शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

मुंबईत दुष्काळग्रस्तांना पाण्याची विक्री?

By admin | Updated: April 30, 2016 01:23 IST

मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या दुष्काळग्रस्तांना पाणी विकत मिळते का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडे केली.

मुंबई : मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे नांदेडहून घरदार सोडून मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या दुष्काळग्रस्तांना पाणी विकत मिळते का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडे केली. मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांच्या स्थितीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे ४ मेपर्यंत द्या, असे निर्देशही उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेला दिले.दुष्काळामुळे हाताला काम नसल्याने घरदार सोडून मुंबईत आलेल्या नांदेडच्या दुष्काळग्रस्तांना मुंबईत विकत पाणी घ्यावे लागते. तसेच त्यांना झोपडपट्टीतील गुंडांच्या दडपशाहीला सामोरे जावे लागते. त्याशिवाय त्यांचे अन्न तेथील जनावरेही पळवतात. त्यांना मुंबईत दिलासा मिळण्यापेक्षा त्यांची होरपळ होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये आल्यानंतर खुद्द मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाला जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने निबंधकांना पत्र लिहून ही याचिका दाखल करून घेतली. याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. डी. एच. वाघेला व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे झाली.एकीकडे पाणी खरेदी करावे लागत आहे, तर दुसरीकडे त्यांच्याकडून खुल्या मैदानात राहण्याचे पैसे मागितले जात असल्याने दुष्काळग्रस्तांपुढे पेच पडला आहे, असे पत्रासह जोडण्यात आलेल्या वृत्तात म्हटले आहे. (प्रतिनिधी)>बातम्यांची दखलमुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांच्या व्यथा मांडणाऱ्या वृत्तपत्रांमधील बातम्यांच्या आधारे राज्य विधी सेवा प्राधिकरणाने जनहित याचिका दाखल केली. ‘लोकमत’सुद्धा मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांची होरपळ सातत्याने मांडत आहे.