शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

शिष्यवृत्ती घोटाळ्याचे २,१७४ कोटी वसूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 04:41 IST

सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागामार्फत वाटण्यात आलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या वाटपाची चौकशी करणाºया विशेष चौकशी पथकाने

यदु जोशीमुंबई : सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागामार्फत वाटण्यात आलेल्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीच्या वाटपाची चौकशी करणाºया विशेष चौकशी पथकाने, तब्बल २,१७४ कोटी रुपयांची वसुली विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात यावी, अशी शिफारस राज्य सरकारला दिलेल्या अहवालात केली आहे. त्यामुळे अनेक लहान-मोठे शिक्षण संस्थाचालक अडचणीत येण्याची शक्यता आहे.शिष्यवृत्ती घोटाळ्यात २५ शैक्षणिक संस्थांविरुद्ध विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या शिवाय आणखी ७० शैक्षणिक संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची शिफारसदेखील चौकशी पथकाने केली आहे. ‘लोकमत’ने उघडकीस आणलेल्या या घोटाळ्याची चौकशी तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. के. वेंकटेशम यांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात आली होती. डॉ. वेंकटेशम यांनी सोमवारी आपला अहवाल राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांना सादर केला. धक्कादायक माहिती अशी की, चौकशी पथकाने सामाजिक न्याय विभागातून शिष्यवृत्ती वाटप झालेल्यांपैकी केवळ १३ टक्के संस्थांच्या तर आदिवासी विकास विभागातून वाटप झालेल्या १४ टक्के संस्थांचीच चौकशी केली आणि त्या आधारे २१७४ कोटी रुपयांच्या वसुलीची शिफारस केली आहे. ज्या संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि ज्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची पथकाने शिफारस केली त्यांच्या गैरव्यवहारांची मुख्यत्वे चौकशी करण्यात आली.विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात डॉ.वेंकटेशम पथकाचा अहवाल राज्य शासन मांडणार का आणि त्या आधारे संबंधितांवर कारवाई करणार का या बाबत आता उत्सुकता आहे. शिष्यवृत्ती वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाच्या शिफारशीदेखील पथकाने केल्या आहेत.2009-10पासून घोटाळे झाले. शिष्यवृत्तीची रक्कम तदर्थ अनुदान म्हणून शैक्षणिक संस्थांना आगाऊ देण्यात आली. त्यातून घोटाळ्याचे पेव फुटले. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना आदी जिल्ह्यांत कोट्यवधीचे घोटाळे झाले.शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात आलीच नाही, बोगस विद्यार्थ्यांच्या नावे उचल करण्यात आली. अन्य कारणांसाठी रकमेचा वापर संस्थाचालकांनी केला. केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांचा सोईचा अर्थ काढून शासनाच्या तिजोरीतून पैसा काढण्यात आला, असे अनेक प्रकार घडले.