शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

गुपचूप-गुपचूप-

By admin | Updated: September 26, 2014 23:30 IST

सरकारनामा

विट्याच्या सदाभाऊंनी टोपी सरळ केली. टोपीची ‘कोंच’ नीट तपासली आणि संजयकाकांना फोन लावला. ‘बोला भाऊ’, असं काकांनी विचारताच भाऊंनी लगेच प्रश्नाला हात घातला, ‘आता कसं हो?...’ त्यांचा प्रश्न मध्येच तोडत काका उत्तरले, ‘भाऊ, कशाला काळजी करताय? पाचजण नाचायला लागले की, तुमचीच फत्ते!’ पण एक शंका भाऊंचं मन कुरतडत होतीच... ‘व्हय, पण तुमचं काय? तुम्ही गोपीला हात देणार की...’ त्यांचा प्रश्न संपण्याआधीच ‘हॅलो... हॅलो... ऐकायला येत नाही. रेंजमध्ये नाही. नंतर बोलू...’ असं म्हणत काकांचा फोन बंद कट झाला... तेव्हापासून काकांचा मोबाईल ‘डायव्हर्ट’ झालाय. सदाभाऊंनी लावला की, त्यावर ‘जय मल्हाऽऽर’ची टोन ऐकायला येतेय आणि ‘कॉल’ गोपीचंदच्या माणसाकडं जातोय म्हणे!विट्याच्या अनिलभाऊंचंही तसंच. त्यांनी रात्रीच आबांना कॉल केला. आबा रात्रीच फोनवर भेटतात म्हणे. (ते दिवसभर कुठं असतात, तपासा... असा प्रचार हल्ली काकांनी सुरू केलाय.) ‘आबा, तुमचं ऐकून भगवा खांद्यावर घेतलाय, पण आता कसं करायचं? तुम्ही आटपाडीकरांबरोबर राहणार, असं सगळे म्हणताहेत...’ भाऊंना आबांच्या उत्तराची अपेक्षा होती. ते काही क्षण थांबले; पण संभाषण एकतर्फीच सुरू होतं. कॉल लागताच तो कट करून आबांनी मोबाईल पीएकडं दिला होता! नंतर तर ते ‘रेंज’बाहेर गेले. ...आणि खरंच आबा ‘रेंज’बाहेर गेले. त्यांनी दंडोबाचा डोंगर गाठला. जयसिंगतात्या आधीच येऊन झाडाच्या आडोशाला थांबलेले दिसले. आबा स्वत:च जवळ गेले आणि कानात कुजबूजले, ‘तिकीट घ्या. त्येचा सूड घ्यायची संधी सोडू नका. शेंडगेबापूंना संपवल्याचा बदला घ्या.’ आबांनी हाक्केबापूंना खुणावलं. बापूंनी तात्यांच्या खांद्यावर हात टाकला. गाडीकडं नेलं. (तिथं काय झालं, हे चाणाक्ष लोकांना सांगायला हवं का?) काही वेळातच जयसिंगतात्यांनी आरेवाडी गाठली. बिरोबाकडं गाऱ्हाणं मांडलं. तेवढ्यात संजयकाकांचा फोन आला... कुणी बघतंय का, असं इकडंतिकडं बघत तात्यांनी तो झट्दिशी बंद केला. तो अजून ‘स्वीच आॅफ’ आहे!जाता जाता : साहेब साखराळेत कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर झोपाळ्यावर बसलेले. सुरेशअण्णा सकाळीच तिथं पोहोचले होते. ‘अर्ज भरा, संध्याकाळी ठरवू’, असं साहेबांनी सांगूनही ते हेका सोडत नव्हते. साहेबांचा फोन वाजला. ‘बोला पाहुणे’, असं म्हणत साहेब थांबले... तिकडचं बोलणं होताच त्यांनी विचारलं, ‘ शिराळ्याकडं कसं बघू आता?... पण खर्चाचं काय? तुमची तयारी आहे काय? झेपत नसंल तर कशाला उतरताय?’ पुढं साहेबांनी फोनवरून आकडेमोड सांगितली. ती ऐकूनच सुरेशअण्णा कावरेबावरे झाले... ‘साहेब, मग तुम्ही म्हणताय तसंच करू’, असं सांगत लगेच उठले... साहेबांचा पायानं झोका सुरू झाला. पीए जवळ आला. अण्णा गेल्याचं बघून साहेब म्हणाले, ‘बरं झालं. तू वेळेवर कॉल केलास. नाहीतर अण्णांनी पाठ सोडली नसती!’- श्रीनिवास नागे