शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

तलाठय़ांची आस्थापना एसडीओंच्याच हाती !

By admin | Updated: August 4, 2014 20:50 IST

राज्यभरातील तलाठय़ांची आस्थापना आता एसडीओ अर्थात उपविभागीय अधिकार्‍यांच्या हाती दिल्याने

वाशिम: राज्यभरातील तलाठय़ांची आस्थापना आता एसडीओ अर्थात उपविभागीय अधिकार्‍यांच्या हाती दिल्याने तलाठय़ांच्या सेवाविषयक प्रश्नांना गतीमानतेने सोडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पहिल्यांदाच महसूल दिनी राज्य शासनाने महसूल खात्यांर्गत ग्रामपातळीवर काम करणार्‍या घटकाला त्याच्या प्रश्नाची जलदगतीने सोडवणूक करण्यासाठीचे काम सोपे करुन दिल्याने राज्यभरातील तलाठी संवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

राज्यात ३५ जिल्हे, ३५८ तालुके, १८२ उपविभागीय कार्यालये, १५६४ महसूल मंडळे व १२ हजार ३६७ तलाठी साझे आहेत. या साझ्यांमध्ये कार्यरत तलाठी संवर्गाच्या आस्थापना विषयक अधिकाराचा प्रश्न कुणाच्या अधिकारात द्यायचा याबाबतचा निर्णय शासनस्तरावरुन घेण्याचा घाट घातला जात होता. ३0 जूलै २0१३ रोजी तसे परिपत्रक निघाले असता विदर्भ पटवारी संघटनेने तलाठी मंडळ अधिकारी राज्य समन्वय महासंघाच्या माध्यमातून याविषयी आवाज उठविला होता. तलाठय़ांच्या नियुक्तीपासून नियुक्तीपर्यंतचे सर्व अधिकार उपविभागीय अधिकार्‍यांकडेच का असावे याबाबत तर्कशुध्द पूरावे शासनदरबारी मांडून शासनाला तलाठय़ांच्या आस्थापनाविषयक बाबींवर विचार करायला भाग पाडले होते. त्यानंतर हरकतीत आलेल्या राज्य शासनाने तलाठी - २0१३/ प्र. क्र. ३८९/ई-१0 महसुल व वन विभाग जागतिक व्यापार केंद्र मंत्रालय मुंबई - ५ नुसार राज्यातील सर्व सहाही विभागीय आयुक्तांना तलाठी आस्थापना प्रमुख उपविभागीय अधिकारी ठेवण्याबाबत २६ जूलै २0१३ व ३0 जूलै २0१३ रोजीच्या शासननिर्णयाचा संदर्भ देवून यासंदर्भात चार मुद्दे देत त्यांचे स्पष्टीकरण मागितले होते. प्रत्येक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना १५ जूलै २0१४ पूर्वीच यासंदर्भात आपले अभिप्राय तत्काळप्रभावाने कळविण्याचे आदेशीत केले होते. जिल्हाधिकार्‍यांनीही अधिनस्त सर्व उपविभागीय अधिकार्‍यांना पत्र पाठवून आपले अभिप्राय मागीतले होते. त्या सर्व अभिप्राय व स्पष्टीकरणांचा विचार करुन राज्य शासनाने १ ऑगस्ट २0१४ रोजी आदेश निर्गमित करत तलाठय़ांचे आस्थापनाप्रमुख उपविभागीय अधिकारीच राहतील यावर शिक्कामोर्तब केले आहे.

ही शासनाची महसुल दिनानिमीत्त महसुल विभागातील सर्वात मोठय़ा व महत्वपूर्ण घटकाला दिलेली भेटच मानली जात आहे. त्यामुळे नियुक्तीपासून सेवाज्येष्ठतेने बढती, बदली, सेवाविषयक सर्व प्रश्न उपविभाग स्तरावरच निकाली निघणार आहेत. सोबतच कोणत्याही तल्याठय़ाची बदली यापूढे उपविभागाबाहेर होणार नसल्याचे व विकल्पाचा पर्याय आपल्या हाती असल्याने सेवाज्येष्ठता कायम राहण्याचा प्रश्नही या शासननिर्णयाने स्पष्ट केल्याचे याविषयीच्या जाणकारांनी स्पष्ट केले.