शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

गुप्त वार्ता विभागाला चाणाक्ष अधिकाऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:05 IST

राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत

जमीर काझीमुंबई : राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व पदे मुंबई विभागातील आहेत. त्यासाठी सुशिक्षित तरुणांना आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी १२ जूनपर्यंत मुदत आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हे शहर नेहमीच अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर राहिले आहे. रोज नागरिकांचे हजारो लोंढे उदरनिर्वाहानिमित्त मुंबईत येतात. महानगराची लोकसंख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. त्या तुलनेत दहशतवादी संघटना, राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्यावर नजर ठेवून गुप्त माहिती मिळविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तोकडे पडत आहे. त्यामुुळे या ठिकाणी सहायक अधिकाºयांची आवश्यकता असल्याने, आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबई विभागांतर्गत सहायक अधिकारी गट-क या दर्जाची २०६ पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.या पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून, खुल्या गटासाठी ३० वर्षे व मागास उमेदवारासाठी ३३ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. महाराष्टÑ राज्य सरकारच्या संकेतस्थळावर या पदाच्या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.यापूर्वी ८२ पदांची भरतीथेट सहायक गुप्त वार्ता अधिकारी वर्ग-२ ची (एसआयओ) २००९ मध्ये ८२ पदे भरण्यात आली होती. त्यापैकी सध्या ५८ जण विभागात कार्यरत आहेत. उर्वरित अधिकारी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन उपअधीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार बनले आहेत.प्रधान समितीचा अहवालमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्त वार्ता विभागाचा फोलपणा चव्हाट्यावर आला होता. विशेषत: ‘ग्राउंड लेव्हल’ला माहिती मिळविणारी यंत्रणा व सक्षम अधिकारी नसल्याचे ताशेरे हल्ल्याच्या चौकशीबाबत नेमलेल्या प्रधान समितीने अहवालात ओढले होते. त्यामुळे विभागाकडून गेल्या नऊ वर्षांत सहायक अधिकारी गट-क या पदाची तीन वेळा भरती करण्यात आली आहे.अशी होणार भरतीसहायक गुप्त वार्ता अधिकाºयासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून, पुरुषांसाठी १६५ सेमी तर महिलांसाठी १५५ सेमी उंची असणे आवश्यक आहे. एकूण २०४ पदांपैकी ९८ पदे ही खुल्या गटासाठी असून, उर्वरित १०६ पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. आॅनलाइन अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणवत्ता यादी निश्चित करून मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी जाहीरकेली जाईल. या परीक्षेबाबतची माहिती उमेदवाराला ई-मेल करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांकडून तीन वर्षांचा बाँड लिहून घेतला जाणार आहे. या कालावधीत त्यांनी राजीनामा दिल्यास व्यवसायिक प्रशिक्षणाचा सर्व खर्च, त्या काळातील वेतन भरून घेतला जाणार आहे.