शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सेनेने घेतले नमते

By admin | Updated: October 22, 2014 06:24 IST

भाजपाकडून प्रस्ताव येण्याची वाट पाहणाऱ्या शिवसेनेने अखेर नमते घेतले असून, शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई हे दिल्लीत नवनियुक्त प्रभारी जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याकरिता रवाना झाले आहेत

मुंबई : भाजपाकडून प्रस्ताव येण्याची वाट पाहणाऱ्या शिवसेनेने अखेर नमते घेतले असून, शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई हे दिल्लीत नवनियुक्त प्रभारी जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याकरिता रवाना झाले आहेत. भाजपाचे नेते शिवसेनेला फार महत्त्वाची मंत्रिपदे देण्यास तयार नाहीत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी तसेच निवडणूक प्रभारी ओम माथूर यांच्याशी बोलत होते. महाराष्ट्रातील नेत्यांशी बोलण्याचे त्यांनी टाळले होते. मात्र माथूर यांची मंगळवारी दुपारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर माथूर यांनी राज्यात कोणत्याही परिस्थितीत भाजपा सरकार स्थापन करणार व कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, असे स्पष्ट संकेत सेनेला दिले. बदलत्या राजकीय परिस्थितीचा व ताकदीचा अंदाज घेऊन जो आपली भूमिका बदलतो तोच खरा नेता असतो, असे विधान माथूर यांनी केले. भाजपाला सत्ता स्थापन करण्यास २२ आमदार हवे आहेत. त्यामुळे पाच अथवा सात आमदारांच्या मागे एक याप्रमाणे शिवसेनेला जास्तीत जास्त दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे मिळतील, असे समजते. भाजपाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर सुभाष व अनिल देसाई मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील व त्यानंतर शिवसेना पाठिंब्याचा निर्णय घेईल, असे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे. मात्र हा पाठिंबा घेण्यावरून भाजपामध्ये दोन मतप्रवाह आहेत. (विशेष प्रतिनिधी)