शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गुप्त वार्ता विभागाला चाणाक्ष अधिकाऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:05 IST

राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत

जमीर काझीमुंबई : राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व पदे मुंबई विभागातील आहेत. त्यासाठी सुशिक्षित तरुणांना आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी १२ जूनपर्यंत मुदत आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हे शहर नेहमीच अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर राहिले आहे. रोज नागरिकांचे हजारो लोंढे उदरनिर्वाहानिमित्त मुंबईत येतात. महानगराची लोकसंख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. त्या तुलनेत दहशतवादी संघटना, राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्यावर नजर ठेवून गुप्त माहिती मिळविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तोकडे पडत आहे. त्यामुुळे या ठिकाणी सहायक अधिकाºयांची आवश्यकता असल्याने, आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबई विभागांतर्गत सहायक अधिकारी गट-क या दर्जाची २०६ पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.या पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून, खुल्या गटासाठी ३० वर्षे व मागास उमेदवारासाठी ३३ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. महाराष्टÑ राज्य सरकारच्या संकेतस्थळावर या पदाच्या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.यापूर्वी ८२ पदांची भरतीथेट सहायक गुप्त वार्ता अधिकारी वर्ग-२ ची (एसआयओ) २००९ मध्ये ८२ पदे भरण्यात आली होती. त्यापैकी सध्या ५८ जण विभागात कार्यरत आहेत. उर्वरित अधिकारी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन उपअधीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार बनले आहेत.प्रधान समितीचा अहवालमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्त वार्ता विभागाचा फोलपणा चव्हाट्यावर आला होता. विशेषत: ‘ग्राउंड लेव्हल’ला माहिती मिळविणारी यंत्रणा व सक्षम अधिकारी नसल्याचे ताशेरे हल्ल्याच्या चौकशीबाबत नेमलेल्या प्रधान समितीने अहवालात ओढले होते. त्यामुळे विभागाकडून गेल्या नऊ वर्षांत सहायक अधिकारी गट-क या पदाची तीन वेळा भरती करण्यात आली आहे.अशी होणार भरतीसहायक गुप्त वार्ता अधिकाºयासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून, पुरुषांसाठी १६५ सेमी तर महिलांसाठी १५५ सेमी उंची असणे आवश्यक आहे. एकूण २०४ पदांपैकी ९८ पदे ही खुल्या गटासाठी असून, उर्वरित १०६ पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. आॅनलाइन अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणवत्ता यादी निश्चित करून मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी जाहीरकेली जाईल. या परीक्षेबाबतची माहिती उमेदवाराला ई-मेल करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांकडून तीन वर्षांचा बाँड लिहून घेतला जाणार आहे. या कालावधीत त्यांनी राजीनामा दिल्यास व्यवसायिक प्रशिक्षणाचा सर्व खर्च, त्या काळातील वेतन भरून घेतला जाणार आहे.