शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन साखर कारखान्यांवर जप्ती

By admin | Updated: January 29, 2017 01:07 IST

सांगोल्याचा सांगोला सहकारी, अकलूजचा शंकर सहकारी व अक्कलकोटचा स्वामी समर्थ या तीन सहकारी साखर कारखान्यांकडील थकबाकीच्या वसुलीसाठी राज्य बँकेने

सोलापूर: सांगोल्याचा सांगोला सहकारी, अकलूजचा शंकर सहकारी व अक्कलकोटचा स्वामी समर्थ या तीन सहकारी साखर कारखान्यांकडील थकबाकीच्या वसुलीसाठी राज्य बँकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे़ या कारखान्यांचा रितसर ताबा देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याची तयारीही केल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी सांगितले.सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीमध्ये असलेल्या सर्वच सहकारी संस्थांची मालमत्ता विक्री करून, वसुली करण्याचा निर्धार त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़ हे तिन्ही साखर कारखाने राज्य बँकेचे थकबाकीदार आहेत. सांगोला कारखान्याकडे राज्य बँकेचे ३६ कोटी, शंकरकडे ३९ कोटी व स्वामी समर्थकडे सुमारे ८ कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल होत नसल्याने, बँकेने मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. बाळे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला कागद कारखान्याकडे १७ कोटी इतकी थकबाकी असून, जागेवर काहीच शिल्लक ठेवले नाही. शिवाय रिकाम्या जागेवर अतिक्रमणही केले आहे. रिकाम्या जागेची विक्री करून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय शारदा सहकारी सूतगिरणीकडे १९ कोटी, नान्नज येथील शरद सहकारी सूतगिरणीकडे १० कोटी, वैराग येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याकडे ३२ कोटी ६१ लाख इतकी थकबाकी आहे़ या वसुलीसाठी जप्तीची कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)राज्य बँकेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्रया तीनही कारखान्यांच्या जप्तीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाने दाद दिली नाही. यामुळे जप्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर कार्यवाही करावी व मालमत्ता ताब्यात द्यावी, यासाठी राज्य बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनीही दखल घेतली नाही, तर न्यायालयात दाद मागणार आहोत, असे राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी सांगितले.