शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

बुलेट ट्रेनवरून सेनेच्या मंत्र्यांचा ‘वॉकआउट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 05:50 IST

शिवसेनेच्या मंत्र्यांनी अनेक शंका उपस्थित करूनही त्याची फारशी दखल न घेता, राज्य मंत्रिमंडळाने आज मुंबईसह राज्यासाठी फेरीवाला धोरणास मंजुरी दिली. दुसरीकडे बुलेट ट्रेनचा

मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांनी अनेक शंका उपस्थित करूनही त्याची फारशी दखल न घेता, राज्य मंत्रिमंडळाने आज मुंबईसह राज्यासाठी फेरीवाला धोरणास मंजुरी दिली. दुसरीकडे बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ऐन वेळी आणल्याचे कारण देत, सेनामंत्र्यांनी विरोध दर्शविला आणि दोन्ही कारणांवरून मंत्रिमंडळ बैठकीतून ‘वॉकआउट’ केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तथापि, असे काहीही घडले नाही. शिवसेनेचे मंत्री बैठकीला पूर्ण वेळ हजर होते, असे मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. भाजपा आणि शिवसेनेत बाहेर अनेकदा आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर त्याचे परिणाम आतापर्यंत होत नव्हते. तसा दावाही भाजपाकडून सातत्याने केला जात होता. आज पहिल्यांदाच दोन पक्षांमधील वादाची ठिणगी मंत्रिमंडळात पडली. फेरीवाला धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तथापि, त्याबाबतचे वस्तुनिष्ठ धोरण ठरविण्यासाठी, तसेच बुलेट ट्रेनबाबतही मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. बुलेट ट्रेनचा प्रकल्प ९७ हजार ६०० कोटी रुपयांचा असून, त्यापैकी ७९ हजार कोटी रुपये हे जायका या जपानी वित्तीय संस्थेकडून कर्ज स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. उर्वरित २० हजार कोटी रुपयांपैकी केंद्र सरकार १० हजार कोटी रुपये आणि गुजरात व महाराष्ट्र सरकार प्रत्येकी पाच हजार कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. राज्य सरकारने पाच हजार कोटी रुपये, त्यासाठी देणे आणि बुलेट ट्रेनच्या उभारणीसाठी खास कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीसमोर आला. सूत्रांनी सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी वितरित केलेल्या अजेंड्यावर हा विषय नव्हता. ऐन वेळी आणल्याबद्दल सेनेच्या मुंबईतील मंत्र्यांनी त्यास हरकत घेतली. पुणे मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि दोनच दिवसांत पर्यावरण विभागाने त्यास स्थगिती दिली. असे बुलेट ट्रेनबाबत होऊ नये. बुलेट ट्रेनबाबत अनेक आक्षेप आहेत. (विशेष प्रतिनिधी) उद्धव यांचा फोन आला...मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान, शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्यास दोन वेळा फोन आला. ते मंत्री उठून बाहेर गेले आणि पुन्हा बैठकीत आले. तो फोन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा होता, अशी चर्चा आहे.‘मुंबई महापालिकेचे फेरीवाला धोरण आधीपासूनच अस्तित्वात आहे. नव्या धोरणामुळे आधीच्या धोरणाचे काय होणार, नवीन धोरणातील तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत, हे कोणालाही कळलेले नाही, असे सेनामंत्र्यांचे म्हणणे होते.