शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

धर्मनिरपेक्षता ही भारताची गरज

By admin | Updated: May 23, 2015 00:34 IST

कुमार केतकर : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा प्रारंभ

कणकवली : भारतात विविध धर्म आणि जातीतील लोक कित्येक वर्षे सहिष्णु सहजीवन जगत आले आहेत. भारताला कोणत्याही एका धर्मात किंवा जातीमध्ये बसवू शकत नाही. धर्मनिरपेक्षता ही भारत देशाची गरज असून किंबहुना ती आधीपासूनच नांदत आलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी येथील स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील प्रारंभीचे पुष्प गुंफताना केले. सिंधुरत्न फाऊंडेशनच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन केतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुभाष चव्हाण, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परूळेकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते. ‘बदलते जग आणि धर्मनिरपेक्ष भारत’ या विषयावर केतकर पुढे म्हणाले की, आपण धर्मनिरपेक्षबद्दलचे गैरसमज डोक्यातून काढून टाकले पाहिजेत. भारतातील धर्मनिरपेक्षतेमुळे असलेले स्थैर्य उधळण्याचा कट विविध देश करत आहेत. म्हणून धर्मनिरपेक्षतेची टिंगलटवाळी सुरू आहे. भारताचा मुख्य प्रश्न विकास हा नसून धर्मनिरपेक्षता कशी टिकवावी, हा आहे. शस्त्रास्त्रांची पुरवठादार अमेरिकेनेच अफगाणिस्तानमधील तालिबानी आणि पाकिस्तानातील आयएसआयला पोसले. भारतातील तणाव टिकून राहणे अमेरिकेला हवे आहे. हा तणाव टिकून ठेवण्यासाठी अतिरेक्यांची मदत घेतली जाते. या तणावाचे मूळ अविवेकी धर्मभावनेत आहे. दहशतवादासंदर्भात इस्लामिक अतिरेकी आणि हिंदू भारताची काय भूमिका आहे याबद्दलच विचार केला जातो. जग फक्त इस्लामिक दहशतवादाच्या छायेखाली नाही. खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी १९८०च्या सुमारास ५०-६० हजार लोकांना मारले आणि भारताला वेठीस धरले होते. श्रीलंकन दहशतवादी प्रभाकरन् हा हिंदू होता. अमेरिकेतील ओक्लाहोमा इमारतीचा विध्वंस करून अनेकांना ठार मारणारी व्हाईट सुप्रिमसी संघटना श्वेतवर्णीय ख्रिश्चनांची होती, असे कुमार केतकर म्हणाले. नारायण राणे म्हणाले की, प्रगत देशांनी आपल्या विकासाचा मार्ग कसा काढला व आपण कसा काढावा यासाठी चर्चा व्हायला हवी. प्रगत देशांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)