शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

स्वबळवाल्यांना सिद्ध करावे लागणार त्यांचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 03:18 IST

मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती करू नका, अशी आग्रही भूमिका घेणारे...

मुंबई : मुंबईत कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती करू नका, अशी आग्रही भूमिका घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. या स्वबळवाल्यांना आता त्यांचे स्वत:चे बळ सिद्ध करावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच मुंबईत युती व्हावी या भूमिकेचे होते. शिवसेनेला सत्तेत सोबत घेतलेले असताना निवडणुकीत युती तोडू नये, असे त्यांना वाटत होते. तथापि, मुंबईतील भाजपाच्या नेत्यांनी त्यांना स्वबळाचे साकडे घातले. त्यात वरील तीन नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती, असे म्हटले जाते. त्यामुळे हे तिघे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करीत असलेले खा. किरीट सोमय्या हे प्रचारादरम्यान शिवसेनेच्या रडारवर असतील. या चौघांच्या मतदारसंघात भाजपाची कोंडी करण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. भाजपाच्या मुंबईतील नेत्यांनी स्वबळासाठी पक्षनेतृत्वाला जे तर्क दिले त्यानुसार, मुंबईत शिवसेनेला २०१२ वा त्याआधी सत्ता मिळाली त्यात भाजपाचे मोठे योगदान होते. या शहरात आमची ताकद किती आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिसले. शिवसेनेपेक्षा आमचा एक आमदार जास्त निवडून आला. भाजपाची वाढती ताकद शिवसेना मान्यच करीत नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ज्या भागांचा उल्लेख केला जातो ते दादर, लालबाग, परळ, वरळी, माहीम या भागात भाजपाला विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळाली. तसेच, या भागात उभ्या राहिलेल्या बहुमजली इमारतींमध्ये आज भाजपाचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे, अशी भूमिका या नेत्यांनी मांडली होती. युतीची बोलणी होत असतानाच्या काळात आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतानादेखील हा तर्क दिलेला होता. आता तो खरा करण्याची जबाबदारी शेलार यांच्यावर असेल. आपला परंपरागत मतदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहता मतदार, हिंदी, गुजराती भाषिक मतदार यावर मुख्यत्वे भाजपाची मदार राहील. २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या मतबँकेला मनसेने मोठा सुरुंग लावला होता. दादरच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. गेल्या वेळेइतकी मते या वेळी मनसेला मिळणार नाहीत, असे म्हटले जाते. मनसेचा मतांचा घसरलेला टक्का शिवसेनेच्या पथ्यावर पडेल. विशेषत: शिवसेना आणि मनसेत विभागली गेलेली मराठी मते शिवसेनेकडे वळली तर ती भाजपासाठी चिंतेची बाब असेल. (विशेष प्रतिनिधी)