शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

इतिहास पाहून करा भविष्याची तयारी - छत्रपती शाहूमहाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:06 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्यचा कारभार आपल्या हाती घेतला.

पुणे: छत्रपती शिवाजीमहाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर राजाराम महाराजांनी स्वराज्यचा कारभार आपल्या हाती घेतला. त्यांच्यानंतर ताराबाई यांनी ही स्वराज्याची ज्योत पेटती ठेवली. महाराष्ट्रातील स्त्रिया कमी नाहीत हे दाखवून दिले. आपण आधुनिक काळात राहून इतिहासाचा विचार केला पाहिजे व भविष्याची तयारी केली पाहिजे, असे आवाहन शाहू छत्रपती महाराज यांनी केले.महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर आणि छत्रपती राजाराम महाराज स्मारक समिती आयोजित ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात ते बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, सिम्बायोसिसचे संस्थापक शां. ब. मुजुमदार, खासदार संभाजीराजे छत्रपती, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी कोल्हापूर अध्यक्ष श्रीपत शिंदे, छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, प्रवीण गायकवाड, राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, मुकुंद काकडे, मंजुश्री पवार उपस्थित होते.ताकवले म्हणाले, ‘‘शिवाजी महाराज, संभाजीमहाराज, राजाराम महाराज यांनी स्वराज्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. तो संघर्ष समाजात अजूनही चालू आहे. कोणत्याही लढ्यासाठी नेतृत्वाची गरज असते. ती या तिन्ही छत्रपती महाराजांनी त्या काळात पूर्ण केली. पण आता हे नेतृत्व कोणालाच करता येत नाही.’’राणी ताराबार्इंनी वयाच्या पंचवीस वर्षांत औरंगजेबाशी लढा दिला. अशा राणीचे आपल्या तरुणींना नावही माहीत नाही. तीच माहिती कळण्यासाठी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात मी राजाराम महाराजांचा विचार करून इतिहास मांडला आहे.- जयसिंगराव पवार 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्र