासाठी फेरीवाला धोरणास मंजुरी दिली. दुसरीकडे बुलेट ट्रेनचा

मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांनी अनेक शंका उपस्थित करूनही त्याची फारशी दखल न घेता, राज्य मंत्रिमंडळाने आज मुंबईसह राज्यासाठी फेरीवाला धोरणास मंजुरी दिली. दुसरीकडे बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ऐन वेळी आणल्याचे कारण देत, सेनामंत्र्यांनी विरोध दर्शविला आणि दोन्ही कारणांवरून मंत्रिमंडळ बैठकीतून ‘वॉकआउट’ केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तथापि, असे काहीही घडले नाही. शिवसेनेचे मंत्री बैठकीला पूर्ण वेळ हजर होते, असे मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. भाजपा आणि शिवसेनेत बाहेर अनेकदा आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्याचे परिणाम आतापर्यंत होत नव्हते. तसा दावाही भाजपाकडून सातत्याने केला जात होता. आज पहिल्यांदाच दोन पक्षांमधील वादाची ठिणगी मंत्रिमंडळात पडली. फेरीवाला धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तथापि, त्याबाबतचे वस्तुनिष्ठ धोरण ठरविण्यासाठी, तसेच बुलेट ट्रेनबाबतही मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. बुलेट ट्रेनचा प्रकल्प ९७ हजार ६०० कोटी रुपयांचा असून, त्यापैकी ७९ हजार कोटी रुपये हे जायका या जपानी वित्तीय संस्थेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. उर्वरित २० हजार कोटी रुपयांपैकी केंद्र सरकार १० हजार कोटी रुपये आणि गुजरात व महाराष्ट्र सरकार प्रत्येकी पाच हजार कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. राज्य सरकारने पाच हजार कोटी रुपये, त्यासाठी देणे आणि बुलेट ट्रेनच्या उभारणीसाठी खास कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीसमोर आला. सूत्रांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी वितरित केलेल्या अजेंड्यावर हा विषय नव्हता. ऐन वेळी आणल्याबद्दल सेनेच्या मुंबईतील मंत्र्यांनी त्यास हरकत घेतली. पुणे मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि दोनच दिवसांत पर्यावरण विभागाने त्यास स्थगिती दिली. असे बुलेट ट्रेनबाबत होऊ नये. बुलेट ट्रेनबाबत अनेक आक्षेप आहेत. (विशेष प्रतिनिधी) उद्धव यांचा फोन आला...मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान, शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यास दोन वेळा फोन आला. ते मंत्री उठून बाहेर गेले आणि पुन्हा बैठकीत आले. तो फोन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा होता, अशी चर्चा आहे.‘मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरण आधीपासूनच अस्तित्वात आहे. नव्या धोरणामुळे आधीच्या धोरणाचे काय होणार, नवीन धोरणातील तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत, हे कोणालाही कळलेले नाही, असे सेनामंत्र्यांचे म्हणणे होते.