शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्यात वनजमिनींचा शोध सुरू, प्रधान वनसचिवांची ताकिद, वनजमिनीची रेकॉर्ड तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 15:41 IST

राज्यातील महसूल जमीन संपत आल्याने वनक्षेत्रावरील अतिक्रमण लक्षात घेता वनविभागाने वनजमिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने महसूलकडून मिळालेली जमीन ही वनविभागाच्या रेकॉर्डवर आणि प्रत्यक्ष जमीन किती? याचा शोध सुरू झाला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देवनजमिनीच्या मोबदल्यात दुप्पट जमीन वनविभागाला देणे क्रमप्राप्त रेकॉर्डवर हजारो हेक्टर जमीन असताना गेली कोठे? याचा शोध सुरू राज्यात सुमारे साडेआठ लाख हेक्टर वनजमिनींची नोंदच नाहीमहसूल आणि वनविभागात ताळमेळ नाही

गणेश वासनिकअमरावती : राज्यातील महसूल जमीन संपत आल्याने वनक्षेत्रावरील अतिक्रमण लक्षात घेता वनविभागाने वनजमिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने महसूलकडून मिळालेली जमीन ही वनविभागाच्या रेकॉर्डवर आणि प्रत्यक्ष जमीन किती? याचा शोध सुरू झाला आहे.विविध कारणाने वनविभागाची गेलेल्या वनजमिनीच्या मोबदल्यात दुप्पट जमीन वनविभागाला देणे क्रमप्राप्त आहे. गत २५ वर्षांपूर्वी वनविभागाला मिळालेली हजारो हेक्टर जमीन अद्यापही रेकॉर्डवर असताना ही जमीन गेली कोठे? याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.

महसूल विभागाने दिलेली जमीन कागदोपत्री ताब्यात देण्यात आली असली तरी तुकड्या-तुकड्यांमध्ये जमिनी प्रत्यक्षात वनविभागाच्या राजपत्रानुसार राखीव वन म्हणून घोषित न झाल्यामुळे तलाठ्याच्या दफ्तरी अशा जमिनीची नोंद सरकारी जमीन अशी आहे. त्यामुळे या जमिनीचा ताबा कुणाचा? याबाबत तर्क लावणे कठीण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल जमीन वनविभागाला दिल्यानंतर त्या जमिनीला सांवैधानिकरीत्या वनाचा दर्जा देऊन राजपत्रात समाविष्ट केले जाते. त्यानंतर तेथे वनविभागाला त्यांच्या कायद्याची रीतसर अंमलबजावणी करणे शक्य होते.

मात्र, राज्यात अनेक ठिकाणी वनजमिनीला राखीव वनाचा दर्जा न मिळाल्यामुळे अशी किती हेक्टर वनजमिनी सरकारी दफ्तरी केवळ जमीन म्हणून नोंद आहे, अशा वनविभागाच्या जमिनीचा शोध घेण्याचे निर्देश राज्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी वनाधिकाऱ्यांना दिल्याने या वनजमिनींचा शोधाशोध सुरू आहे. राज्यात सुमारे साडेआठ लाख हेक्टर वनजमिनींची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे.महसूल आणि वनविभागात ताळमेळ नाहीराज्य शासनाने त्यांच्या लेखी व निर्णयामध्ये महसूल व वनविभाग असे वाक्य लावून हे दोन्ही विभाग संयुक्त असल्याचे निर्देशित केले असले तरी राज्यातील वनविभाग व महसूल विभागात ताळमेळ नाही. महसूल विभागाने वनविभागाला दिलेल्या जमिनीचे ७/१२ देणे क्रमप्राप्त आहे. मात्र ते मिळालेले नाहीत.

गावठान जमिनीवर अतिक्रमण वाढले असल्याने महसुली जमिनीचा पुरता बोजवारा उडाला आहे. वनविभागाला कागदोपत्री दिलेल्या वन जमिनीवर अतिक्रमण असताना अशा जमिनी कागदोपत्री आदान-प्रदान झाल्याचे दिसून येते. वनजमिनीवर झालेले अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असल्याने वनविभाग घायाळ झाला आहे. 

महसूलच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी परत घेण्यासंदर्भात गतवर्षीच शासन निर्णय निर्गमित झाला आहे. मात्र, या निर्णयाची त्वरेने अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा नव्या पत्राद्वारे वनजमिनीचा शोध घेऊन त्या वनविभागाला परत करण्याचे आदेशित केले आहे.- विकास खारगे,प्रधान मुख्य वनसचिव, महाराष्ट्र

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग