शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

खासगी कंपन्यांचे ७० टक्के बियाणे बाजारात

By admin | Updated: May 18, 2017 02:04 IST

महाबीज, एनएससी बियाणे पुरवठ्याची गती संथ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाऊस नेहमीपेक्षा लवकर धडकण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांना वाजवी भावात बियाणे पुरवठा करणारे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून बियाणे पुरवठ्याची गती मंदावलेली आहे. त्याचवेळी खासगी कंपन्यांनी मागणीच्या तब्बल ७० टक्के बियाण्यांचा पुरवठा बाजारात केला आहे. त्याचवेळी महामंडळाचे तूर, मूग, उडीद बियाणे तर बाजारात पोचलेच नाही. त्यामुळे पेरणी साधण्याची संधी शोधणाऱ्या शेतकऱ्यांना ऐनवेळी अधिक दराने खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.कृषी विभागाने खरीप हंगाम २०१७-१८ साठी शासनाकडे बियाण्यांची मागणी केली आहे. त्यानुसार बियाणे पुरवठ्याचा कालावधीही ठरला आहे. दरम्यान, पाऊस लवकरच धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची पेरणीची वेळ साधण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळण्यासाठी बाजारात मुबलक साठा असणे आवश्यक आहे. मागणीनुसार महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, खासगी कंपन्यांनी बाजारात बियाणे पुरवठ्याला सुरुवात केली आहे. मात्र, त्यामध्ये खासगी कंपन्यांनी शासनाच्या दोन्ही महामंडळांना कमालीचे मागे टाकले आहे. त्यामुळे बाजारात सध्यातरी खासगी कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार आहे. सोयाबीन पुरवठ्यातही खासगी कंपन्या पुढेमहामंडळाचे बियाणे तुलनेने स्वस्त मिळते. मोठ्या प्रमाणात शेतकरी ते बियाणे घेतात. बाजारात सध्या खासगी कंपन्यांचे बियाणे मुबलक प्रमाणात आहे. सोयाबीन बियाण्याचा तर कंपन्यांनी बाजारात ८६ टक्के पुरवठा केला आहे. तर दोन्ही महामंडळाचा पुरवठा ५० टक्क्यांच्या आत आहे. खासगी कंपन्यांनी त्यांना मागणी केलेल्या २६९९० क्विंटलपैकी २३४५० क्विंटलचा पुरवठा केला. महामंडळांनी ४० हजार क्विंटल मागणीच्या तुलनेत १९५०० क्विंटल एवढा पुरवठा केला आहे. खपात महामंडळाचे सोयाबीन बियाणे पुढेवाजवी किमतीत असल्याने महामंडळाच्या बियाण्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. आतापर्यंत बाजारातून विक्री झालेल्या बियाण्यांत महामंडळाचे सोयाबीन ५११५ क्विंटल, तर खासगी कंपन्यांच्या २५६० क्विंटलची नोंद झाली आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल महामंडळाच्या बियाण्यांकडेच अधिक असल्याचे दिसत आहे. महामंडळाचे ४३ टक्केच बियाणे पोचले!कृषी विभागाच्या मागणीप्रमाणे महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून सर्व प्रकारच्या बियाण्यांचा एकूण ४६ हजार ४० क्विंटल पुरवठा होणे आवश्यक आहे. त्या तुलनेत या दोन्ही महामंडळांकडून १५ मे अखेरपर्यंत २० हजार ६० क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे. त्यामध्ये सोयाबीनच १९५०० क्विंटल आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्न पाहता इतर आवश्यक बियाण्यांचा पुरवठा अद्यापही झालेला नाही. तूर, मूग, उडिदाचे बियाणेही बाजारात आलेले नाही. त्यामुळे आधीच बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळांच्या बियाण्यांची प्रतीक्षा आहे.