शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळवाल्यांना सिद्ध करावे लागणार त्यांचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 03:18 IST

मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती करू नका, अशी आग्रही भूमिका घेणारे...

मुंबई : मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती करू नका, अशी आग्रही भूमिका घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. या स्वबळवाल्यांना आता त्यांचे स्वत:चे बळ सिद्ध करावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच मुंबईत युती व्हावी या भूमिकेचे होते. शिवसेनेला सत्तेत सोबत घेतलेले असताना निवडणुकीत युती तोडू नये, असे त्यांना वाटत होते. तथापि, मुंबईतील भाजपाच्या नेत्यांनी त्यांना स्वबळाचे साकडे घातले. त्यात वरील तीन नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे म्हटले जाते. त्यामुळे हे तिघे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करीत असलेले खा. किरीट सोमय्या हे प्रचारादरम्यान शिवसेनेच्या रडारवर असतील. या चौघांच्या मतदारसंघात भाजपाची कोंडी करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. भाजपाच्या मुंबईतील नेत्यांनी स्वबळासाठी पक्षनेतृत्वाला जे तर्क दिले त्यानुसार, मुंबईत शिवसेनेला २०१२ वा त्याआधी सत्ता मिळाली त्यात भाजपाचे मोठे योगदान होते. या शहरात आमची ताकद किती आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसले. शिवसेनेपेक्षा आमचा एक आमदार जास्त निवडून आला. भाजपाची वाढती ताकद शिवसेना मान्यच करीत नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ज्या भागांचा उल्लेख केला जातो ते दादर, लालबाग, परळ, वरळी, माहीम या भागात भाजपाला विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली. तसेच, या भागात उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारतींमध्ये आज भाजपाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे, अशी भूमिका या नेत्यांनी मांडली होती. युतीची बोलणी होत असतानाच्या काळात आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतानादेखील हा तर्क दिलेला होता. आता तो खरा करण्याची जबाबदारी शेलार यांच्यावर असेल. आपला परंपरागत मतदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता मतदार, हिंदी, गुजराती भाषिक मतदार यावर मुख्यत्वे भाजपाची मदार राहील. २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतबँकेला मनसेने मोठा सुरुंग लावला होता. दादरच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. गेल्या वेळेइतकी मते या वेळी मनसेला मिळणार नाहीत, असे म्हटले जाते. मनसेचा मतांचा घसरलेला टक्का शिवसेनेच्या पथ्यावर पडेल. विशेषत: शिवसेना आणि मनसेत विभागली गेलेली मराठी मते शिवसेनेकडे वळली तर ती भाजपासाठी चिंतेची बाब असेल. (विशेष प्रतिनिधी)