शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

माळीणच्या ढिगा-यात जिवांचा शोध सुरूच

By admin | Updated: August 1, 2014 09:07 IST

देव तारी त्याला कोण मारी!’ या म्हणीचा सुखद प्रत्यय माळीण दुर्घटनेत आला

माळीण (ता. आंबेगाव) : ‘देव तारी त्याला कोण मारी!’ या म्हणीचा सुखद प्रत्यय माळीण दुर्घटनेत आला. अख्ख्या गावावर डोंगर कोसळल्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मायलेकाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी रात्रीपर्यंत ढिगाऱ्याखाली ४४ मृतदेह सापडले. अद्यापही २०० ग्रामस्थ चिखलाच्या राडारोड्याखाली अडकले असण्याची भीती असून, या जिवांचा ढिगाऱ्याखाली शोध घेणे सुरूच आहे. माळीणवर बुधवारी सकाळी डोंगराची महाकाय दरड कोसळल्यानंतर दोन तासांच्या आतच मदतकार्य सुरू झाले. मात्र, प्रचंड पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या. रात्रभर सर्चलाईटच्या प्रकाशात चिखलाचे ढिगारे उपसण्यात येत होते. सायंकाळच्या सुमारास एक महिला जीवंत सापडल्याने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनाही (एनडीआरएफ) हुरूप आला होता. मात्र, रात्रभरात केवळ तीनच मृतदेह सापडू शकले. आज सकाळपासून काम आणखी वेगाने सुरू झाले. चार पोकलेन मशीनच्या साहाय्याने ढिगारा उपसण्यास सुरुवात झाली. मात्र, गावाचा परिसर चिंचोळा असल्याने आणि दुसऱ्या बाजूला डोंगर असल्याने एकाच बाजूने उत्खनन सुरू होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत गावातील मारुती मंदिराच्या परिसरापर्यंतचाच ढीग हटविणे शक्य झाले होते. मुख्य गावाचा परिसर मंदिरानंतरच सुरू होत असल्याने बहुतांश घरांवरील चिखलाचा ढीग हटविणे अशक्य झाले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण चिखल हटविण्यास किमान पाच ते सहा दिवस लागू शकतात. त्यानंतरच मृतांचा निश्चित आकडा कळू शकणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे भेट देऊन दुर्घटनेत बचावलेल्या ग्रामस्थांना धीर दिला. दुसरीकडे डोंगररांगात पडकई कार्यक्रम राबविल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश तळेकर यांनी याबाबत घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला.