शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

स्वबळवाल्यांना सिद्ध करावे लागणार त्यांचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 03:18 IST

मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती करू नका, अशी आग्रही भूमिका घेणारे...

मुंबई : मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती करू नका, अशी आग्रही भूमिका घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. या स्वबळवाल्यांना आता त्यांचे स्वत:चे बळ सिद्ध करावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच मुंबईत युती व्हावी या भूमिकेचे होते. शिवसेनेला सत्तेत सोबत घेतलेले असताना निवडणुकीत युती तोडू नये, असे त्यांना वाटत होते. तथापि, मुंबईतील भाजपाच्या नेत्यांनी त्यांना स्वबळाचे साकडे घातले. त्यात वरील तीन नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे म्हटले जाते. त्यामुळे हे तिघे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करीत असलेले खा. किरीट सोमय्या हे प्रचारादरम्यान शिवसेनेच्या रडारवर असतील. या चौघांच्या मतदारसंघात भाजपाची कोंडी करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. भाजपाच्या मुंबईतील नेत्यांनी स्वबळासाठी पक्षनेतृत्वाला जे तर्क दिले त्यानुसार, मुंबईत शिवसेनेला २०१२ वा त्याआधी सत्ता मिळाली त्यात भाजपाचे मोठे योगदान होते. या शहरात आमची ताकद किती आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसले. शिवसेनेपेक्षा आमचा एक आमदार जास्त निवडून आला. भाजपाची वाढती ताकद शिवसेना मान्यच करीत नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ज्या भागांचा उल्लेख केला जातो ते दादर, लालबाग, परळ, वरळी, माहीम या भागात भाजपाला विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली. तसेच, या भागात उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारतींमध्ये आज भाजपाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे, अशी भूमिका या नेत्यांनी मांडली होती. युतीची बोलणी होत असतानाच्या काळात आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतानादेखील हा तर्क दिलेला होता. आता तो खरा करण्याची जबाबदारी शेलार यांच्यावर असेल. आपला परंपरागत मतदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता मतदार, हिंदी, गुजराती भाषिक मतदार यावर मुख्यत्वे भाजपाची मदार राहील. २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतबँकेला मनसेने मोठा सुरुंग लावला होता. दादरच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. गेल्या वेळेइतकी मते या वेळी मनसेला मिळणार नाहीत, असे म्हटले जाते. मनसेचा मतांचा घसरलेला टक्का शिवसेनेच्या पथ्यावर पडेल. विशेषत: शिवसेना आणि मनसेत विभागली गेलेली मराठी मते शिवसेनेकडे वळली तर ती भाजपासाठी चिंतेची बाब असेल. (विशेष प्रतिनिधी)