शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

गुप्त वार्ता विभागाला चाणाक्ष अधिकाऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 07:05 IST

राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत

जमीर काझीमुंबई : राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व पदे मुंबई विभागातील आहेत. त्यासाठी सुशिक्षित तरुणांना आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी १२ जूनपर्यंत मुदत आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हे शहर नेहमीच अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर राहिले आहे. रोज नागरिकांचे हजारो लोंढे उदरनिर्वाहानिमित्त मुंबईत येतात. महानगराची लोकसंख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. त्या तुलनेत दहशतवादी संघटना, राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्यावर नजर ठेवून गुप्त माहिती मिळविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तोकडे पडत आहे. त्यामुुळे या ठिकाणी सहायक अधिकाºयांची आवश्यकता असल्याने, आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबई विभागांतर्गत सहायक अधिकारी गट-क या दर्जाची २०६ पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.या पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून, खुल्या गटासाठी ३० वर्षे व मागास उमेदवारासाठी ३३ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. महाराष्टÑ राज्य सरकारच्या संकेतस्थळावर या पदाच्या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.यापूर्वी ८२ पदांची भरतीथेट सहायक गुप्त वार्ता अधिकारी वर्ग-२ ची (एसआयओ) २००९ मध्ये ८२ पदे भरण्यात आली होती. त्यापैकी सध्या ५८ जण विभागात कार्यरत आहेत. उर्वरित अधिकारी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन उपअधीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार बनले आहेत.प्रधान समितीचा अहवालमुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्त वार्ता विभागाचा फोलपणा चव्हाट्यावर आला होता. विशेषत: ‘ग्राउंड लेव्हल’ला माहिती मिळविणारी यंत्रणा व सक्षम अधिकारी नसल्याचे ताशेरे हल्ल्याच्या चौकशीबाबत नेमलेल्या प्रधान समितीने अहवालात ओढले होते. त्यामुळे विभागाकडून गेल्या नऊ वर्षांत सहायक अधिकारी गट-क या पदाची तीन वेळा भरती करण्यात आली आहे.अशी होणार भरतीसहायक गुप्त वार्ता अधिकाºयासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून, पुरुषांसाठी १६५ सेमी तर महिलांसाठी १५५ सेमी उंची असणे आवश्यक आहे. एकूण २०४ पदांपैकी ९८ पदे ही खुल्या गटासाठी असून, उर्वरित १०६ पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. आॅनलाइन अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणवत्ता यादी निश्चित करून मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी जाहीरकेली जाईल. या परीक्षेबाबतची माहिती उमेदवाराला ई-मेल करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांकडून तीन वर्षांचा बाँड लिहून घेतला जाणार आहे. या कालावधीत त्यांनी राजीनामा दिल्यास व्यवसायिक प्रशिक्षणाचा सर्व खर्च, त्या काळातील वेतन भरून घेतला जाणार आहे.