शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खासगी कंपन्यांचे ७० टक्के बियाणे बाजारात

By admin | Updated: May 18, 2017 02:04 IST

महाबीज, एनएससी बियाणे पुरवठ्याची गती संथ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाऊस नेहमीपेक्षा लवकर धडकण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांना वाजवी भावात बियाणे पुरवठा करणारे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून बियाणे पुरवठ्याची गती मंदावलेली आहे. त्याचवेळी खासगी कंपन्यांनी मागणीच्या तब्बल ७० टक्के बियाण्यांचा पुरवठा बाजारात केला आहे. त्याचवेळी महामंडळाचे तूर, मूग, उडीद बियाणे तर बाजारात पोचलेच नाही. त्यामुळे पेरणी साधण्याची संधी शोधणाऱ्या शेतकऱ्यांना ऐनवेळी अधिक दराने खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.कृषी विभागाने खरीप हंगाम २०१७-१८ साठी शासनाकडे बियाण्यांची मागणी केली आहे. त्यानुसार बियाणे पुरवठ्याचा कालावधीही ठरला आहे. दरम्यान, पाऊस लवकरच धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची पेरणीची वेळ साधण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळण्यासाठी बाजारात मुबलक साठा असणे आवश्यक आहे. मागणीनुसार महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, खासगी कंपन्यांनी बाजारात बियाणे पुरवठ्याला सुरुवात केली आहे. मात्र, त्यामध्ये खासगी कंपन्यांनी शासनाच्या दोन्ही महामंडळांना कमालीचे मागे टाकले आहे. त्यामुळे बाजारात सध्यातरी खासगी कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार आहे. सोयाबीन पुरवठ्यातही खासगी कंपन्या पुढेमहामंडळाचे बियाणे तुलनेने स्वस्त मिळते. मोठ्या प्रमाणात शेतकरी ते बियाणे घेतात. बाजारात सध्या खासगी कंपन्यांचे बियाणे मुबलक प्रमाणात आहे. सोयाबीन बियाण्याचा तर कंपन्यांनी बाजारात ८६ टक्के पुरवठा केला आहे. तर दोन्ही महामंडळाचा पुरवठा ५० टक्क्यांच्या आत आहे. खासगी कंपन्यांनी त्यांना मागणी केलेल्या २६९९० क्विंटलपैकी २३४५० क्विंटलचा पुरवठा केला. महामंडळांनी ४० हजार क्विंटल मागणीच्या तुलनेत १९५०० क्विंटल एवढा पुरवठा केला आहे. खपात महामंडळाचे सोयाबीन बियाणे पुढेवाजवी किमतीत असल्याने महामंडळाच्या बियाण्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. आतापर्यंत बाजारातून विक्री झालेल्या बियाण्यांत महामंडळाचे सोयाबीन ५११५ क्विंटल, तर खासगी कंपन्यांच्या २५६० क्विंटलची नोंद झाली आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल महामंडळाच्या बियाण्यांकडेच अधिक असल्याचे दिसत आहे. महामंडळाचे ४३ टक्केच बियाणे पोचले!कृषी विभागाच्या मागणीप्रमाणे महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून सर्व प्रकारच्या बियाण्यांचा एकूण ४६ हजार ४० क्विंटल पुरवठा होणे आवश्यक आहे. त्या तुलनेत या दोन्ही महामंडळांकडून १५ मे अखेरपर्यंत २० हजार ६० क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे. त्यामध्ये सोयाबीनच १९५०० क्विंटल आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्न पाहता इतर आवश्यक बियाण्यांचा पुरवठा अद्यापही झालेला नाही. तूर, मूग, उडिदाचे बियाणेही बाजारात आलेले नाही. त्यामुळे आधीच बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळांच्या बियाण्यांची प्रतीक्षा आहे.