शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

गुपचूप-गुपचूप-

By admin | Updated: September 26, 2014 23:30 IST

सरकारनामा

विट्याच्या सदाभाऊंनी टोपी सरळ केली. टोपीची ‘कोंच’ नीट तपासली आणि संजयकाकांना फोन लावला. ‘बोला भाऊ’, असं काकांनी विचारताच भाऊंनी लगेच प्रश्नाला हात घातला, ‘आता कसं हो?...’ त्यांचा प्रश्न मध्येच तोडत काका उत्तरले, ‘भाऊ, कशाला काळजी करताय? पाचजण नाचायला लागले की, तुमचीच फत्ते!’ पण एक शंका भाऊंचं मन कुरतडत होतीच... ‘व्हय, पण तुमचं काय? तुम्ही गोपीला हात देणार की...’ त्यांचा प्रश्न संपण्याआधीच ‘हॅलो... हॅलो... ऐकायला येत नाही. रेंजमध्ये नाही. नंतर बोलू...’ असं म्हणत काकांचा फोन बंद कट झाला... तेव्हापासून काकांचा मोबाईल ‘डायव्हर्ट’ झालाय. सदाभाऊंनी लावला की, त्यावर ‘जय मल्हाऽऽर’ची टोन ऐकायला येतेय आणि ‘कॉल’ गोपीचंदच्या माणसाकडं जातोय म्हणे!विट्याच्या अनिलभाऊंचंही तसंच. त्यांनी रात्रीच आबांना कॉल केला. आबा रात्रीच फोनवर भेटतात म्हणे. (ते दिवसभर कुठं असतात, तपासा... असा प्रचार हल्ली काकांनी सुरू केलाय.) ‘आबा, तुमचं ऐकून भगवा खांद्यावर घेतलाय, पण आता कसं करायचं? तुम्ही आटपाडीकरांबरोबर राहणार, असं सगळे म्हणताहेत...’ भाऊंना आबांच्या उत्तराची अपेक्षा होती. ते काही क्षण थांबले; पण संभाषण एकतर्फीच सुरू होतं. कॉल लागताच तो कट करून आबांनी मोबाईल पीएकडं दिला होता! नंतर तर ते ‘रेंज’बाहेर गेले. ...आणि खरंच आबा ‘रेंज’बाहेर गेले. त्यांनी दंडोबाचा डोंगर गाठला. जयसिंगतात्या आधीच येऊन झाडाच्या आडोशाला थांबलेले दिसले. आबा स्वत:च जवळ गेले आणि कानात कुजबूजले, ‘तिकीट घ्या. त्येचा सूड घ्यायची संधी सोडू नका. शेंडगेबापूंना संपवल्याचा बदला घ्या.’ आबांनी हाक्केबापूंना खुणावलं. बापूंनी तात्यांच्या खांद्यावर हात टाकला. गाडीकडं नेलं. (तिथं काय झालं, हे चाणाक्ष लोकांना सांगायला हवं का?) काही वेळातच जयसिंगतात्यांनी आरेवाडी गाठली. बिरोबाकडं गाऱ्हाणं मांडलं. तेवढ्यात संजयकाकांचा फोन आला... कुणी बघतंय का, असं इकडंतिकडं बघत तात्यांनी तो झट्दिशी बंद केला. तो अजून ‘स्वीच आॅफ’ आहे!जाता जाता : साहेब साखराळेत कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर झोपाळ्यावर बसलेले. सुरेशअण्णा सकाळीच तिथं पोहोचले होते. ‘अर्ज भरा, संध्याकाळी ठरवू’, असं साहेबांनी सांगूनही ते हेका सोडत नव्हते. साहेबांचा फोन वाजला. ‘बोला पाहुणे’, असं म्हणत साहेब थांबले... तिकडचं बोलणं होताच त्यांनी विचारलं, ‘ शिराळ्याकडं कसं बघू आता?... पण खर्चाचं काय? तुमची तयारी आहे काय? झेपत नसंल तर कशाला उतरताय?’ पुढं साहेबांनी फोनवरून आकडेमोड सांगितली. ती ऐकूनच सुरेशअण्णा कावरेबावरे झाले... ‘साहेब, मग तुम्ही म्हणताय तसंच करू’, असं सांगत लगेच उठले... साहेबांचा पायानं झोका सुरू झाला. पीए जवळ आला. अण्णा गेल्याचं बघून साहेब म्हणाले, ‘बरं झालं. तू वेळेवर कॉल केलास. नाहीतर अण्णांनी पाठ सोडली नसती!’- श्रीनिवास नागे