शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

By admin | Updated: May 18, 2016 03:23 IST

त्रिवेणी गार्डन सोसायटीने पुढाकार घेत शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा निर्णय घेतला आहे.

कल्याण : एकीकडे दिवसेंदिवस वाढत जाणारी पाणीटंचाई आणि दुसरीकडे खालावत चाललेली भूजल पातळी, अशा गंभीर पाशर््वभूमीवर पश्चिमेतील त्रिवेणी गार्डन सोसायटीने पुढाकार घेत शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा निर्णय घेतला आहे. त्याआधारे थोडे थोडके नव्हे तर तब्बल १० लाख ५० हजार लिटर पाणी जमिनीत जिरवण्यात येणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने पुन्हा जमिनीत पाणी जिरवणारी ही पहिलीच सोसायटी ठरली आहे.वारंवार भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येला इतर रहिवाशांप्रमाणे त्रिवेणी गार्डन सोसायटीतील रहिवासीही कंटाळले होते. त्यासाठी सोसायटी आवारात पाण्याची अजून एक टाकी बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला. परंतु महापालिकेकडून येणारे पाणीच त्यात सोडण्यात येणार होते. मात्र महापालिकेचे पाणीच नाही आले तर करायचे काय?, या विचाराने त्रिवेणी गार्डन ‘ए’ टाइपमधील रिहवाशांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष विजय सूचक यांनी दिली. विशेष म्हणजे कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनीही या निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला. तर नगरसेवक वरु ण पाटील यांनीही या कामासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केल्याचे सूचक म्हणाले.त्यानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रातील तज्ज्ञ केदार पोंक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी आवारात कामही सुरू झाले आहे. यासाठी २४० चौरस फुटांची मोठी टाकी बांधण्यात येत आहे. त्यात पावसाचे सुमारे १० लाख ५० हजार लिटर पाणी साठवता येणार आहे. एवढेच नव्हे तर या जमिनीत पाणी झरिपण्यासाठी चारही बाजूला छिद्र ठेवण्यात आली आहेत. तर टाकी भरल्यानंतर त्यातून वाहून जाणारे पाणी बाजूच्याच दोन बोरवेलमध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही सूचक यांनी सांगितले. तर या टाकीत साठणारे पाणी शुद्ध करण्यासाठी डबर, कपची, खडी आणि कोळसे याचे विविध थर बनविण्यात येणार आहेत. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. येत्या काळात पिण्यासाठी हे पाणी वापरता यावे, यासाठी आरओ प्लांटही बसवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)>अन्य सोसायट्यांनीही पुढाकार घ्यावाहा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागण्यात सचिव अलंकार किर्पेकर, खजीनदार सुहास आराध्ये, अविनाश विद्वांस, संजय पिंगळे, विनायक महाशब्दे यांच्यासह सोसायटीच्या सर्व सदस्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सूचक यांनी सांगितले. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून कल्याणमधील त्रिवेणी गार्डन सोसायटीने राबविलेला हा प्रकल्प पाहून शहरांतील इतर माठ्या सोसायट्याही त्यासाठी पुढाकार घेतील, अशी आशा आहे.>निसर्गाची परतफेड करण्याची वेळ इतके वर्ष आपण निसर्गाकडून पाणी घेतोच आहे, आणखी किती दिवस आपण नुसते घेत राहणार? आता आपण निसर्गाची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आणि हे शास्त्रोक्त पद्धतीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा त्याचाच भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.