शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली

By admin | Updated: June 15, 2017 04:34 IST

सामाजिक न्याय विभागाची वेबसाईटच बंद असल्यामुळे ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटपच थांबले आहे.

- यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सामाजिक न्याय विभागाची वेबसाईटच बंद असल्यामुळे ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटपच थांबले आहे. शिवाय, केंद्र सरकारकडून येणे असलेली शिष्यवृत्तीचा निधी अद्याप मिळालेला नाही. नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभीच शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. राज्य शासनाने ओबीसी, एससी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपकरता २७५ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम ३० जूनपर्यंत खर्च होणे अपेक्षित असताना त्यातील १०३ कोटी ५५ लाख रुपयांचेच वाटप अद्याप झालेले आहे. १७१ कोटी ७७ लाख रुपयांचे वाटप होऊ शकलेले नाही. शिवाय, विभागाची वेबसाईट ४५ दिवसांपासून बंद असल्याने १०३ कोटींचे वाटप कोणाला झाले याचाही हिशेब लागत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी योजनांतर्गत निधीतून केंद्र सरकार महाराष्ट्राला दरवर्षी निधी देते. तथापि, २०१७-१८ मध्ये त्यातील एकही छदाम अद्याप मिळालेला नाही. सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दि.रा.डिंगळे यांनी लोकमतला सांगितले की, विविध विभागांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक बाबी एकाच पोर्टलवर आणण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे. त्यामुळे आमची यंत्रणा ठप्प आहे. तथापि, आधीच्या पद्धतीनुसार प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्कॉलरशिप घोटाळ्यात काही संस्थांवर अन्यायआघाडी सरकारच्या काळात झालेल्या स्कॉलरशिप घोटाळ्याप्रकरणी राज्यात काही संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संबंधीचे वृत्त लोकमतने ४ जूनच्या अंकात दिले होते. त्यात पुणे येथील तुकाराम पठारे कॉलेज आणि रेड पिक्सल अ‍ॅनिमेशन कॉलेज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र, त्यातील फक्त रेड पिक्सल कॉलेजविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठारे कॉलेजविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले. तक्रारकर्ता विद्यार्थी हा पठारे कॉलेजमध्ये शिकत होता पण त्याच्या नावावर पिक्सल कॉलेजने शिष्यवृत्ती लाटल्याचे हे प्रकरण आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारने अत्यल्प रक्कम दिल्याने या शिष्यवृत्तीचा भार राज्य सरकारवर आला आहे. केंद्राने जवळपास ६०० कोटी रुपये देणे अपेक्षित असताना केवळ ७७ कोटी ९२ लाख रुपयेच दिले आहेत.