शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शिष्यवृत्ती घोटाळा : विभागीय चौकशीला अधीन राहून अधिका-यांना केले सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:34 IST

राज्यभरात गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या अनेक अधिकाºयांची सध्या चौकशी सुरू आहे.

अभिनय खोपडे वर्धा : राज्यभरात गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या अनेक अधिकाºयांची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाºयांना चौकशीच्या अधीन राहून राज्य सरकारकडून सेवानिवृत्त करण्यात येत आहे. राज्यातील ही दुसरी घटना आहे. तसेच त्यांना तूर्तास सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही फायदे देण्यात आलेले नाही, हे विशेष!राज्यात २००९-१० पासून अनेक जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती वाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यात. त्यानंतर शासनाने सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागात चौकशी समिती गठित करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली.वर्धा जिल्ह्यात या घोटाळ्याचे मूळ असल्याचे शासनाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. एमएसबीटीई, नॉन-एआयसीटीई मार्फत अल्पमुदतीच्या कायम विना अनुदानित अभ्यासक्रमांना कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करून सामाजिक न्याय विभागातील अधिकाºयांनी गैरव्यवहार केले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यात या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या समितीने राज्य शासनाला मे २०११ मध्ये आपला अहवाल सादर केला.चौकशी समितीने दोषी अधिकाºयांची नावेही शासनाकडे सादर केली होती. यावरून शासनाने प्रथम ३१ जुलै २०१५ रोजी सहायक समाज कल्याण उपायुक्त एस.एम. कांडलकर यांना चौकशी अहवालाच्या अधीन राहून सेवानिवृत्त केले.वर्धा जिल्ह्यात समाज कल्याण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असताना शिष्यवृत्ती घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप चौकशी समितीने केला होता. त्यानंतर आता समाज कल्याण विभागाचे नागपूर येथील प्रादेशिक उपायुक्त एम.एस. झोड यांनाही विभागीय चौकशीच्या अधीन राहून शासनाने ३१ आॅगस्ट २०१७ रोजी सेवानिवृत्त केले आहे. त्यांचाही या शिष्यवृत्ती घोटाळ्यात सहभाग असल्याचा चौकशी समितीचा ठपका आहे.