शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
4
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
5
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
6
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
7
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
8
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
9
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
10
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
11
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
12
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
13
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
14
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
15
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
16
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
17
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
18
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
19
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
20
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम

धर्मनिरपेक्षता ही भारताची गरज

By admin | Updated: May 23, 2015 00:34 IST

कुमार केतकर : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा प्रारंभ

कणकवली : भारतात विविध धर्म आणि जातीतील लोक कित्येक वर्षे सहिष्णु सहजीवन जगत आले आहेत. भारताला कोणत्याही एका धर्मात किंवा जातीमध्ये बसवू शकत नाही. धर्मनिरपेक्षता ही भारत देशाची गरज असून किंबहुना ती आधीपासूनच नांदत आलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी येथील स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील प्रारंभीचे पुष्प गुंफताना केले. सिंधुरत्न फाऊंडेशनच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन केतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुभाष चव्हाण, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परूळेकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते. ‘बदलते जग आणि धर्मनिरपेक्ष भारत’ या विषयावर केतकर पुढे म्हणाले की, आपण धर्मनिरपेक्षबद्दलचे गैरसमज डोक्यातून काढून टाकले पाहिजेत. भारतातील धर्मनिरपेक्षतेमुळे असलेले स्थैर्य उधळण्याचा कट विविध देश करत आहेत. म्हणून धर्मनिरपेक्षतेची टिंगलटवाळी सुरू आहे. भारताचा मुख्य प्रश्न विकास हा नसून धर्मनिरपेक्षता कशी टिकवावी, हा आहे. शस्त्रास्त्रांची पुरवठादार अमेरिकेनेच अफगाणिस्तानमधील तालिबानी आणि पाकिस्तानातील आयएसआयला पोसले. भारतातील तणाव टिकून राहणे अमेरिकेला हवे आहे. हा तणाव टिकून ठेवण्यासाठी अतिरेक्यांची मदत घेतली जाते. या तणावाचे मूळ अविवेकी धर्मभावनेत आहे. दहशतवादासंदर्भात इस्लामिक अतिरेकी आणि हिंदू भारताची काय भूमिका आहे याबद्दलच विचार केला जातो. जग फक्त इस्लामिक दहशतवादाच्या छायेखाली नाही. खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी १९८०च्या सुमारास ५०-६० हजार लोकांना मारले आणि भारताला वेठीस धरले होते. श्रीलंकन दहशतवादी प्रभाकरन् हा हिंदू होता. अमेरिकेतील ओक्लाहोमा इमारतीचा विध्वंस करून अनेकांना ठार मारणारी व्हाईट सुप्रिमसी संघटना श्वेतवर्णीय ख्रिश्चनांची होती, असे कुमार केतकर म्हणाले. नारायण राणे म्हणाले की, प्रगत देशांनी आपल्या विकासाचा मार्ग कसा काढला व आपण कसा काढावा यासाठी चर्चा व्हायला हवी. प्रगत देशांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)