शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सवाई महोत्सव लांबणीवर

By admin | Updated: December 13, 2014 00:15 IST

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला फटका बसला.

पुणो : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला फटका बसला. अगदी शेवटच्या क्षणार्पयत वाट पाहूनही पाऊस थांबण्याची शक्यता दिसत नसल्याने महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. राज्यात आणखी चार दिवस पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली असल्याने जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नव्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. आत्ताच्या तिकिटावरच  महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे. 
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची  आजची 3.3क् ही नियोजित वेळ ठरलेली होती. परंतु दीडच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण स्वरमंडप गळायला सुरुवात झाली. मात्र, पावसाची चिकचिक असूनही हजारो रसिक उपस्थित होते. तब्बल दीड तास रसिक बसून होते.  त्यामुळे पाच वाजता महोत्सव सुरू करण्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आली. मात्र, त्याच वेळी पुन्हा पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्यामुळे शेवटी आयोजकांकडून महोत्सव पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होणा:या महोत्सवाचा आस्वाद आत्ताच्या तिकिटांवरच घेता येईल, असे सांगून आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी रसिकांना मोठा दिलासा दिला. निसर्गाच्या लहरीमुळे महोत्सव रद्द झाल्याने रसिकही कोणताही नाराजीचा सूर प्रकट न करता मंडपातून माघारी परतले. आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे स्वरमंडपाचा पूर्णत: बोजवारा उडाला. खांब उखडलेले, स्टेजवर पाणी, सगळीकडे चिखलाचे साम्राज्य, कार्पेट पाण्याने ओले  चिक्क, असे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, तरीही रसिकांनी स्वरमंडप सोडला नाही. पावसाने आयोजकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले. तत्काळ हालचाली करीत महोत्सवाच्या 40 हजार चौरस फूट जागेत ताडपत्री आणि वरून प्लॅस्टिक टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, पाऊस थांबत नसल्याने मंडळाच्या पदाधिका:यांनी बैठक घेऊन महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
 
जानेवारी, फेब्रुवारीत नव्याने होणार आयोजन
चाळीस वर्षापूर्वी असाच मुसळधार पाऊस झाला होता. त्या वेळी गोखले मंडपवाल्यांनी रसिकांना बसायला पाट दिले होते. मात्र, पाऊस सुरूच राहिल्याने महोत्सव पुढे ढकलावा लागला. 1999ला हीच परिस्थिती होती. 2क्1क् मध्ये स्वाइन फ्लूच्या थैमानामुळे जानेवारीत महोत्सवाचे आयोजन केले होते. 
 
अवकाळी पावसामुळे विजेचा आणि पाण्याचा धोका आहे. महोत्सव उद्या आणि परवाही घेता येऊ शकतो; मात्र रसिकांच्या जिवाशी आम्ही खेळू शकत नाही. म्हणून महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- श्रीनिवास जोशी, 
कार्याध्यक्ष, आर्य प्रसारक मंडळ