शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली

By admin | Updated: June 15, 2017 04:34 IST

सामाजिक न्याय विभागाची वेबसाईटच बंद असल्यामुळे ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटपच थांबले आहे.

- यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सामाजिक न्याय विभागाची वेबसाईटच बंद असल्यामुळे ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटपच थांबले आहे. शिवाय, केंद्र सरकारकडून येणे असलेली शिष्यवृत्तीचा निधी अद्याप मिळालेला नाही. नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभीच शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. राज्य शासनाने ओबीसी, एससी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपकरता २७५ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम ३० जूनपर्यंत खर्च होणे अपेक्षित असताना त्यातील १०३ कोटी ५५ लाख रुपयांचेच वाटप अद्याप झालेले आहे. १७१ कोटी ७७ लाख रुपयांचे वाटप होऊ शकलेले नाही. शिवाय, विभागाची वेबसाईट ४५ दिवसांपासून बंद असल्याने १०३ कोटींचे वाटप कोणाला झाले याचाही हिशेब लागत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी योजनांतर्गत निधीतून केंद्र सरकार महाराष्ट्राला दरवर्षी निधी देते. तथापि, २०१७-१८ मध्ये त्यातील एकही छदाम अद्याप मिळालेला नाही. सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दि.रा.डिंगळे यांनी लोकमतला सांगितले की, विविध विभागांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक बाबी एकाच पोर्टलवर आणण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे. त्यामुळे आमची यंत्रणा ठप्प आहे. तथापि, आधीच्या पद्धतीनुसार प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्कॉलरशिप घोटाळ्यात काही संस्थांवर अन्यायआघाडी सरकारच्या काळात झालेल्या स्कॉलरशिप घोटाळ्याप्रकरणी राज्यात काही संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संबंधीचे वृत्त लोकमतने ४ जूनच्या अंकात दिले होते. त्यात पुणे येथील तुकाराम पठारे कॉलेज आणि रेड पिक्सल अ‍ॅनिमेशन कॉलेज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र, त्यातील फक्त रेड पिक्सल कॉलेजविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठारे कॉलेजविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले. तक्रारकर्ता विद्यार्थी हा पठारे कॉलेजमध्ये शिकत होता पण त्याच्या नावावर पिक्सल कॉलेजने शिष्यवृत्ती लाटल्याचे हे प्रकरण आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारने अत्यल्प रक्कम दिल्याने या शिष्यवृत्तीचा भार राज्य सरकारवर आला आहे. केंद्राने जवळपास ६०० कोटी रुपये देणे अपेक्षित असताना केवळ ७७ कोटी ९२ लाख रुपयेच दिले आहेत.