शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विखुरलेल्या जैन बांधवांनी एकत्र यावे

By admin | Updated: October 20, 2015 01:42 IST

दक्षिण भारतात १६ लाख जैन समाज बांधव आहेत. मात्र ते दिंगबर आणि श्वेतांबर तसेच १३ पंथ व २० पंथ यात विखुरले आहेत. त्यामुळे जैन बांधवांनी एकत्र येऊन संघटित होणे

जालना : दक्षिण भारतात १६ लाख जैन समाज बांधव आहेत. मात्र ते दिंगबर आणि श्वेतांबर तसेच १३ पंथ व २० पंथ यात विखुरले आहेत. त्यामुळे जैन बांधवांनी एकत्र येऊन संघटित होणे गरजेचे असल्याचे मत श्री त्रिलोक शोध संस्थान हस्तीनापूर येथील पीठाधीश रवींद्रकीर्तीजी महाराज यांनी रविवारी येथे केले.अंबड येथे दक्षिण भारत जैन सभेच्या ९५व्या नैमित्तिक अधिवेशनात ते बोलत होते. कार्यक्रमास जळगावचे उद्योगपती अशोक जैन, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब पाटील, निवृत्त न्यायमूर्ती कैलासचंद्र चांदीवाल, अ.भा. तीर्थरक्षा कमिटी अध्यक्ष प्रमोदकुमार कासलीवाल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तुपकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते.रवींद्रकीर्तीजी महाराज म्हणाले, ‘दक्षिणभारत जैन सभा ही संघटना सर्वांत जुनी (११६ वर्षांपूर्वीची) संघटना आहे. संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक कामे केली जात आहेत.’ खा. राजू शेट्टी म्हणाले, ‘संकटकाळी जैन समाज मदतीला धावून येतो. मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा भार उचलण्यासाठी समाज बांधवानी पुढे यावे.’ उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलासचंद्र चांदीवाल यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहणाने अधिवेशनाचा शुभारंभ झाला. प्रमोदकुमार कासलीवाल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, ‘जैन समाजाने शैक्षणिक संस्था व वस्तिगृहांची स्थापना केली. १२५ शाळांच्या माध्यमातून शिक्षण प्रसार करण्यात येत आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिण भारत जैन सभा नेहमी कार्यतत्पर असते.’ (प्रतिनिधी)६३ मुलांना घेणारखा. राजू शेट्टी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत उद्योगपती भवरलाल जैन यांचे सुपुत्र अशोक जैन यांनी ५० मुलांना १२वीपर्यंतचे शिक्षण देण्यासाठी दत्तक देण्याची घोषणा केली. याबरोबरच विविध मान्यवर व संस्थांनी पुढे येत ६३ मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे जाहीर केले. मान्यवरांचा गौरवप्रसिद्ध उद्योगपती भंवरलाल जैन यांना देण्यात येणारा कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार त्यांचे सुपुत्र अशोक जैन (जळगाव) यांनी स्वीकारला. विलासकुमार सखाराम दुरुगकर (सोलापूर) यांना बी.बी. पाटील समाजसेवा पुरस्कार, लोकमतचे संपादक चक्रधर दळवी यांना प्रभातकार वा.रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार, डॉ. राजेंद्र चिंतामणी जैन (नागपूर) यांना आचार्य कुंदकुंद प्राकृतगं्रथ संशोधन व लेखन पुरस्कार, सदाभाऊ खोत (सांगली) यांना पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी समाजसेवा पुरस्कार, प्रा. विकास नागावकर (सोलापूर) यांना आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार, डॉ. पार्श्वनाथ जी केंपन्नवार (चिक्कोवडी) यांना आचार्य बाहुबली कन्नड साहित्य पुरस्कार, यज्ञकुमार केशवराव करेवार (परभणी) यांना डॉ. डी.एस. बरगाले समाजसेवा पुरस्कार, अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था (औरंगाबाद) यांना श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी आदर्श संस्था पुरस्कार, रावसाहेब पाटील (दानोळी) यांना वीराचार्य बाबासाहेब कचनुरे आदर्श युवा पुरस्कार, प्रा. सुधा नेमचंद पाटणी (औरंगाबाद) प्रा. डी.ए. पाटील आदर्श शिक्षण पुरस्कार, डॉ. बाळासाहेब साजने (नांदेड) यांना बाळ पाटील सोशल कल्चरल अवेरनेस अवॉर्ड, विजयमाला भरतकुमार चव्हाण (कोल्हापूर) यांना स्वर्गीय सुलोचना सिदाप्पा चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार देण्यात आला.