शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

निवड विधिमंडळासाठी, सेवा महसूलमंत्र्याची!  विशेष कार्य अधिकारी पद वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 06:10 IST

विधिमंडळ सचिवालयात मोठ्या प्रमाणावर अधिकाºयांची कमतरता असल्याचे भासवत विशेष कार्य अधिकारी हे पद भरण्याचा प्रस्ताव तयार करून त्या जागेवर श्रीनिवास जाधव यांची ‘कायमस्वरूपी बदलीने नियुक्ती’ केली गेली.

- अतुल कुलकर्णीमुंबई : विधिमंडळ सचिवालयात मोठ्या प्रमाणावर अधिकाºयांची कमतरता असल्याचे भासवत विशेष कार्य अधिकारी हे पद भरण्याचा प्रस्ताव तयार करून त्या जागेवर श्रीनिवास जाधव यांची ‘कायमस्वरूपी बदलीने नियुक्ती’केली गेली. मात्र, बदली कायमस्वरूपी नसते आणि कायमस्वरूपी नियुक्ती ही बदली नसताना जाधव यांची बदली झाली की कायमची नियुक्ती, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. २०१४ मध्ये भाजपाचे सरकार येताच जाधव यांची नियुक्ती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात केली गेली.जाधव यांच्या सगळ्या नेमणुकांमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. त्यातीलठळक गोष्टी अशा - विशेष कार्य अधिकारी हे पद निर्माण करताना जी भूमिका विधानमंडळ सचिवालयाने मांडली होती, त्यालाच छेद देत तीन वर्षे विधिमंडळातील विशेष कार्य अधिकारी हे पद रिक्त ठेवून जाधव यांची महसूलमंत्र्यांकडे नेमणूक केली गेली. त्या कालावधीत विधिमंडळ सचिवालयाने जाधव यांच्या मंत्री आस्थापनेवर जाण्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोणाचीही नेमणूक केली नाही. तीन वर्षे हे पद रिक्त राहिल्यामुळे ते आपोआप व्यपगत होते. जाधव यांच्या निवृत्तीनंतर पुन्हा त्यांना मंत्री आस्थापनेवर एक वर्ष मुदतवाढ दिली गेली. याचा अर्थ जाधव यांची विधिमंडळ सचिवालयाला गरज होती की मंत्री आस्थापनेला हे एक गौडबंगाल असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.जाधव यांनी मंत्री आस्थापनेवर जाताना जो अर्ज केला होता त्यात ‘आपण विधानसभा अध्यक्ष यांच्या आस्थापनेवर सचिव या पदवार काम करत आहे व माझ्या प्रशासकीय कामाचा अनुभव व शैक्षणिक अर्हता लक्षात घ्यावी’ असे म्हटले होते. पण अध्यक्ष किंवा मंत्री आस्थापनेवर प्रतिनियुक्तीने जरी काम केलेलेअसले तरी ते काम खासगी आस्थापनेवरील असल्यामुळे तो अनुभव गृहीत धरला जात नाही तरीही त्यांनी तसे भासवून ती मागणी केली होती.एसटी महामंडळातून विधिमंडळात जाधव यांची नेमणूक करायची होती. त्यासाठीच्या मुख्यमंत्री, अध्यक्ष, सभापती यांच्या बैठकीत स्वत: जाधवही उपस्थित होते. त्या बैठकीत त्यांच्यासाठीच पद निर्माण करायचे असताना ते स्वत:च तेथे हजर राहिल्याच्या नोंदी आहेत.बुलेट ट्रेनच्या वेगाने कामजाधव यांची एसटी महामंडळातून विधिमंडळात नियुक्ती करताना अध्यक्ष, सभापती, मुख्यमंत्री, प्रधान सचिव (वित्त), सचिव (व्यय), उपसचिव, अव्वर सचिव, याशिवाय विधिमंडळाचे प्रधान सचिव, अव्वर सचिव, कक्ष अधिकारी अशा अनेक अधिकाºयांच्या सह्या आणि तत्कालीन सभापती बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेले नेमणूकपत्र या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी म्हणजे ३१ आॅगस्ट २००९ रोजीच्या आहेत. एकाच दिवशी एवढे सगळे अधिकारी, नेते एकत्र आले आणि त्या फाइलवर सह्या करून मोकळे झाले. एवढ्या वेगाने तर मागच्या आणि आताच्या सरकारने एकही कल्याणकारी निर्णय घेतलेला नसेल. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार