शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्षता ही भारताची गरज

By admin | Updated: May 23, 2015 00:34 IST

कुमार केतकर : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा प्रारंभ

कणकवली : भारतात विविध धर्म आणि जातीतील लोक कित्येक वर्षे सहिष्णु सहजीवन जगत आले आहेत. भारताला कोणत्याही एका धर्मात किंवा जातीमध्ये बसवू शकत नाही. धर्मनिरपेक्षता ही भारत देशाची गरज असून किंबहुना ती आधीपासूनच नांदत आलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी येथील स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील प्रारंभीचे पुष्प गुंफताना केले. सिंधुरत्न फाऊंडेशनच्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन केतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सुभाष चव्हाण, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयेंद्र परूळेकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते. ‘बदलते जग आणि धर्मनिरपेक्ष भारत’ या विषयावर केतकर पुढे म्हणाले की, आपण धर्मनिरपेक्षबद्दलचे गैरसमज डोक्यातून काढून टाकले पाहिजेत. भारतातील धर्मनिरपेक्षतेमुळे असलेले स्थैर्य उधळण्याचा कट विविध देश करत आहेत. म्हणून धर्मनिरपेक्षतेची टिंगलटवाळी सुरू आहे. भारताचा मुख्य प्रश्न विकास हा नसून धर्मनिरपेक्षता कशी टिकवावी, हा आहे. शस्त्रास्त्रांची पुरवठादार अमेरिकेनेच अफगाणिस्तानमधील तालिबानी आणि पाकिस्तानातील आयएसआयला पोसले. भारतातील तणाव टिकून राहणे अमेरिकेला हवे आहे. हा तणाव टिकून ठेवण्यासाठी अतिरेक्यांची मदत घेतली जाते. या तणावाचे मूळ अविवेकी धर्मभावनेत आहे. दहशतवादासंदर्भात इस्लामिक अतिरेकी आणि हिंदू भारताची काय भूमिका आहे याबद्दलच विचार केला जातो. जग फक्त इस्लामिक दहशतवादाच्या छायेखाली नाही. खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी १९८०च्या सुमारास ५०-६० हजार लोकांना मारले आणि भारताला वेठीस धरले होते. श्रीलंकन दहशतवादी प्रभाकरन् हा हिंदू होता. अमेरिकेतील ओक्लाहोमा इमारतीचा विध्वंस करून अनेकांना ठार मारणारी व्हाईट सुप्रिमसी संघटना श्वेतवर्णीय ख्रिश्चनांची होती, असे कुमार केतकर म्हणाले. नारायण राणे म्हणाले की, प्रगत देशांनी आपल्या विकासाचा मार्ग कसा काढला व आपण कसा काढावा यासाठी चर्चा व्हायला हवी. प्रगत देशांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)