शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

शिष्यवृत्ती घोटाळ्याचे २,१७४ कोटी वसूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:41 IST

सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागामार्फत वाटण्यात आलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या वाटपाची चौकशी करणाºया विशेष चौकशी पथकाने

यदु जोशीमुंबई : सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागामार्फत वाटण्यात आलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या वाटपाची चौकशी करणाºया विशेष चौकशी पथकाने, तब्बल २,१७४ कोटी रुपयांची वसुली विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात यावी, अशी शिफारस राज्य सरकारला दिलेल्या अहवालात केली आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठे शिक्षण संस्थाचालक अडचणीत येण्याची शक्यता आहे.शिष्यवृत्ती घोटाळ्यात २५ शैक्षणिक संस्थांविरुद्ध विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या शिवाय आणखी ७० शैक्षणिक संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची शिफारसदेखील चौकशी पथकाने केली आहे. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या घोटाळ्याची चौकशी तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. के. वेंकटेशम यांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात आली होती. डॉ. वेंकटेशम यांनी सोमवारी आपला अहवाल राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांना सादर केला. धक्कादायक माहिती अशी की, चौकशी पथकाने सामाजिक न्याय विभागातून शिष्यवृत्ती वाटप झालेल्यांपैकी केवळ १३ टक्के संस्थांच्या तर आदिवासी विकास विभागातून वाटप झालेल्या १४ टक्के संस्थांचीच चौकशी केली आणि त्या आधारे २१७४ कोटी रुपयांच्या वसुलीची शिफारस केली आहे. ज्या संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची पथकाने शिफारस केली त्यांच्या गैरव्यवहारांची मुख्यत्वे चौकशी करण्यात आली.विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात डॉ.वेंकटेशम पथकाचा अहवाल राज्य शासन मांडणार का आणि त्या आधारे संबंधितांवर कारवाई करणार का या बाबत आता उत्सुकता आहे. शिष्यवृत्ती वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशीदेखील पथकाने केल्या आहेत.2009-10पासून घोटाळे झाले. शिष्यवृत्तीची रक्कम तदर्थ अनुदान म्हणून शैक्षणिक संस्थांना आगाऊ देण्यात आली. त्यातून घोटाळ्याचे पेव फुटले. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना आदी जिल्ह्यांत कोट्यवधीचे घोटाळे झाले.शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात आलीच नाही, बोगस विद्यार्थ्यांच्या नावे उचल करण्यात आली. अन्य कारणांसाठी रकमेचा वापर संस्थाचालकांनी केला. केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांचा सोईचा अर्थ काढून शासनाच्या तिजोरीतून पैसा काढण्यात आला, असे अनेक प्रकार घडले.