शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

म्हणे, ‘अमृतरसा’ने बरे होतात 52 आजार

By admin | Updated: September 16, 2014 23:02 IST

उपचार म्हणून रस घेण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, दिल्ली, लाखो लोक येथे येत आहेत. शुक्रवार ते मंगळवार या पाच दिवसांच्या कालावधीत प्रतिदिनी 3 लाखांवर लोक येथे हजेरी लावत आहेत.

पिंपळगावला टोमॅटोबाबाची भोंदूगिरी : महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, दिल्लीतून दररोज येतात लाखो भाविक
पुणो : पिंपळगाव (ता.दौंड) येथे स्वत:ला महाराज म्हणवून घेणा:या नितीन थोरात याला देवीचा साक्षात्कार झाला असून, देवीच्या मंदिर परिसरात प्रसाद म्हणून दिलेला ‘अमृतरस’ 52 आजार बरे करतो. त्यामुळे उपचार म्हणून रस घेण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, दिल्ली, लाखो लोक येथे येत आहेत. शुक्रवार ते मंगळवार या पाच दिवसांच्या कालावधीत प्रतिदिनी 3 लाखांवर लोक येथे हजेरी लावत आहेत. 
नितीन थोरात याला फिरंगाई देवी प्रसन्न झाली. त्यानंतर त्याने मंदिराचा जीर्णोद्धार केला, असे लोक सांगतात. त्यानंतर महाराजांनी गुडघेदुखी, हृदयरोग, कॅन्सर, मधुमेह यांसारख्या 52 आजारांवर औषध देण्यास 
सुरुवात केली. या औषधात टोमॅटो, झाडाची साल, वनस्पतींची मुळे यांचा समावेश आहे. एका मोठय़ा भांडय़ात हा रस एकत्रित करून वगराळ्याने हा रस भाविकांना दिला जातो. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील सुशिक्षितांचाही नितीन थोरात यांना मानणा:याध्ये  समावेश आहे. 
या ठिकाणी कसलाही जादूटोणा, गंडादोरा नाही. केवळ प्रसाद म्हणून भाविकांना रस दिला जातो. या औषधातून आजार बरे होतात हा माझा दावा नसून भाविकांचा आहे. त्यामुळे मी याबाबत अधिक बोलणार नाही. अंधश्रद्धा निमरूलन समितीने या विरोधात यापूर्वी अनेकदा आवाज उठवला आहे. मात्र यात कुठलीही भोंदुगिरी केली जात नाही, असे नितीन थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कथित अमृतरसाचे औषधी व अन्नाचे गुणधर्म तपासण्यासाठी दोन नमुने पंधरा दिवसापुर्वीच ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून बुधवारी (दि. 17) त्याचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे. या रसात टोमॅटो व विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीचे मिश्रण आहे. त्यामुळे कॅन्सर, मधुमेह या सारखे दुर्धर आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  (वार्ताहर)
 
अमृतरसाने 52 आजार बरे करण्याचा दावा करणा:या दौंडमधील भोंदूबाबाविरूद्ध पोलिसांकडे लेखी तक्रार करणार आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही आमच्यापध्दतीने आंदोलन करू. टोमॅटो रसाने जर आजार बरे होत असतील तर लोक घरीच हा रस बनवून पितील. त्यासाठी भोंदूबाबाकडे येण्याची काय गरज आहे. भोंदूबाबाच्या हाताने तो रस दिल्याने आजार बरे होतात हा दावा करणो जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे तातडीने कारवाई होणो आवश्यक आहे. 
 - मिलिंद देशमुख, 
राज्य सचिव, अंनिस
 
4कथित अमृतरसाचे औषधी व अन्नाचे गुणधर्म तपासण्यासाठी दोन नमुने पंधरा दिवसापुर्वीच ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून बुधवारी (दि. 17) त्याचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे.