शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

विक्रेते म्हणतात, बियाण्यांची नो गॅरंटी

By admin | Updated: June 19, 2014 00:54 IST

राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या

लाखोंचे बियाणे परत : चार कंपन्यांविरोधात खटला दाखल करण्याच्या हालचालीरूपेश उत्तरवार - यवतमाळ राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या हालचाली कृषी विभागाने सुरू केल्या आहे. अशा स्थितीत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उगवन क्षमतेसंदर्भात नो गॅरेंटीचा सुर आळवणे सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. जिल्हयात तीन लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड होणार आहे. त्याकरिता दोन लाख ५६ हजार क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात एक लाख ८६ हजार हेक्टरवर बियाणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यास्थितीत बोगस बियाणे बाजारात आले. कृषी विभागाच्या धाडीत ते उघड झाले. अशा चार कंपन्या विरोधात कृषी विभागाने न्यायालयात खटला भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. याच लॉटचे बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या घरात पोहचण्याचा धोका आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना सावध पावले उचलणे सुरू केले आहे. बियाण्यांची उगवण क्षमता कशी आहे, त्याची गॅरंटी आहे का, असे प्रश्न विचारताच विक्रेत्यांनी त्यांना नो गॅरंटी असे सांगणे सुरू केले आहे.अल निनोने शेतकरी धास्तावलेहवामान खात्याने यावर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तविला. सोेबत अल निनोचा धोका वर्तविला आहे. या स्थितीत बियाणे बोगस असल्यास दुबार पेरणीची संधीच मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी बियाण्याच्या बाबतीत धास्तावले आहे.